शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

"अयोध्येत राम जन्मभूमीसाठी पहिली लढाई शिखांनीच लढवली", शेवटच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 13:20 IST

Lok Sabha Elections 2024 : पंजाबमधील होशियारपूरमध्येही सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा येथे घेतली.

लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. यासाठी आज म्हणजेच गुरुवारी निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. पंजाबमधील होशियारपूरमध्येही सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा येथे घेतली. यावेळी जनतेला संबोधित करताना ते म्हणाले की, पंजाब ही आपल्या भारताची ओळख आहे, ती आपल्या गुरुंची पवित्र भूमी आहे. तसेच, अयोध्येत राम जन्मभूमीसाठी पहिली लढाई शिखांनीच लढवली होती, असे विधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

आज देशातील आकांक्षा नवीन आहेत, आज देशातील अपेक्षा नवीन आहेत, आज देशाचा आत्मविश्वास नवीन आहे. अनेक दशकांनंतर अशी वेळ आली असून, पूर्ण बहुमत असलेले केंद्र सरकार हॅट्ट्रिक करणार आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे 'विकसित भारत'चे स्वप्न आहे. आज प्रत्येक भारतीय 'विकसित भारत'चे स्वप्न घेऊन एकजूट झाला आहे आणि म्हणूनच प्रत्येक देशवासीय आपल्याला आशीर्वाद देत आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

जनता जनार्दनने मोदी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकार हॅट्ट्रिक करणार आहे. २१ वे शतक हे भारताचे शतक असेल. एक मजबूत सरकार जे शत्रूचा पराभव करू शकते. तसेच, सरकारने रोडमॅप तयार केला आहे. पुढील ५ वर्षात कोणते मोठे निर्णय घेतले जाणार आहेत, हे सुद्धा निश्चित करण्यात आले आहे. १२५ दिवसांचा रोडमॅप तयार आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

याचबरोबर, स्वत: काशीचा खासदार असल्याचे सांगत जेव्हा जेव्हा तुम्ही काशीला याल तेव्हा तुम्ही माझे पाहुणे आहात आणि मी पाहुणचार करण्यात कोणतीही कसर सोडत नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, मध्य प्रदेशातील रविदास मंदिराची पायाभरणी करण्याचे सौभाग्य मला मिळाले. आम्ही अयोध्येत रामाचे मंदिर बांधले आहे. राम मंदिर बांधले, पण तुमच्या सोयीसाठी महर्षी वाल्मिकी विमानतळ सुद्धा बांधले. त्याचप्रमाणे आदमपूर विमानतळालाही गुरु रविदासांचे नाव द्यावे, अशी माझी इच्छा आहे. सरकार स्थापन झाल्यावर याची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिले.

या सभेत नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवरही निशाणा साधला. इंडिआ आघाडीच्या स्वार्थी राजकारणामुळे देशाचे खूप नुकसान झाले. व्होट बँकेमुळे इंडिया आघाडी CAA ला विरोध करत आहे. व्होट बँकेसाठी ते राममंदिराला विरोध करत राहिले. विरोधकांना धर्माच्या आधारे आरक्षण द्यायचे आहे. आणीबाणीच्या काळात त्यांनी संविधानाचा गळा घोटला. १९८४ च्या दंगलीत शीख बांधवांना गळ्यात टायर बांधून जाळले जात होते, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

टॅग्स :punjab Lok Sabha Election 2024Punjab Lok Sabha Election 2024lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा