शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

धोरण योग्य असेल, हेतू स्पष्ट असेल तर, नशीबही बदलतं: पंतप्रधान नरेंद्र मोदी

By देवेश फडके | Updated: February 22, 2021 13:31 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आसाम आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. आगामी काळात आसाममध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान मोदी आसाममध्ये गेले आहेत. यावेळी जनतेला संबोधित करताना नीती आणि नियत चांगली असेल, तर नियती बदलते, असे म्हटले आहे.

ठळक मुद्देविकासाच्या डबल इंजिनला मजबूत करावे - पंतप्रधानरोजगाराच्या संधी वाढणार - पंतप्रधानसबका साथ, सबका विकास, सबका विश्वास - पंतप्रधान

दिसपूर :पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आसाम आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. आगामी काळात आसाममध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान मोदी आसाममध्ये गेले आहेत. यावेळी जनतेला संबोधित करताना नीती आणि नियत चांगली असेल, तर नियती बदलते, असे म्हटले आहे. (pm narendra modi address at assam during inaugurate many projects)

आसाममध्ये पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे काम करत आहेत. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करायचे असेल, तर आपले सामर्थ्य आणि क्षमता या दोन्हींमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. धोरणे चांगली असतील, ती राबवण्यासाठी वृत्ती चांगली असेल, तर परिस्थितीही बदलते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना नमूद केले. 

करून दाखवलं! चार राज्यात पेट्रोल-डिझेलची दरकपात; ग्राहकांना दिलासा

विकासाच्या डबल इंजिनला मजबूत करावे

आसामवासीयांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वोतोपरी काम केले जात आहे. विकासाचे डबल इंजिन मजबूत करावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी आसामच्या जनतेला केले. दशकांपासून राज्य करणाऱ्यांनी दिसपूरला दिल्लीपासून नेहमीच दूर ठेवले. त्यामुळे आसामचे मोठे नुकसान झाले. मात्र, दिल्ली आता दिसपूरसाठी दूर राहिलेली नाही. आसामच्या जनतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असल्याचा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

रोजगाराच्या संधी वाढणार

आसाममध्ये लोकार्पण करण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आसाममधील जनतेला मूलभूत सुविधा मिळतील. आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. यामुळे आसामसह देशाच्या विकासाला प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळेल, असा आशावाद पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. 

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, या मंत्रावरच केंद्रातील सरकार काम करत आहे. केंद्र सरकारने भेदभाव दूर करण्यावर भर दिला आहे. देशवासीयांना वीज, गॅस, इंटरनेट देण्याचे काम केंद्र सरकारने प्रभावीपणे केले आहे. गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत या सोयी, सुविधांमध्ये अनेक पटींमध्ये वाढ झाली आहे. गरिबांचा जीवनस्तर सुधारावा हेच आमचे ध्येय आहे आणि नवीन सुधारणांमुळे फायदा मिळेल, असेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

टॅग्स :Assamआसामprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा