शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Yaas Cyclone : ​'यास' चक्रीवादळ 'या' दिवशी धडकणार, भीषण रूप घेणार; पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 17:04 IST

Yaas Cyclone And Narendra Modi : यास चक्रीवादळाचा धोका वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.

नवी दिल्ली - तौत्के चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) कहर संपत नाही तोच भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) आणखी एका मोठ्या चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. "यास" चक्रीवादळ (Cyclone Yaas) पूर्वेकडील बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमानही वाढले आहे. यास चक्रीवादळाचा धोका वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित राज्ये, केंद्रीय मंत्रालय आणि संस्थांच्या तयारीचा आढावा घेतला. 

पंतप्रधान मोदींनी समुद्र किनाऱ्यावरील नागरिक, उद्योगांशी संपर्क करावा बचाव कार्यासाठी तयारी करावी. किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवावं, असे निर्देश दिले आहेत. तसेच वीजपुरवठा आणि टेलिफोन यंत्रणा बंद करण्याचा कालावधी हा कमी-कमी ठेवण्याची सूचनाही मोदींनी केली. यास चक्रीवादळ हे 26 मे रोजी संध्याकाळपर्यंत पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या उत्तर किनारपट्टीला धडकेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या उत्तर किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, असं हवामान खात्यानेने म्हटलं आहे.

राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांसह केंद्रीय यंत्रणांच्या संपर्कात आहे. एनडीआरएफने स्थितीचा सामना करण्यासाठी 46 पथकं तैनात केली आहेत. 13 टीम तैनातीसाठी एअरलिफ्ट करण्यात येणार आहेत. एनडीआरएफच्या 10 टीम स्टँडबायवर ठेवण्यात आल्या आहेत. कॅबिनेट सचिवांनी 22 मे रोजी किनारपट्टीवरील सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि संबंधित मंत्रालय आणि संस्थांसोबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थान समितीची बैठक घेतल्याचं मोदींनी म्हटलं आहे. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाने मदत, शोध आणि बचावकार्यासाठी जहाजं आणि हेलिकॉप्टर्स तैनात केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

ओमानने या चक्रीवादळाचे नाव यास असे ठेवले आहे. बंगालच्या उपसागरातील, अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा 2 अंशांनी वाढले आहे. सध्या ते 31 डिग्री सेल्सिअस आहे. असे असले तरीदेखील यास चक्रीवादळ तौक्ते एवढे ताकदवर नाहीय. हे वादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या दिशेने येत आहे, असे अर्थ सायन्सेस मिनिस्ट्रीचे सचिव माधवन राजीवन यांनी सांगितले आहे. तौत्के चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टीवरील गोवा, महाराष्ट्र, गुजरातमध्ये थैमान घातले आहे. आतापर्यत या वादळामुळे 66 जणांचा मृत्यू झाला असून अरबी समुद्रात ओएनजीसीच्या कामगारांची बोट उलटून मोठी दुर्घटना देखील घडली आहे. यामध्ये 14 जणांचे मृतदेह नौदलाला सापडले आहेत. तर 184 जणांना वाचविण्यात यश आले आहे. तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्रातील किनारी भागातील जिल्ह्यांचे मोठे नुकसान केले आहे. घरांवरील छपरे उडून गेली आहेत. जागोजागी झाडे कोसळली आहेत.

 

टॅग्स :cycloneचक्रीवादळTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगाल