शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 15:50 IST

जर १४९ देश एकत्र येत असतील आणि आपले पंतप्रधान तिथे जात नसतील तर ही खूप मोठी चूक आहे असं त्यांनी म्हटलं.

मुंबई - इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्षाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटत आहेत. इराणच्या बाजूने चीन, रशिया आणि पाकिस्ताननेही भूमिका घेतली आहे तर अमेरिका उघडपणे इस्त्रायलच्या बाजूने उभी राहिली आहे. या दोन्ही देशाच्या संघर्षात भारताने कोणाचीही बाजू न घेता शांततेची भूमिका मांडली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी चूक करतायेत असं म्हणत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी इराण-इस्त्रायल युद्धात भारताच्या भूमिकेवरून टीका केली आहे.

आमदार अबू आझमी म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांनी पॅलेस्टाईन स्वातंत्र्य झाले पाहिजे आणि लवकरात लवकर इस्त्रायलने ते खाली करायला हवे असं म्हटले होते. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यासह जितके पंतप्रधान झाले त्यांनीही पॅलेस्टाईनचं समर्थन केले आणि इस्त्रायलविरोधात भूमिका घेतली होती. आज १४९ देश पॅलेस्टाईनचे समर्थन करत आहेत. तिथे जे अत्याचार होतायेत त्याचा निषेध झाला पाहिजे. पॅलेस्टाईन स्वातंत्र्य झाले पाहिजे अशी मागणी करत आहेत. जर १४९ देश एकत्र येत असतील आणि आपले पंतप्रधान तिथे जात नसतील तर ही खूप मोठी चूक आहे असं त्यांनी म्हटलं.

त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणुनबुजून हे काम करत आहेत. जनता त्यांना माफ करणार नाही. आपल्या जुन्या नेत्यांनी घेतलेल्या भूमिकांविरोधात, आपल्या परराष्ट्र धोरणाविरोधात मोदी काम करत आहेत. हे ठीक नाही असंही आमदार अबू आझमी यांनी सांगितले. सध्या इराण-इस्त्रायल या दोन्ही देशात संघर्ष सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणला धमकी दिली आहे. जर यूएस सैन्य तळांवर हल्ले झाले तर अमेरिका मागे हटणार नाही असा इशारा दिला आहे.

औवेसी यांनी केंद्र सरकारकडे केली मागणी

मध्य पूर्वेत इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षात औवेसी यांनी इराणमध्ये १५९५ भारतीय विद्यार्थी अडकल्याचे सांगितले. त्यातील १४० मेडिकल विद्यार्थी तेहरानमध्ये शिक्षण घेत आहेत. औवेसी यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली. तेलंगणातील या विद्यार्थ्यांना सुरक्षित भारतात आणण्याची मागणी त्यांनी केली. इराण-इस्त्रायल संघर्षामुळे केवळ या २ देशाची नव्हे तर आसपासच्या देशांमधील स्थिती अस्थिर झाली आहे. या देशातील एअरस्पेस बंद आहेत. सातत्याने मिसाईल, ड्रोन हवाई हल्ल्यांच्या बातम्या पुढे येत आहेत. त्यामुळे इराण आणि इस्त्रायलमधील भारतीय दूतावास कार्यालयाने तिथल्या भारतीय नागरिकांना सतर्क आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :IndiaभारतIranइराणIsraelइस्रायलAbu Azmiअबू आझमीNarendra Modiनरेंद्र मोदी