शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

धोरण योग्य असेल, हेतू स्पष्ट असेल तर, नशीबही बदलतं: पंतप्रधान नरेंद्र मोदी

By देवेश फडके | Updated: February 22, 2021 13:31 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आसाम आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. आगामी काळात आसाममध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान मोदी आसाममध्ये गेले आहेत. यावेळी जनतेला संबोधित करताना नीती आणि नियत चांगली असेल, तर नियती बदलते, असे म्हटले आहे.

ठळक मुद्देविकासाच्या डबल इंजिनला मजबूत करावे - पंतप्रधानरोजगाराच्या संधी वाढणार - पंतप्रधानसबका साथ, सबका विकास, सबका विश्वास - पंतप्रधान

दिसपूर :पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आसाम आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. आगामी काळात आसाममध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान मोदी आसाममध्ये गेले आहेत. यावेळी जनतेला संबोधित करताना नीती आणि नियत चांगली असेल, तर नियती बदलते, असे म्हटले आहे. (pm narendra modi address at assam during inaugurate many projects)

आसाममध्ये पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे काम करत आहेत. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करायचे असेल, तर आपले सामर्थ्य आणि क्षमता या दोन्हींमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. धोरणे चांगली असतील, ती राबवण्यासाठी वृत्ती चांगली असेल, तर परिस्थितीही बदलते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना नमूद केले. 

करून दाखवलं! चार राज्यात पेट्रोल-डिझेलची दरकपात; ग्राहकांना दिलासा

विकासाच्या डबल इंजिनला मजबूत करावे

आसामवासीयांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वोतोपरी काम केले जात आहे. विकासाचे डबल इंजिन मजबूत करावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी आसामच्या जनतेला केले. दशकांपासून राज्य करणाऱ्यांनी दिसपूरला दिल्लीपासून नेहमीच दूर ठेवले. त्यामुळे आसामचे मोठे नुकसान झाले. मात्र, दिल्ली आता दिसपूरसाठी दूर राहिलेली नाही. आसामच्या जनतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असल्याचा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

रोजगाराच्या संधी वाढणार

आसाममध्ये लोकार्पण करण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आसाममधील जनतेला मूलभूत सुविधा मिळतील. आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. यामुळे आसामसह देशाच्या विकासाला प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळेल, असा आशावाद पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. 

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, या मंत्रावरच केंद्रातील सरकार काम करत आहे. केंद्र सरकारने भेदभाव दूर करण्यावर भर दिला आहे. देशवासीयांना वीज, गॅस, इंटरनेट देण्याचे काम केंद्र सरकारने प्रभावीपणे केले आहे. गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत या सोयी, सुविधांमध्ये अनेक पटींमध्ये वाढ झाली आहे. गरिबांचा जीवनस्तर सुधारावा हेच आमचे ध्येय आहे आणि नवीन सुधारणांमुळे फायदा मिळेल, असेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

टॅग्स :Assamआसामprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा