शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Yaas Cyclone : ​'यास' चक्रीवादळ 'या' दिवशी धडकणार, भीषण रूप घेणार; पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 17:04 IST

Yaas Cyclone And Narendra Modi : यास चक्रीवादळाचा धोका वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.

नवी दिल्ली - तौत्के चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) कहर संपत नाही तोच भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) आणखी एका मोठ्या चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. "यास" चक्रीवादळ (Cyclone Yaas) पूर्वेकडील बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमानही वाढले आहे. यास चक्रीवादळाचा धोका वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित राज्ये, केंद्रीय मंत्रालय आणि संस्थांच्या तयारीचा आढावा घेतला. 

पंतप्रधान मोदींनी समुद्र किनाऱ्यावरील नागरिक, उद्योगांशी संपर्क करावा बचाव कार्यासाठी तयारी करावी. किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवावं, असे निर्देश दिले आहेत. तसेच वीजपुरवठा आणि टेलिफोन यंत्रणा बंद करण्याचा कालावधी हा कमी-कमी ठेवण्याची सूचनाही मोदींनी केली. यास चक्रीवादळ हे 26 मे रोजी संध्याकाळपर्यंत पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या उत्तर किनारपट्टीला धडकेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या उत्तर किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, असं हवामान खात्यानेने म्हटलं आहे.

राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांसह केंद्रीय यंत्रणांच्या संपर्कात आहे. एनडीआरएफने स्थितीचा सामना करण्यासाठी 46 पथकं तैनात केली आहेत. 13 टीम तैनातीसाठी एअरलिफ्ट करण्यात येणार आहेत. एनडीआरएफच्या 10 टीम स्टँडबायवर ठेवण्यात आल्या आहेत. कॅबिनेट सचिवांनी 22 मे रोजी किनारपट्टीवरील सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि संबंधित मंत्रालय आणि संस्थांसोबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थान समितीची बैठक घेतल्याचं मोदींनी म्हटलं आहे. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाने मदत, शोध आणि बचावकार्यासाठी जहाजं आणि हेलिकॉप्टर्स तैनात केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

ओमानने या चक्रीवादळाचे नाव यास असे ठेवले आहे. बंगालच्या उपसागरातील, अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा 2 अंशांनी वाढले आहे. सध्या ते 31 डिग्री सेल्सिअस आहे. असे असले तरीदेखील यास चक्रीवादळ तौक्ते एवढे ताकदवर नाहीय. हे वादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या दिशेने येत आहे, असे अर्थ सायन्सेस मिनिस्ट्रीचे सचिव माधवन राजीवन यांनी सांगितले आहे. तौत्के चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टीवरील गोवा, महाराष्ट्र, गुजरातमध्ये थैमान घातले आहे. आतापर्यत या वादळामुळे 66 जणांचा मृत्यू झाला असून अरबी समुद्रात ओएनजीसीच्या कामगारांची बोट उलटून मोठी दुर्घटना देखील घडली आहे. यामध्ये 14 जणांचे मृतदेह नौदलाला सापडले आहेत. तर 184 जणांना वाचविण्यात यश आले आहे. तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्रातील किनारी भागातील जिल्ह्यांचे मोठे नुकसान केले आहे. घरांवरील छपरे उडून गेली आहेत. जागोजागी झाडे कोसळली आहेत.

 

टॅग्स :cycloneचक्रीवादळTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगाल