शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

"अयोध्येत राम जन्मभूमीसाठी पहिली लढाई शिखांनीच लढवली", शेवटच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 13:20 IST

Lok Sabha Elections 2024 : पंजाबमधील होशियारपूरमध्येही सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा येथे घेतली.

लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. यासाठी आज म्हणजेच गुरुवारी निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. पंजाबमधील होशियारपूरमध्येही सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा येथे घेतली. यावेळी जनतेला संबोधित करताना ते म्हणाले की, पंजाब ही आपल्या भारताची ओळख आहे, ती आपल्या गुरुंची पवित्र भूमी आहे. तसेच, अयोध्येत राम जन्मभूमीसाठी पहिली लढाई शिखांनीच लढवली होती, असे विधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

आज देशातील आकांक्षा नवीन आहेत, आज देशातील अपेक्षा नवीन आहेत, आज देशाचा आत्मविश्वास नवीन आहे. अनेक दशकांनंतर अशी वेळ आली असून, पूर्ण बहुमत असलेले केंद्र सरकार हॅट्ट्रिक करणार आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे 'विकसित भारत'चे स्वप्न आहे. आज प्रत्येक भारतीय 'विकसित भारत'चे स्वप्न घेऊन एकजूट झाला आहे आणि म्हणूनच प्रत्येक देशवासीय आपल्याला आशीर्वाद देत आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

जनता जनार्दनने मोदी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकार हॅट्ट्रिक करणार आहे. २१ वे शतक हे भारताचे शतक असेल. एक मजबूत सरकार जे शत्रूचा पराभव करू शकते. तसेच, सरकारने रोडमॅप तयार केला आहे. पुढील ५ वर्षात कोणते मोठे निर्णय घेतले जाणार आहेत, हे सुद्धा निश्चित करण्यात आले आहे. १२५ दिवसांचा रोडमॅप तयार आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

याचबरोबर, स्वत: काशीचा खासदार असल्याचे सांगत जेव्हा जेव्हा तुम्ही काशीला याल तेव्हा तुम्ही माझे पाहुणे आहात आणि मी पाहुणचार करण्यात कोणतीही कसर सोडत नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, मध्य प्रदेशातील रविदास मंदिराची पायाभरणी करण्याचे सौभाग्य मला मिळाले. आम्ही अयोध्येत रामाचे मंदिर बांधले आहे. राम मंदिर बांधले, पण तुमच्या सोयीसाठी महर्षी वाल्मिकी विमानतळ सुद्धा बांधले. त्याचप्रमाणे आदमपूर विमानतळालाही गुरु रविदासांचे नाव द्यावे, अशी माझी इच्छा आहे. सरकार स्थापन झाल्यावर याची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिले.

या सभेत नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवरही निशाणा साधला. इंडिआ आघाडीच्या स्वार्थी राजकारणामुळे देशाचे खूप नुकसान झाले. व्होट बँकेमुळे इंडिया आघाडी CAA ला विरोध करत आहे. व्होट बँकेसाठी ते राममंदिराला विरोध करत राहिले. विरोधकांना धर्माच्या आधारे आरक्षण द्यायचे आहे. आणीबाणीच्या काळात त्यांनी संविधानाचा गळा घोटला. १९८४ च्या दंगलीत शीख बांधवांना गळ्यात टायर बांधून जाळले जात होते, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

टॅग्स :punjab Lok Sabha Election 2024Punjab Lok Sabha Election 2024lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा