शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

'माझा 100 दिवसांचा प्लॅन तयार आहे...', लोकसभेपूर्वीच मोदींनी सुरू केली तिसऱ्या टर्मची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 19:40 IST

'आपल्या देशाला अजून कशाची गरज आहे, हे मी जाणतो. 2047 डोळ्यासमोर ठेवून मी गेली दोन वर्षे काम करत आहे.'

PM Narendra Modi Interview: लोकसभा निवडणुकीचा प्रचार शीगेला पोहचला आहे. सर्व पक्षांचे नेते विविध ठिकाणी रॅली-प्रचारसभा घेत आहेत. अशातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विरोधकांना तुरुंगात पाठवल्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपांचे खंडन करत म्हटले की, अंमलबजावणी संचालनालयाने नोंदवलेले बहुतांश खटले अशा व्यक्ती आणि संस्थांविरुद्ध आहेत, ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. प्रामाणिक व्यक्तीला घाबरण्याचे कारण नाही, परंतु भ्रष्टाचारी लोकांना सोडले जाणार नाही. यासोबतच त्यांनी तिसऱ्या टर्मची तयारी सुरू असून, 100 दिवसांच्या योजना तयार असल्याचा दावाही केला. 

मोदी आपल्या प्रत्येक भाषणात 2024 नाही, तर 2047 लक्ष्य असल्याचे सांगतात. याबाबत बोलताना ते म्हणाले की, माझ्याकडे 25 वर्षांचे व्हिजन आहे. जेव्हा देश स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर अमृत महोत्सव साजरा करत होता, त्यावेळी मी हा विषय सर्वांसमोर ठेवायला सुरुवात केली. 2047 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होतील, साहजिकच हा टप्पा खुप मोठा आहे. या येणाऱ्या 25 वर्षांचा सदुपयोग कसा करावा, हे प्रत्येकाने निश्चित केले पाहिजे. तिसऱ्या टर्मबाबत बोलताना मोदी म्हणाले, यासाठी आमचा 100 दिवसांचा प्लॅन तयार आहे. अजून देशासाठी खूप काही करायचे आहे.

आपल्या देशाला अजून किती आणि कशाची गरज आहे, हे मी जाणतो. म्हणूनच मी नेहमी म्हणतो की, जे झाले ते ट्रेलर आहे, अजून खूप बाकी आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच मी याबाबत नियोजन सुरू केले होते. 2047 डोळ्यासमोर ठेवून मी गेली दोन वर्षे काम करत आहे. येत्या 25 वर्षात देश कसा असावा, याबाबत मी देशातील सुमारे 15 लाख लोकांकडून सूचना घेतल्या. पुढील 25 वर्षांच्या व्हिजनसाठी प्रत्येक विभागात अधिकाऱ्यांची टीम तयार केली. एक व्हिजन डॉक्युमेंट आम्ही तयार करत आहोत. निवडणूक झाल्यानंतर NITI आयोगाची बैठक बोलावून सर्वसमावेशक चर्चा केली जाईल. निवडणुका संपल्याबरोबर सर्व राज्यांनी यावर काम करावे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

 

मोदी पुढे म्हणाले, 2019 च्या निवडणुकीतही मी 100 दिवसांचे काम घेऊन मैदानात उतरलो होतो. आमची पुन्हा सत्ता आली, तेव्हा पहिल्या 100 दिवसांत कलम 370 रद्द केली, पहिल्या 100 दिवसांत मुस्लिम महिलांना तिहेरी तलाकपासून मुक्त केले. सुरक्षेसंदर्भातील UAPA विधेयक 100 दिवसांत मंजूर झाले. बँकांचे विलीनीकरण हे मोठे काम होते, ते आम्ही 100 दिवसांत पूर्ण केले. एवढेच नाही तर, मी जवळपास 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करुन जनावरांच्या लसीकरणासाठी मोठी मोहीम राबवली. हे सर्व मी पहिल्या 100 दिवसात केले. त्यामुळे 100 दिवसांत मला कोणते काम करायचे, याचे नियोजन मी आधीच करतो.

राम मंदिर, सनातन, ईडी-सीबीआय ते इलेक्टोरल बाँड्स... PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस