शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

सीएएविरोधी आंदोलकांना विरोधकांकडून चिथावणी; पंतप्रधान मोदी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 06:15 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधी आंदोलनांना काँग्रेस व डावे पक्ष चिथावणी देत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत केला.

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधी आंदोलनांना काँग्रेस व डावे पक्ष चिथावणी देत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत केला.

पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्यात यावे असे पं. नेहरू यांचेही मत होते. त्यामुळे नेहरूंना हिंदुराष्ट्र निर्माण करायचे होते, ते जातीयवादी होते अशी टीका काँग्रेस करणार का?, असा सवाल करून मोदी म्हणाले की, राज्यघटना बचाओच्या घोषणा देणारी काँग्रेस आणीबाणीच्या काळात नेमका तोच विचार विसरली होती. काँग्रेसने अनेक पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली होती.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदी म्हणाले की, काँग्रेसने गेल्या ७० वर्षांत राबविलेल्या धोरणांमुळे त्यांच्या पक्षात एकही परिपूर्ण नेता निर्माण झाला नाही. जनतेने २०१४ ते २०१९ या काळात भाजप सरकारचे काम पाहिल्याने पुन्हा आम्हाला निवडून दिले आहे.

मोदी म्हणाले की, काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांना हुसकावून लावल्याने तेथील हिंदू पंडित अन्य ठिकाणी निघून जाण्यास १९ जानेवारी १९९०पासून सुरुवात झाली. त्याच वेळी काश्मीरने आपली ओळख गमावली. काश्मीरला ओरबाडून कुणी खाल्ले? काश्मीरमध्ये फक्त बॉम्ब, बंदुका यांचेच राज्य आहे अशी ओळख कोणी निर्माण केली? जनतेला कोणतेही प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहणे मान्य नाही. जटिल प्रश्नांवर तोडगा निघावा लागतो. जनतेने फक्त सरकारच बदलले नाही, त्यांना राज्यकर्त्यांच्या कार्यशैलीतही बदल हवा होता.

आम्ही जुनाट वळणानेच कारभार करत राहिलो असतो तर कलम ३७० रद्दबातल करणे शक्य झाले नसते. तिहेरी तलाकमुळे मुस्लिम महिलांवर मोठा अन्याय होत होता. त्या प्रथेवर आम्ही बंदी आणली. जुन्या पठडीप्रमाणे विचार करत राहिले असतो तर रामजन्मभूमीचा प्रश्न कधीच सुटला नसता. कर्तारपूर कॉरिडोरचे स्वप्न सत्यात कधीच उतरले नसते. बांगलादेश-भारत दरम्यान जमिनीसंदर्भात करार कधीच झाला नसता.

वित्तीय तूट व महागाई आम्हीे नियंत्रणात राखली आहे. शेतीसाठी अर्थसंकल्पात पूर्वीच्या पाच तरतूद केली आहे. राजकारणापोटी काही राज्ये किसान राबविण्यास नकार देतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणाबाबत कोणतेही राजकारण करून नका. आपण सर्व मिळून शेतकऱ्यांच्या हितासाठी झटूया असे आवाहन पंतप्रधानांनी केले. राज्यसभेतही त्यांनी चर्चेला उत्तर दिले. लोकसभेत राष्ट्रपतींच्या आभाराचा प्रस्ताव बहुमताने संमत झाला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकIndiaभारत