शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 17:28 IST

PM Narendra Modi Ayodhya Ram Mandir Dhwajarohan Ceremony: पुढील १० वर्षे भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करण्याचे ध्येय घेऊन पुढे जायचे आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

PM Narendra Modi Ayodhya Ram Mandir Dhwajarohan Ceremony: संपूर्ण भारत आणि जग राममय झाले आहे. प्रत्येक रामभक्ताचे हृदय आनंद आणि समाधानाने भारलेले आहे. प्रत्येक जण अमर्याद कृतज्ञतेचा अनुभव करत आहे. अथांग अलौकिक आनंदात न्हाऊन निघाला आहे. शतकानुशतके झालेल्या वेदना आता शांत होत आहेत. शतकानुशतके केलेल्या संकल्पाची पूर्तता होत आहे. ज्या यज्ञाचा अग्नि ५०० वर्षे प्रज्वलित होता त्याची पूर्ती होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अयोध्येत पूर्ण झालेल्या राम मंदिराच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले.

अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजारोहण सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक राजकीय नेते, मान्यवर, निमंत्रित पाहुणे आणि शेकडो साधू-संत-महंत उपस्थित होते. हा धर्मध्वज फक्त एक ध्वज नाही. तो भारतीय संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा ध्वज आहे. यातील भगवा रंग, सूर्यवंशाचे चिन्ह आहे, 'ओम' शब्द आणि कोविदार वृक्ष रामराज्याच्या वैभवाचे प्रतिरूप आहेत. हा ध्वज एक संकल्प आहे. संघर्षाची गाथा आहे. शंभर वर्षांच्या संघर्षाचे भौतिक स्वरूप आहे. येणाऱ्या हजारो शतकांपर्यंत, हा ध्वज श्रीरामांच्या मूल्यांचा प्रचार करेल. सत्य हाच धर्म आहे. कोणताही भेदभाव नसेल. शांतता आणि आनंद असेल, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

श्रीराम काल्पनिक होते असे म्हणणारी गुलामी संपवू

१८३५ मध्ये थॉमस मॅकॉले यांनी भारतीय संस्कृती आणि भारतीय मूल्ये मूळापासून उखडून टाकण्याच्या प्रयत्नांना सुरुवात केली होती. १८३५ मध्ये मॅकॉले शिक्षण प्रणाली सुरू झाल्यापासून २०० वर्षे पूर्ण होत असताना २०३५ पर्यंत भारताने गुलामीच्या मानसिकतेपासून मुक्त होण्याचा संकल्प केला पाहिजे. पुढील १० वर्षे आपल्याला भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करण्याचे ध्येय घेऊन पुढे जायचे आहे, असा एक मोठा संकल्प पंतप्रधान मोदी यांनी देशाला दिला आहे. या गुलामगिरीच्या मानसिकतेचा पगडा एवढा जबरदस्त आहे की, श्रीराम काल्पनिक होते, असेही म्हटले गेले. परंतु, आता श्रीराम काल्पनिक होते असे म्हणणारी गुलामी संपवू, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. 

दरम्यान, श्रीराम ही एक केवळ एक व्यक्ती नाही, ते एक मूल्य आहे. जर आपल्याला २०४७ पर्यंत भारताला विकसित करायचे असेल तर आपल्याला स्वतःमधील श्रीरामाला जागृत करावे लागेल. या संकल्पासाठी आजपेक्षा चांगला दिवस कोणता असू शकतो? गेल्या ११ वर्षांत समाजातील प्रत्येक घटक, महिला, दलित, मागासवर्गीय, आदिवासी, वंचित, शेतकरी, कामगार आणि तरुण यांना विकासाच्या केंद्रस्थानी आणले गेले. २०४७ ला देश स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा विकसित भारत निर्माण करण्याचे ध्येय पूर्णपणे साध्य झाले पाहिजे. पुढील एक हजार वर्षांसाठी भारताचा पाया मजबूत करायचा आहे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Eradicate slavery claiming Shri Ram was imaginary: PM Modi's 2035 pledge.

Web Summary : PM Modi consecrated Ayodhya's Ram Mandir, urging India to shed its slave mentality by 2035. He emphasized awakening the inner Ram to achieve a developed India by 2047, building a strong foundation for the next millennium, promoting equality and peace.
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेश