शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

“समाजातील स्वार्थी घटकांमुळे योजनांचा अपेक्षित लाभ गरिबांना मिळू शकला नाही”: PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 10:31 IST

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या गुजरातमधील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

ठळक मुद्देकोरोना काळात कोणीही नागरिक उपाशी राहणार नाही, याची दक्षता घेतलीकोरोना संकटाच्या कालावधीत ८० कोटींहून अधिक नागरिकांना मोफत धान्यवाटपगरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांशी PM मोदींचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद

अहमदाबाद: कोरोना संकटामुळे अनेक उद्योग, व्यापार, व्यवसाय यांवर मोठा परिणाम होऊन बेरोजगारीत प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. हातावर पोट असलेल्या रोजंदारी करणाऱ्यांना तसेच गरिब घटकांचे तर खूपच हाल या कोरोना संकट काळात झाले. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा कोरोनाकाळात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लाभ झाला. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांची भाकरीची चिंता दूर झाली. तसेच समाजातील स्वार्थी घटकांमुळे योजनांचा अपेक्षित लाभ गरिबांना मिळू शकला नाही, असे प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केले आहे. (pm narendra modi says garib kalyan anna yojana has given confidence to economically deprived) 

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या गुजरातमधील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. स्वातंत्र्योत्तर काळात देशात स्वस्त अन्नधान्य वाटपाच्या योजना आणि त्यासाठीचा निधी यात उत्तरोत्तर वाढ होत गेली, मात्र अकार्यक्षम वितरण यंत्रणा आणि स्वार्थी घटकांमुळे त्याचा गरिबांना पाहिजे तसा लाभ मिळू शकला नाही, असे मोदी म्हणाले.

‘मोदींचा हनुमान’ भाजपविरोधात बंडखोरी करणार? लालू प्रसाद यादवांची मोठी ऑफर; म्हणाले...

गरीब कुटुंबांची भाकरीची चिंता दूर झाली

गेल्या काही वर्षांत देशात अन्नधान्याचा साठा वाढत गेला, पण लोकांची उपासमार आणि कुपोषण हे त्या प्रमाणात कमी झाले नाही. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेमुळे गरीब कुटुंबांची भाकरीची चिंता दूर झाली. या योजनेअंतर्गत कोरोना संकटाच्या कालावधीत ८० कोटींहून अधिक नागरिकांना मोफत धान्यवाटप करण्यात आले. त्यासाठी दोन लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली. 

Adani Group चा आता महाराष्ट्र, छत्तीसगडमधील खाणींवर ताबा; लिलावात सर्वाधिक बोली!

कोणीही नागरिक उपाशी राहणार नाही

कोरोनामुळे रोजगार धोक्यात आले. लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसायांवर परिणाम झाला. देशावर शतकातील हे सर्वांत मोठे संकट आले असताना कोणीही नागरिक उपाशी राहणार नाही, याची दक्षता आम्ही घेतली, असे मोदी यांनी नमूद केले. यंत्रणेत काही दोष निर्माण झाला आहे. काही स्वार्थी घटक यात घुसले आहेत. ही व्यवस्था बदलण्यासाठी २०१४ नंतर आम्ही नव्या पद्धतीने काम सुरू केले. योजनेतील खोटे लाभार्थी काढून टाकण्यासाठी नवे तंत्रज्ञान वापरण्यात आले. शिधापत्रिकांशी आधारकार्ड जोडण्यात आले. सरकारच्या स्वस्त धान्य दुकानांत डिजिटल यंत्रणा बसविण्यात आली, असेही मोदी यांनी सांगितले.  

टॅग्स :Gujaratगुजरातprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा