शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

'अडचणीच्या काळात मोदी मदतीला आला; तुमच्यावर लोकांचा कधीच विश्वास बसणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 17:23 IST

'माझं आयुष्य देशासाठी खर्ची घातलंय, त्यामुळेच लोकांचा माझ्यावर विश्वास आहे.'

नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना काँग्रेसने मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या आरोपांवर उत्तर देताना सडकून टीका केली. यावेळी मोदींनी काँग्रेसच्या काळात झालेल्या आरोपांचा पाढाच वाचला. तसेच, काँग्रेसने मोठी संधी असतानाही देशाला मागे आणले, असा आरोपही केला.  

यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेवर उपहासात्मक टोलाही लगावला. मोदी म्हणाले, 'येणाऱ्या काळात काँग्रेसच्या ऱ्हासावर हार्वर्डसह जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये स्टडी केली जाईल. 'तुम्हारे पाव के निचे जमीन नहीं, कमाल ये है, फिर भी तुम्हे यकिन नहीं,' असा शेर म्हणताच सभागृहात एकच हसा फिकला. मोदी पुढे म्हणतात, 2014 पासून हे लोक म्हणत आहेत की, भारत कमजोर झालाय, भारताचे कोणी ऐकत नाही. आता म्हणत आहेत की, भारत इतर देशांना धमकावून निर्णय घेत आहेत. भारत कमजोर झालाय की, मजबूत झालाय, हेच आधी तुम्ही ठरवा, असा टोलाही मोदींनी लगावला. यांना वाटतंय की, मोदींना शिव्या दिल्याने मार्ग निघेल, पण गेल्या बावीस वर्षांपासून काही करू शकले नाहीत, असंही मोदी म्हणाले.

मोदी पुढे म्हणतात, वृत्तपत्रांमधील बातम्यामुळे किंवा टीव्हीवर आल्याने मोदींवर लोकांचा विश्वास नाहीये, तर मी माझे आयुष्य देशासाठी झिजवले आहे. यामुळेच लोकांचा मोदीवर विश्वास आहे. देशातील लोकांचा मोदीवर विश्वास आहे, हे काँग्रेसला कधीच कळणार नाही. खोटे आरोप करणाऱ्यांवर देशातील जनता कधीच विश्वास ठेवणार नाही. देशातील ज्या गरिबाला मोफत धान्य मिळते, तो तुमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. अडचणींच्या काळात मोदी लोकांच्या कामाला आला आहे, म्हणून लोकांचा मोदीवर विश्वास आहे,' असंही मोदी म्हणाले. 

ते पुढे म्हणतात, तुम्ही कितीही शिव्या द्या, आरोप करा, पण लोकांचा तुमच्यावर परत विश्वास बसणार नाही. तुमच्या शिव्यांना आणि आरोपांना या कोटी-कोटी भारतीयांना तोंड द्यावे लागणार आहे. या लोकांना तुम्ही अनेक दशके अडचणीत टाकले होते. भाजपने या लोकांना अडचणीतून बाहेर आणले आहे. काहीलोक स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी खूपकाही उद्धवस्त करायला तयार आहेत. पण, हे देशच मोदीचे कुटुंब आहे. 140 कोटी लोकांच्या सुरक्षेचे कवच माझ्या पाठीशी आहे. खोटे आरोप करुन तुम्ही कधीच हे सुरक्षा कवच भेदू शकणार नाहीत, असंही मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा