शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
2
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
3
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
4
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
5
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
6
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
7
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
8
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
9
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
10
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
11
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
12
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
13
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
14
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
15
माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपाचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जी यांचे आव्हान
16
Solapur Crime: एकाच दिवशी चौघांनी मृत्युला मारली मिठी, कुणी घरात, कुणी बाहेर संपवले आयुष्य
17
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
18
मार्च पर्यंत ४००० अब्ज डॉलर्सची होणार देशाची अर्थव्यवस्था; कोणी केला हा दावा, पाहा
19
IND vs SA 2nd Test Day 4 Stumps : दोन्ही सलामीवीर तंबूत! कुलदीपला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ!
20
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 17:28 IST

PM Narendra Modi Ayodhya Ram Mandir Dhwajarohan Ceremony: पुढील १० वर्षे भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करण्याचे ध्येय घेऊन पुढे जायचे आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

PM Narendra Modi Ayodhya Ram Mandir Dhwajarohan Ceremony: संपूर्ण भारत आणि जग राममय झाले आहे. प्रत्येक रामभक्ताचे हृदय आनंद आणि समाधानाने भारलेले आहे. प्रत्येक जण अमर्याद कृतज्ञतेचा अनुभव करत आहे. अथांग अलौकिक आनंदात न्हाऊन निघाला आहे. शतकानुशतके झालेल्या वेदना आता शांत होत आहेत. शतकानुशतके केलेल्या संकल्पाची पूर्तता होत आहे. ज्या यज्ञाचा अग्नि ५०० वर्षे प्रज्वलित होता त्याची पूर्ती होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अयोध्येत पूर्ण झालेल्या राम मंदिराच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले.

अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजारोहण सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक राजकीय नेते, मान्यवर, निमंत्रित पाहुणे आणि शेकडो साधू-संत-महंत उपस्थित होते. हा धर्मध्वज फक्त एक ध्वज नाही. तो भारतीय संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा ध्वज आहे. यातील भगवा रंग, सूर्यवंशाचे चिन्ह आहे, 'ओम' शब्द आणि कोविदार वृक्ष रामराज्याच्या वैभवाचे प्रतिरूप आहेत. हा ध्वज एक संकल्प आहे. संघर्षाची गाथा आहे. शंभर वर्षांच्या संघर्षाचे भौतिक स्वरूप आहे. येणाऱ्या हजारो शतकांपर्यंत, हा ध्वज श्रीरामांच्या मूल्यांचा प्रचार करेल. सत्य हाच धर्म आहे. कोणताही भेदभाव नसेल. शांतता आणि आनंद असेल, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

श्रीराम काल्पनिक होते असे म्हणणारी गुलामी संपवू

१८३५ मध्ये थॉमस मॅकॉले यांनी भारतीय संस्कृती आणि भारतीय मूल्ये मूळापासून उखडून टाकण्याच्या प्रयत्नांना सुरुवात केली होती. १८३५ मध्ये मॅकॉले शिक्षण प्रणाली सुरू झाल्यापासून २०० वर्षे पूर्ण होत असताना २०३५ पर्यंत भारताने गुलामीच्या मानसिकतेपासून मुक्त होण्याचा संकल्प केला पाहिजे. पुढील १० वर्षे आपल्याला भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करण्याचे ध्येय घेऊन पुढे जायचे आहे, असा एक मोठा संकल्प पंतप्रधान मोदी यांनी देशाला दिला आहे. या गुलामगिरीच्या मानसिकतेचा पगडा एवढा जबरदस्त आहे की, श्रीराम काल्पनिक होते, असेही म्हटले गेले. परंतु, आता श्रीराम काल्पनिक होते असे म्हणणारी गुलामी संपवू, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. 

दरम्यान, श्रीराम ही एक केवळ एक व्यक्ती नाही, ते एक मूल्य आहे. जर आपल्याला २०४७ पर्यंत भारताला विकसित करायचे असेल तर आपल्याला स्वतःमधील श्रीरामाला जागृत करावे लागेल. या संकल्पासाठी आजपेक्षा चांगला दिवस कोणता असू शकतो? गेल्या ११ वर्षांत समाजातील प्रत्येक घटक, महिला, दलित, मागासवर्गीय, आदिवासी, वंचित, शेतकरी, कामगार आणि तरुण यांना विकासाच्या केंद्रस्थानी आणले गेले. २०४७ ला देश स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा विकसित भारत निर्माण करण्याचे ध्येय पूर्णपणे साध्य झाले पाहिजे. पुढील एक हजार वर्षांसाठी भारताचा पाया मजबूत करायचा आहे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Eradicate slavery claiming Shri Ram was imaginary: PM Modi's 2035 pledge.

Web Summary : PM Modi consecrated Ayodhya's Ram Mandir, urging India to shed its slave mentality by 2035. He emphasized awakening the inner Ram to achieve a developed India by 2047, building a strong foundation for the next millennium, promoting equality and peace.
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेश