शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

Yaas Cyclone : ​'यास' चक्रीवादळ 'या' दिवशी धडकणार, भीषण रूप घेणार; पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 17:04 IST

Yaas Cyclone And Narendra Modi : यास चक्रीवादळाचा धोका वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.

नवी दिल्ली - तौत्के चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) कहर संपत नाही तोच भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) आणखी एका मोठ्या चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. "यास" चक्रीवादळ (Cyclone Yaas) पूर्वेकडील बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमानही वाढले आहे. यास चक्रीवादळाचा धोका वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित राज्ये, केंद्रीय मंत्रालय आणि संस्थांच्या तयारीचा आढावा घेतला. 

पंतप्रधान मोदींनी समुद्र किनाऱ्यावरील नागरिक, उद्योगांशी संपर्क करावा बचाव कार्यासाठी तयारी करावी. किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवावं, असे निर्देश दिले आहेत. तसेच वीजपुरवठा आणि टेलिफोन यंत्रणा बंद करण्याचा कालावधी हा कमी-कमी ठेवण्याची सूचनाही मोदींनी केली. यास चक्रीवादळ हे 26 मे रोजी संध्याकाळपर्यंत पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या उत्तर किनारपट्टीला धडकेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या उत्तर किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, असं हवामान खात्यानेने म्हटलं आहे.

राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांसह केंद्रीय यंत्रणांच्या संपर्कात आहे. एनडीआरएफने स्थितीचा सामना करण्यासाठी 46 पथकं तैनात केली आहेत. 13 टीम तैनातीसाठी एअरलिफ्ट करण्यात येणार आहेत. एनडीआरएफच्या 10 टीम स्टँडबायवर ठेवण्यात आल्या आहेत. कॅबिनेट सचिवांनी 22 मे रोजी किनारपट्टीवरील सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि संबंधित मंत्रालय आणि संस्थांसोबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थान समितीची बैठक घेतल्याचं मोदींनी म्हटलं आहे. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाने मदत, शोध आणि बचावकार्यासाठी जहाजं आणि हेलिकॉप्टर्स तैनात केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

ओमानने या चक्रीवादळाचे नाव यास असे ठेवले आहे. बंगालच्या उपसागरातील, अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा 2 अंशांनी वाढले आहे. सध्या ते 31 डिग्री सेल्सिअस आहे. असे असले तरीदेखील यास चक्रीवादळ तौक्ते एवढे ताकदवर नाहीय. हे वादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या दिशेने येत आहे, असे अर्थ सायन्सेस मिनिस्ट्रीचे सचिव माधवन राजीवन यांनी सांगितले आहे. तौत्के चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टीवरील गोवा, महाराष्ट्र, गुजरातमध्ये थैमान घातले आहे. आतापर्यत या वादळामुळे 66 जणांचा मृत्यू झाला असून अरबी समुद्रात ओएनजीसीच्या कामगारांची बोट उलटून मोठी दुर्घटना देखील घडली आहे. यामध्ये 14 जणांचे मृतदेह नौदलाला सापडले आहेत. तर 184 जणांना वाचविण्यात यश आले आहे. तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्रातील किनारी भागातील जिल्ह्यांचे मोठे नुकसान केले आहे. घरांवरील छपरे उडून गेली आहेत. जागोजागी झाडे कोसळली आहेत.

 

टॅग्स :cycloneचक्रीवादळTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगाल