शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

चौकीदार चोर नहीं चौकन्ना है; नरेंद्र मोदींचा राहुल गांधींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 14:55 IST

चौकीदार चौर नहीं चौकन्ना है, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे.

ठळक मुद्देचौकीदार चौर नहीं चौकन्ना है, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. 'काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष भारतीय सैन्याचं खच्चीकरण कशासाठी करत आहेत?'दहा वर्षांनंतर प्रथमच नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार निवडणुकीच्या प्रचारासाठी एका मंचावर आले होते.

पटना : चौकीदार चौर नहीं चौकन्ना है, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. बिहारमधील पटना येथील गांधी मैदानात आयोजित सभेत नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी काँग्रेससह विरोधकांवर हल्लाबोल केला.

'सर्व चौकीदार हे काही चोर नाहीत, पण फक्त 'देशाचा चौकीदार' चोर आहे,' अशी बोचरी टीका अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर शनिवारी केली होती. यावर नरेंद्र मोदी यांनी चौकीदार चोर नही चौकन्ना है, देशाला लुटणारे चौकीदारामुळे हैराण आहेत, असे सांगत राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला.

याचबरोबर, गेल्या महिन्यात भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईसंदर्भात पुरावे मागणाऱ्यांवर नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष भारतीय सैन्याचं खच्चीकरण कशासाठी करत आहेत? ज्या विधानांमुळे आपल्या शत्रूला फायदा होतो अशी विधाने त्यांच्याकडून का केली जात आहेत? असा सवाल करत नरेंद्र मोदींनी विरोधक सैन्याच्या खच्चीकरणाचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. तसेच,  आता भारत आपल्या वीर जवानांच्या बलिदानावर गप्प बसत नाही, तर ‘चुन चुन के बदला लेता हैं’ असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

दरम्यान, नरेंद्र मोदींच्या या या सभेला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह मोठे नेते उपस्थित होते. दहा वर्षांनंतर प्रथमच नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार निवडणुकीच्या प्रचारासाठी एका मंचावर आले होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमार यांच्या कामगिरीवर स्तुतिसुमनं उधळली.

एनडीएतून नीतीश कुमार 2013 मध्ये बाहेर पडले होते...2014च्या  लोकसभा निवडणुकांच्या आधी जून 2013 मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार एनडीएमधून बाहेर पडले होते. त्यानंतर बिहारमध्ये त्यांचा पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. याशिवाय, नितीश कुमार यांनी 2015च्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबत युती केली होती. त्यानंतर 2017 मध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन त्यांनी आरजेडीसोबतची युती तोडली. त्यानंतर ते पुन्हा एनडीएमध्ये परतले.  

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारBiharबिहार