शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

“येत्या ५ वर्षात केरळला जागतिक वारसा बनवण्याचे काम करू”; पंतप्रधान मोदींनी दिली गॅरंटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 13:42 IST

PM Modi Rally In Palakkad Kerala: काँग्रेसचे युवराज तुमच्याकडून मते मागतील पण केरळ प्रश्नांवर एक शब्दही बोलणार नाही, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

PM Modi Rally In Palakkad Kerala: लोकसभा निवडणूक देशाच्या भवितव्याचे निर्णय घेण्याची निवडणूक आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्याची आणि तुमच्या मुलांच्या उज्ज्वल आयुष्याची हमी देणारी निवडणूक आहे. पलक्कडला केरळचे प्रवेशद्वार असेही म्हणतात. येथील नैसर्गिक सौंदर्य सर्वांनाच भुरळ घालते. केरळमध्ये येथे अनेक मंदिरे, चर्च आणि श्रद्धास्थळे आहेत. येत्या ५ वर्षात आम्ही केरळला जागतिक वारसा बनवण्याचे काम करू. तुमचा पाठिंबा आणि प्रेम पाहून विश्वासाने सांगू शकतो की, केरळने नवीन वर्षाने एक नवीन सुरुवात केली आहे. हे नवीन वर्ष केरळच्या विकासाचे वर्ष असेल आणि हे नवीन वर्ष नव्या राजकारणाच्या सुरुवातीचे वर्ष असेल. केरळवासी आपला एक बुलंद आवाज संसदेत पाठवेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर दौरे करत आहेत. केरळमधील पल्लकड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. यावेळी बोलताना भाजपाच्या संकल्पपत्रातील आश्वासनांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली. एलडीएफ आणि यूडीएफपासून सावध राहा. केरळ काँग्रेस डाव्या लोकांना 'दहशतवादी' म्हणून संबोधते. पण दिल्लीत ते एकत्र बसतात, एकत्र जेवतात आणि निवडणुकीची रणनीती बनवतात. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याला उत्तर प्रदेशातील आपला पारंपारिक, कौटुंबिक मतदारसंघ सोडून लाज वाचवण्यासाठी केरळमध्ये यावे लागले. इथे त्यांनी आपला नवा तळ बनवला. काँग्रेसचे युवराज केरळच्या जनतेकडून मते मागतील पण तुमच्या प्रश्नांवर एक शब्दही बोलणार नाही, या शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला.

भाजपाचे संकल्पपत्र हे देशाच्या विकासाचे संकल्पपत्र आहे

भाजपाने आपला जाहीरनामा संकल्प पत्र प्रसिद्ध केले आहे. भाजपाचे संकल्पपत्र हे देशाच्या विकासाचे संकल्पपत्र आहे. भाजपाच्या संकल्प पत्राला मोदी गॅरंटी आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत केरळमधील ७३ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळाली आहे. आता भाजपाने जाहीर केले आहे की, ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचार दिले जातील आणि ही मोदींची गॅरंटी आहे. भाजपने पुढील पाच वर्षांसाठी 'विकास', 'विरासत' याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. केरळला हायवे एक्स्प्रेसवे आणि हाय-स्पीड वंदे भारत ट्रेन्सच्या नेटवर्कने जोडले जात आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

दरम्यान, एनडीए सरकारने जगभरात भारताची विश्वासार्हता कशी वाढवली, हे केरळच्या जनतेने गेल्या दहा वर्षांत पाहिले आहे. काँग्रेस सरकारने भारताची प्रतिमा कमकुवत देश अशी निर्माण केली होती. भाजपा सरकारने भारताला मजबूत देश बनवले आहे. युद्धात अडकलेल्या आपल्या नागरिकांची सुटका करण्याची ताकद आजच्या भारतामध्ये आहे. केरळमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत ३६ लाखांहून अधिक नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. ज्या गतीने जल जीवन, जल मिशन संपूर्ण देशात राबवले गेले आहे, केरळ सरकार तसे होऊ देत नाही, त्यामुळेच आजही केरळमध्ये घरांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट आहे. केरळमधील प्रत्येक घरांत पाणी पोहोचवण्याची गॅरंटी देतो, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना दिले. 

टॅग्स :kerala Lok Sabha Election 2024केरळ लोकसभा निवडणूक 2024lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी