शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

PM Modi Karnataka Rally: मतदानापूर्वी पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले, सोनिया गांधींबद्दल काय म्हणाले? केलं असं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 20:45 IST

"भयभीत झालेल्या पक्षाने आपल्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी आणले. कारण..."

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस जवळ येत आहे. सर्वच राजकीय पक्ष संपूर्ण ताकदीनिशी प्रचार करत आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीही भाजपसाठी फ्रंटफूटवर बॅटिंग करताना दिसत आहेत. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील शिवमोगा येथे एका जाहीर सभेला संबोधित करत काँग्रेसवर थेट हल्ला चढवला. ते म्हणाले, भयभीत झालेल्या पक्षाने आपल्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी आणले. कारण त्यांचे खोटे चालले नाही. कर्नाटक विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

'काँग्रेस भयभीत' -सोनिया गांधी यांचे नाव न घेता मोदी म्हणाले, "आता काँग्रेस पक्ष एवढा भयभीत झाला आहे की, आता त्यांचे खोटे बोलणेही चालत नसल्याने ते, जे प्रचारात सहभागी होत नव्हते, त्यांनाही प्रचारात आणत आहेत. काँग्रेसने पराभवाची जबाबदारी एकमेकांवर टाकायला सुरुवात केले आहे." महत्वाचे म्हणजे, प्रकृतीच्या कारणांमुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीपासूनच प्रचार आणि सार्वजनिक सभांपासून दूर राहिलेल्या सोनिया गांधी यांनी शनिवारी हुबळी येथे निवडणुकीतील आपल्या पहिल्या निवडणूक सभेला संबोधित केले. 

यावेळी, खासगी क्षेत्रात दरवर्षी दोन लाख नोकऱ्या देण्याचे काँग्रेसचे आश्वासनही खोटे असल्याचे पंतप्रधान म्हणाले. एवढेच नाही तर, कोरोना महामारी असतानाही कर्नाटकात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने गेल्या साडेतीन वर्षांत दरवर्षी राज्यातील 13 लाखांहून अधिक लोकांना नोकऱ्या दिल्याचा दावाही मोदींनी यावेळी केला. 

खोटे बोलण्यासाठी काँग्रेसची यंत्रणा -काँग्रेसने खोटे बोलण्यासाठी एक यंत्रणाच तयार केली आहे, पण कितीही मोठा फुगा फुगवला तरी त्याचा निवडणुकीत काहीही परिणाम होणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 'बजरंगबली की जय' या घोषणेने आपल्या भाषणाची सुरुवात करताना मोदी म्हणाले की, ज्या काँग्रेसचे लक्ष्य भ्रष्टाचार आणि तुष्टीकरण आहे, ती तरुणांचे भविष्य कधीच घडवू शकत नाही.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस