शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
2
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
3
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
4
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
5
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
6
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
7
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
8
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
9
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
10
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
11
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
12
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
13
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
14
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
15
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
16
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
17
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
18
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
19
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
20
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात

कृषी कायद्यांबद्दल काही जण संभ्रम निर्माण करताहेत; मोदींचा विरोधकांवर निशाणा

By कुणाल गवाणकर | Updated: November 30, 2020 17:43 IST

दिल्ली-हरयाणाच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू; हजारो शेतकरी रस्त्यावर

वाराणसी: गेल्या चार दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. हरयाणा, पंजाबमधील हजारो शेतकरी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. शेतकरी आणि सरकारमध्ये अद्याप कोणतीही बैठक झालेली नाही. या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या वाराणसी दौऱ्यादरम्यान भाष्य केलं आहे. कृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांना नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र काही जण शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी अफवा पसरवत आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.कृषी कायद्यांबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. गैरसमज निर्माण केले जात आहेत. ज्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांचा छळ केला, ते आता शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत, असं म्हणत मोदींनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना लक्ष्य केलं. नव्या कायद्यामुळे शेतकऱ्यांना नवे पर्याय मिळतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. 'सरकारं कायदे तयार करतात. काही प्रश्न स्वाभाविक आहेत. तो लोकशाहीचा भाग आहे. पण गेल्या काही वर्षांपासून वेगळाच ट्रेंड पाहायला मिळतो आहे. आधी सरकारचा निर्णय पसंत न पडल्यास विरोध व्हायचा. पण आता अफवा, संभ्रम तयार केला जातो. भविष्यात याचे परिणाम चांगले होणार नाहीत, अशी भीती निर्माण केली जाते,' असं मोदींनी म्हटलं.सरकारनं केलेल्या कृषी सुधारणा ऐतिहासिक आहेत. मात्र त्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. आतापर्यंत ज्यांनी शेतकऱ्यांचं नुकसान केलं, त्यांच्याकडूनच आता अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे. याआधी पिकांसाठी हमीभाव असूनही खरेदी कमी व्हायची. शेतकऱ्यांच्या नावाखाली कर्जमाफी माफी व्हायची. पण ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायची नाही, असं मोदी म्हणाले. 'नव्या कृषी कायद्यांत जुन्या पद्धतीला रोखणारी कोणतीही तरतूद नाही. आधी बाजाराबाहेर होणारा व्यवहार बेकायदेशीर होता. अशा परिस्थितीत छोट्या शेतकऱ्यांची फसवणूक व्हायची. आता लहान शेतकरीसुद्धा बाजारबाहेर झालेल्या व्यवहाराविरोधात कायदेशीर पावलं उचलू शकतो. शेतकऱ्यांना आता नवे पर्याय खुले झाले असून त्यांना फसवणुकीपासून कायद्यांचं संरक्षण मिळालं आहे,' असं मोदींनी सांगितलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी