शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

'शांततेसाठी लाहोरला गेलो होतो, पण...', पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर पीएम मोदी स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 19:58 IST

'जगात कुठेही दहशतवादाची घटना घडते, तेव्हा कुठे ना कुठे पाकिस्तानचे कनेक्शन समोर येते.'

PM Narendra Modi Podcast : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन (Lex Fridman) यांच्याशी पॉडकास्टच्या माध्यमातून दीर्घ संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तानमधील  संबंधांवर विचारलेल्या प्रश्नांची अतिशय मोकळेपणाने उत्तरे दिली. पीएम मोदी म्हणाले की, 1947 पूर्वी सर्वजण खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्यासाठी लढत होते. त्यानंतर देशाच्या धोरणकर्त्यांनी भारताची फाळणी मान्य केली आणि मुस्लिमांना त्यांचा देश दिला. 

हे भारतातील जनतेने मोठ्या जड अंतकरणाने मान्य केले, पण त्याचे परिणामही भोगावे लागले. या फाळणीमुळे झालेल्या हत्याकांडात लाखो लोक मारले गेले. पाकिस्तानातून मृतदेहांनी भरलेल्या गाड्या येऊ लागल्या. अतिशय भितीदायक दृश्ये होती. मात्र भारताचे आभार मानून आनंदाने जगण्याऐवजी पाकिस्तानने संघर्षाचा मार्ग निवडला. जगात कुठेही दहशतवादाची घटना घडते, तेव्हा कुठे ना कुठे पाकिस्तानचे कनेक्शन समोर येते. 9/11 ची मोठी घटना अमेरिकेत घडली, त्याचा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेन पाकिस्तानात आश्रय घेत होता. पाकिस्तान संपूर्ण जगासाठी संकटाचा केंद्र बनला आहे, अशी प्रतिक्रिया पीएम मोदींनी व्यक्त केली.

प्रत्येक वेळी नकारात्मकच परिणाम आम्ही सातत्याने म्हणत आहोत की, तुम्ही दहशतवादाचा मार्ग सोडा, हा सरकारी दहशतवाद थांबला पाहिजे. पाकिस्तानने सर्व काही दहशतवाद्यांच्या हातात सोडले आहे. याचा फायदा कोणाला होणार? मी स्वतः लाहोरला शांततेच्या प्रयत्नांसाठी गेलो होतो. मी पंतप्रधान झाल्यानंतर माझ्या शपथविधी समारंभासाठी खास पाकिस्तानच्या प्रमुखाला आमंत्रित केले होते, जेणेकरून ही एक शुभ सुरुवात व्हावी. पण प्रत्येक वेळी चांगल्या प्रयत्नांचे परिणाम नकारात्मकच निघाले. आम्हाला आशा आहे की, त्यांना शहाणपण येईल, असेही पीएम मोदी यावेळी म्हणाले.

कोणाची क्रिकेट टीम चांगली आहे?याला उत्तर देताना पीएम मोदी म्हणाले की, खेळ संपूर्ण जगाला उर्जेने भरण्याचे काम करतो. खेळाची भावना जगाला जोडण्याचे काम करते, त्यामुळे मला खेळाची बदनामी होताना बघायला आवडणार नाही. मी खेळाला मानवी विकासाच्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग मानतो. कोण चांगले आणि कोण वाईट, याबद्दल बोलायचे झाले तर, मी त्यातला तज्ञ नाही. ज्यांना या खेळाचे तंत्र माहित आहे, तेच सांगू शकतात की, कोणाचा खेळ चांगला आहे. पण, कोणता संघ चांगला आहे, हे काही दिवसांपूर्वी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे, असा मिश्किल टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद