शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 15:50 IST

जर १४९ देश एकत्र येत असतील आणि आपले पंतप्रधान तिथे जात नसतील तर ही खूप मोठी चूक आहे असं त्यांनी म्हटलं.

मुंबई - इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्षाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटत आहेत. इराणच्या बाजूने चीन, रशिया आणि पाकिस्ताननेही भूमिका घेतली आहे तर अमेरिका उघडपणे इस्त्रायलच्या बाजूने उभी राहिली आहे. या दोन्ही देशाच्या संघर्षात भारताने कोणाचीही बाजू न घेता शांततेची भूमिका मांडली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी चूक करतायेत असं म्हणत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी इराण-इस्त्रायल युद्धात भारताच्या भूमिकेवरून टीका केली आहे.

आमदार अबू आझमी म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांनी पॅलेस्टाईन स्वातंत्र्य झाले पाहिजे आणि लवकरात लवकर इस्त्रायलने ते खाली करायला हवे असं म्हटले होते. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यासह जितके पंतप्रधान झाले त्यांनीही पॅलेस्टाईनचं समर्थन केले आणि इस्त्रायलविरोधात भूमिका घेतली होती. आज १४९ देश पॅलेस्टाईनचे समर्थन करत आहेत. तिथे जे अत्याचार होतायेत त्याचा निषेध झाला पाहिजे. पॅलेस्टाईन स्वातंत्र्य झाले पाहिजे अशी मागणी करत आहेत. जर १४९ देश एकत्र येत असतील आणि आपले पंतप्रधान तिथे जात नसतील तर ही खूप मोठी चूक आहे असं त्यांनी म्हटलं.

त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणुनबुजून हे काम करत आहेत. जनता त्यांना माफ करणार नाही. आपल्या जुन्या नेत्यांनी घेतलेल्या भूमिकांविरोधात, आपल्या परराष्ट्र धोरणाविरोधात मोदी काम करत आहेत. हे ठीक नाही असंही आमदार अबू आझमी यांनी सांगितले. सध्या इराण-इस्त्रायल या दोन्ही देशात संघर्ष सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणला धमकी दिली आहे. जर यूएस सैन्य तळांवर हल्ले झाले तर अमेरिका मागे हटणार नाही असा इशारा दिला आहे.

औवेसी यांनी केंद्र सरकारकडे केली मागणी

मध्य पूर्वेत इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षात औवेसी यांनी इराणमध्ये १५९५ भारतीय विद्यार्थी अडकल्याचे सांगितले. त्यातील १४० मेडिकल विद्यार्थी तेहरानमध्ये शिक्षण घेत आहेत. औवेसी यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली. तेलंगणातील या विद्यार्थ्यांना सुरक्षित भारतात आणण्याची मागणी त्यांनी केली. इराण-इस्त्रायल संघर्षामुळे केवळ या २ देशाची नव्हे तर आसपासच्या देशांमधील स्थिती अस्थिर झाली आहे. या देशातील एअरस्पेस बंद आहेत. सातत्याने मिसाईल, ड्रोन हवाई हल्ल्यांच्या बातम्या पुढे येत आहेत. त्यामुळे इराण आणि इस्त्रायलमधील भारतीय दूतावास कार्यालयाने तिथल्या भारतीय नागरिकांना सतर्क आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :IndiaभारतIranइराणIsraelइस्रायलAbu Azmiअबू आझमीNarendra Modiनरेंद्र मोदी