शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

“एकटा किती जणांवर भारी पडतोय हे देश पाहतोय,” विरोधकांच्या घोषणाबाजीदरम्यान मोदी कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 19:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यसभेतील भाषणादरम्यान विरोधकांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी पंतप्रधानही आक्रमक झाल्याचे दिसून आले.

राज्यसभेच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधाननरेंद्र मोदींनी विरोधकांना धारेवर धरलं. ८५ मिनिटं चाललेल्या या भाषणात पंतप्रधान मोंदींनी नेहरू आणि गांधी कुटुंब, कलम ३५६, नोकरी आणि बरोजगारी सारख्या मुद्द्यांवर भाष्य केलं. 

“ज्यांना सत्तेशिवाय दुसरे काही दिसत नाही त्यांनी आर्थिक धोरणाचे अनर्थ धोरणात रूपांतर केले आहे. मी त्यांना सावध करू इच्छितो, या सभागृहाच्या गांभीर्याने मी त्यांना सांगू इच्छितो, आपापल्या राज्यात जा आणि समजावून सांगा की त्यांनी चुकीच्या मार्गावर जाऊ नका, बिनदिक्कत कर्ज घेऊन काय झालंय? शेजारील देशांची स्थिती पाहत आहात,” असं मोदी भाषणादरम्यान म्हणाले. “कर्ज घ्या, पुढची पिढी फेडेल, अशी त्यांची विचारसरणी आहे. कर्ज काढून तूप खाण्याचा विचार करणारे राज्य तर उद्ध्वस्त करतीलच पण देशही उद्ध्वस्त करतील. आजूबाजूचे देश बघा, जगात कोणीही त्यांना कर्ज द्यायला तयार नाही, ते संकटातून जात आहेत. देशाच्या आर्थिक आरोग्याशी खेळू नका. तुमच्या मुलांचे हक्क हिरावून घेणारे असे कोणतेही पाप करू नका,” असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. 

“सामाजिक न्याय, दोन वेळची पोळी यांसारखे प्रश्न आम्ही सोडवले आहेत, तुम्ही सोडवले नाहीत. स्वतंत्र भारताची स्वप्ने पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे. एक व्यक्ती किती लोकांवर भारी पडतोय हे देश पाहतोय. एका व्यक्तीमुळे किती लोकांवर ओझे आहे. घोषणा देण्यासाठीही त्यांना (खासदार) बदलावं लागतं. दोन मिनिटं ते बोलतात. इथे तासाभरापासून आवाज दाबला गेला नाहीये,” असं म्हणत पंतप्रधानांनी निशाणा साधला.

“जितकी चिखलफेक कराल…”“मी काम करतोय हे पाहून विरोधकांना त्रास होतोय. मला मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वेदना समजत आहेत. तुम्ही दलितांबद्दल जर बोलत असाल तर, त्याच ठिकाणी निवडणुकीत दलितांना विजय मिळाला हेही तुम्ही पाहायला हवे. आता जनता तुम्हाला नाकारतेय म्हणून तुम्ही इथे तुमचे रडगाणे गात आहात. भारत हे संघराज्य आहे. गेल्या दशकामध्ये अनेक विचारवंतांनी घरी बसून देशाला दिशा दिली. असे लोकही घरात बसलेले असतात ज्यांनी आयुष्यात अनेक यश मिळवले आहे. सभागृहात जे घडते ते देश ऐकतो आणि गांभीर्याने घेतो. त्यामुळे तुम्ही आमच्यावर जितकी टीका किंवा चिखलफेक करायचा प्रयत्न कराल, तितक्या जास्त ठिकाणी (भाजपाचे) कमळ उमलेल,” असं म्हणत मोदींनी खर्गेंच्या टीकेचा समाचार घेतला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानRajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेस