शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

Kathua & Unnao Rape Case : मला दिलेल्या 'त्या' सल्ल्यावर पंतप्रधान मोदींनी आता स्वतः अंमलबजावणी करावी - डॉ. मनमोहन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 11:59 IST

मला दिलेल्या सल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता स्वतःसाठी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता - डॉ. मनमोहन सिंग

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे एका 8 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करुन तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठुआ आणि उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी मौन बाळगल्याबाबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी टीकास्त्र सोडले आहे. मौनावरुन नरेंद्र मोदी यांनी आपल्याला जो बोलण्याचा सल्ला दिला होता त्याची अंमलबजावणी त्यांनी करावी व अशा प्रकरणांवर त्यांनी बोलावे, असा सल्ला देत मनमोहन सिंग यांनी मोदींवर टीका केली आहे.

'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत सिंग यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. बलात्कार प्रकरणांबाबत मोदींनी अखेर शनिवारी (14 एप्रिल) मौन सोडले ते पाहून आनंद झाला, असे त्यांनी मुलाखतीदरम्यान म्हटले. ''मुलींना न्याय मिळेल आणि दोषींची मुक्तता केली जाणार नाही, असे मोदी म्हणाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नियोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते.भाजपा डॉ. सिंग यांना मौन-मोहन सिंग असे टोमणे मारत असे त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, आपण अशा प्रकारचे टोमणे झेलतच संपूर्ण आयुष्य जगलो आहोत.

''मला असे वाटते की पंतप्रधान नरेंद्र मोदी जो सल्ला मला दिला होता, त्यावर आता स्वतः अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे आणि त्यांनी अधिकाअधिक बोलत राहावे. माझ्या न बोलण्यावर मोदी टीका करायचे, आता त्यांनी मला दिलेल्या सल्ल्यावर स्वतः अंमलबजावणी करावी'', असे सिंग यांनी म्हटले.

यावेळी मनमोहन सिंग असेही सांगितले की, नवी दिल्लीमध्ये 2012मध्ये झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर काँग्रेस पार्टी आणि त्यांच्या सरकारनं आवश्यक पाऊल उचलले होते आणि बलात्कार प्रकरणांसंदर्भात कायद्यामध्ये बदलदेखील केले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंगKathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरण