शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

"अयोध्येत राम जन्मभूमीसाठी पहिली लढाई शिखांनीच लढवली", शेवटच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 13:20 IST

Lok Sabha Elections 2024 : पंजाबमधील होशियारपूरमध्येही सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा येथे घेतली.

लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. यासाठी आज म्हणजेच गुरुवारी निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. पंजाबमधील होशियारपूरमध्येही सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा येथे घेतली. यावेळी जनतेला संबोधित करताना ते म्हणाले की, पंजाब ही आपल्या भारताची ओळख आहे, ती आपल्या गुरुंची पवित्र भूमी आहे. तसेच, अयोध्येत राम जन्मभूमीसाठी पहिली लढाई शिखांनीच लढवली होती, असे विधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

आज देशातील आकांक्षा नवीन आहेत, आज देशातील अपेक्षा नवीन आहेत, आज देशाचा आत्मविश्वास नवीन आहे. अनेक दशकांनंतर अशी वेळ आली असून, पूर्ण बहुमत असलेले केंद्र सरकार हॅट्ट्रिक करणार आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे 'विकसित भारत'चे स्वप्न आहे. आज प्रत्येक भारतीय 'विकसित भारत'चे स्वप्न घेऊन एकजूट झाला आहे आणि म्हणूनच प्रत्येक देशवासीय आपल्याला आशीर्वाद देत आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

जनता जनार्दनने मोदी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकार हॅट्ट्रिक करणार आहे. २१ वे शतक हे भारताचे शतक असेल. एक मजबूत सरकार जे शत्रूचा पराभव करू शकते. तसेच, सरकारने रोडमॅप तयार केला आहे. पुढील ५ वर्षात कोणते मोठे निर्णय घेतले जाणार आहेत, हे सुद्धा निश्चित करण्यात आले आहे. १२५ दिवसांचा रोडमॅप तयार आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

याचबरोबर, स्वत: काशीचा खासदार असल्याचे सांगत जेव्हा जेव्हा तुम्ही काशीला याल तेव्हा तुम्ही माझे पाहुणे आहात आणि मी पाहुणचार करण्यात कोणतीही कसर सोडत नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, मध्य प्रदेशातील रविदास मंदिराची पायाभरणी करण्याचे सौभाग्य मला मिळाले. आम्ही अयोध्येत रामाचे मंदिर बांधले आहे. राम मंदिर बांधले, पण तुमच्या सोयीसाठी महर्षी वाल्मिकी विमानतळ सुद्धा बांधले. त्याचप्रमाणे आदमपूर विमानतळालाही गुरु रविदासांचे नाव द्यावे, अशी माझी इच्छा आहे. सरकार स्थापन झाल्यावर याची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिले.

या सभेत नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवरही निशाणा साधला. इंडिआ आघाडीच्या स्वार्थी राजकारणामुळे देशाचे खूप नुकसान झाले. व्होट बँकेमुळे इंडिया आघाडी CAA ला विरोध करत आहे. व्होट बँकेसाठी ते राममंदिराला विरोध करत राहिले. विरोधकांना धर्माच्या आधारे आरक्षण द्यायचे आहे. आणीबाणीच्या काळात त्यांनी संविधानाचा गळा घोटला. १९८४ च्या दंगलीत शीख बांधवांना गळ्यात टायर बांधून जाळले जात होते, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

टॅग्स :punjab Lok Sabha Election 2024Punjab Lok Sabha Election 2024lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा