शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 17:35 IST

मोदी म्हणाले, "वायनाडमध्ये ज्या लोकांचा संबंध बंदी घातलेल्या पीएफआयसोबत आहे, अशा लोकांकडून या संघटनेची मदत घेतली जात आहे. हेच तर काँग्रेसचे ट्रॅक रेकॉर्ड आहे. दहशत वाद्यांना मारल्यानंतर या लोकांच्या डोळ्यात पाणी येत होते.

बेंगलोरमध्ये ते सत्तेवर आल्यानंतर, एका कॅफेमध्ये बॉम्बस्फोट झाला. यासंदर्भात त्यांनी काय विधान केले? म्हणाले, गॅस सिलिंडर फुटले, अरे! तुमचं डोकं फुटलं आहे की, गॅसचं सिलिंडर? अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सत्ताधारी काँग्रेस सरकारवर थेट हल्ला चढवला. ते रविवारी कर्नाटकातील सिर्सी येथे एका प्रचारसभेत बोलत होते. 

मोदी म्हणाले, "वायनाडमध्ये ज्या लोकांचा संबंध बंदी घातलेल्या पीएफआयसोबत आहे, अशा लोकांकडून या संघटनेची मदत घेतली जात आहे. हेच तर काँग्रेसचे ट्रॅक रेकॉर्ड आहे. दहशत वाद्यांना मारल्यानंतर या लोकांच्या डोळ्यात पाणी येत होते. आपल्याला आठवतच असेल की, दिल्लीत अशी घटना घडली होती, तेव्हा, दहशतवाद्याला का मारले गेले, म्हणून काँग्रेसच्या एक नेत्याच्या डोळ्यात पाणी आले होते."

"मोदींचा जन्म मौजमजा करण्यासाठी झालेला नाही. इश्वराने मोदीला केवळ तुमच्या सेवेसाठी जन्माला घातले आहे आणि आपले स्वप्न हे मोदीचा संकल्प आहे. ही तुम्हाला माझी गॅरंटी आहे. माझा प्रत्येक क्षण तुमच्या नावे, माझा प्रत्येक क्षण तुमच्या मुलांच्या भविष्याच्या नावे, माझा प्रत्येक क्षण तुमची स्वप्नं साकार करण्यासाठी, माझा प्रत्येक क्षण देशाच्या नावे, म्हणून मी तुम्हाला गॅरंटी देतो की, 24/7 आणि 2047 पर्यंत देशाची सेवा," असेही मोदी म्हणाले.प्रभू श्रीरामांसाठी 500 वर्षांपर्यंत संघर्ष करावा लागला - राम मंदिराचा संदर्भ देत मोदी म्हणाले, "माझे आणि आपले पूर्वज अयोध्येत प्रभू रामचंद्रांसाठी 500 वर्षं लढत होते. हा काही कमी कालावधी नाही. यात लाखो लोक मारले गेले. प्रभू श्रीरामाचे मंदिर बांधण्याचा निर्णय देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता. मात्र, त्यांनी तसे केले नाही. असे काम करण्यासाठी 56 इंचाची छाती लागते. तरच 500 वर्षांचे स्वप्न आणि 500 वर्षांची प्रतीक्षा संपते. मात्र, हे तेव्हाच शक्य होते, जेव्हा आपल्या मतांची ताकद मिळते."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस