शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

“येत्या ५ वर्षात केरळला जागतिक वारसा बनवण्याचे काम करू”; पंतप्रधान मोदींनी दिली गॅरंटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 13:42 IST

PM Modi Rally In Palakkad Kerala: काँग्रेसचे युवराज तुमच्याकडून मते मागतील पण केरळ प्रश्नांवर एक शब्दही बोलणार नाही, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

PM Modi Rally In Palakkad Kerala: लोकसभा निवडणूक देशाच्या भवितव्याचे निर्णय घेण्याची निवडणूक आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्याची आणि तुमच्या मुलांच्या उज्ज्वल आयुष्याची हमी देणारी निवडणूक आहे. पलक्कडला केरळचे प्रवेशद्वार असेही म्हणतात. येथील नैसर्गिक सौंदर्य सर्वांनाच भुरळ घालते. केरळमध्ये येथे अनेक मंदिरे, चर्च आणि श्रद्धास्थळे आहेत. येत्या ५ वर्षात आम्ही केरळला जागतिक वारसा बनवण्याचे काम करू. तुमचा पाठिंबा आणि प्रेम पाहून विश्वासाने सांगू शकतो की, केरळने नवीन वर्षाने एक नवीन सुरुवात केली आहे. हे नवीन वर्ष केरळच्या विकासाचे वर्ष असेल आणि हे नवीन वर्ष नव्या राजकारणाच्या सुरुवातीचे वर्ष असेल. केरळवासी आपला एक बुलंद आवाज संसदेत पाठवेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर दौरे करत आहेत. केरळमधील पल्लकड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. यावेळी बोलताना भाजपाच्या संकल्पपत्रातील आश्वासनांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली. एलडीएफ आणि यूडीएफपासून सावध राहा. केरळ काँग्रेस डाव्या लोकांना 'दहशतवादी' म्हणून संबोधते. पण दिल्लीत ते एकत्र बसतात, एकत्र जेवतात आणि निवडणुकीची रणनीती बनवतात. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याला उत्तर प्रदेशातील आपला पारंपारिक, कौटुंबिक मतदारसंघ सोडून लाज वाचवण्यासाठी केरळमध्ये यावे लागले. इथे त्यांनी आपला नवा तळ बनवला. काँग्रेसचे युवराज केरळच्या जनतेकडून मते मागतील पण तुमच्या प्रश्नांवर एक शब्दही बोलणार नाही, या शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला.

भाजपाचे संकल्पपत्र हे देशाच्या विकासाचे संकल्पपत्र आहे

भाजपाने आपला जाहीरनामा संकल्प पत्र प्रसिद्ध केले आहे. भाजपाचे संकल्पपत्र हे देशाच्या विकासाचे संकल्पपत्र आहे. भाजपाच्या संकल्प पत्राला मोदी गॅरंटी आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत केरळमधील ७३ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळाली आहे. आता भाजपाने जाहीर केले आहे की, ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचार दिले जातील आणि ही मोदींची गॅरंटी आहे. भाजपने पुढील पाच वर्षांसाठी 'विकास', 'विरासत' याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. केरळला हायवे एक्स्प्रेसवे आणि हाय-स्पीड वंदे भारत ट्रेन्सच्या नेटवर्कने जोडले जात आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

दरम्यान, एनडीए सरकारने जगभरात भारताची विश्वासार्हता कशी वाढवली, हे केरळच्या जनतेने गेल्या दहा वर्षांत पाहिले आहे. काँग्रेस सरकारने भारताची प्रतिमा कमकुवत देश अशी निर्माण केली होती. भाजपा सरकारने भारताला मजबूत देश बनवले आहे. युद्धात अडकलेल्या आपल्या नागरिकांची सुटका करण्याची ताकद आजच्या भारतामध्ये आहे. केरळमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत ३६ लाखांहून अधिक नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. ज्या गतीने जल जीवन, जल मिशन संपूर्ण देशात राबवले गेले आहे, केरळ सरकार तसे होऊ देत नाही, त्यामुळेच आजही केरळमध्ये घरांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट आहे. केरळमधील प्रत्येक घरांत पाणी पोहोचवण्याची गॅरंटी देतो, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना दिले. 

टॅग्स :kerala Lok Sabha Election 2024केरळ लोकसभा निवडणूक 2024lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी