शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 20:19 IST

संविधान दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी २६/११ दहशतवादी हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.

Constitution Day Celebration: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या प्रत्येक दहशतवादी संघटनेला उत्तर देण्याचे आश्वासन दिलं आहे. पंतप्रधान मोदींनी संविधानाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिला. तसेच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १६ वर्षे पूर्ण होत असतानाच दहशतवादी संघटनांना इशारा दिला आहे. संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयातील वकील आणि कर्मचाऱ्यांना संबोधित केले.

"भारतीय राज्यघटनेचे हे ७५ वे वर्ष संपूर्ण देशासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे. आज मी भारतीय राज्यघटनेला आणि संविधान सभेच्या सर्व सदस्यांना आदरपूर्वक अभिवादन करतो. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या सणाचे स्मरण करत असताना आज मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची वर्षपूर्तीही आपण विसरू शकत नाही. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. भारताच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या प्रत्येक दहशतवादी संघटनेला चोख प्रत्युत्तर दिले जाईल या देशाच्या संकल्पाचाही मी पुनरुच्चार करतो," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं.

२६ नोव्हेंबर २००८ साली पाकिस्तानातील १० लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश केला आणि ताजमहाल पॅलेस हॉटेल, ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल, सीएसटी रेल्वे स्टेशन आणि नरिमन हाऊससह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले. भारतीय भूमीवरील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात १६६ जणांना प्राण गमवावे लागले आणि ३०० हून अधिक जण जखमी झाले होते.

"आपल्या राज्यघटनेच्या निर्मात्यांना माहित होते की भारताच्या आकांक्षा, भारताची स्वप्ने काळाबरोबर नवीन उंची गाठतील. त्यांना माहित होते की स्वतंत्र भारताच्या आणि भारतातील नागरिकांच्या गरजा बदलतील, आव्हाने बदलतील. त्यामुळे त्यांनी आपली राज्यघटना केवळ कायद्याचे पुस्तक न ठेवता त्याला एक जिवंत, अखंड वाहणारा प्रवाह बनवला. आपले संविधान हे आपल्या वर्तमान आणि भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. आज प्रत्येक देशवासीयाचे एकमेव उद्दिष्ट विकसित भारत घडवणे हे आहे. भारतीयांना जलद न्याय मिळावा यासाठी नवीन न्यायिक संहिता लागू करण्यात आली आहे. शिक्षा आधारित प्रणाली आता न्याय आधारित प्रणालीमध्ये बदलली आहे," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

"गेल्या १० वर्षात पिढ्यानपिढ्या बेघर झालेल्या ४ कोटी भारतीयांना कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत. गेल्या १० वर्षात १० कोटींहून अधिक महिलांना मोफत गॅस कनेक्शन मिळाले आहेत, ज्या घरोघरी गॅस पोहोचण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहत होत्या," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. 

टॅग्स :MumbaiमुंबईNarendra Modiनरेंद्र मोदी26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला