शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 20:19 IST

संविधान दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी २६/११ दहशतवादी हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.

Constitution Day Celebration: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या प्रत्येक दहशतवादी संघटनेला उत्तर देण्याचे आश्वासन दिलं आहे. पंतप्रधान मोदींनी संविधानाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिला. तसेच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १६ वर्षे पूर्ण होत असतानाच दहशतवादी संघटनांना इशारा दिला आहे. संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयातील वकील आणि कर्मचाऱ्यांना संबोधित केले.

"भारतीय राज्यघटनेचे हे ७५ वे वर्ष संपूर्ण देशासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे. आज मी भारतीय राज्यघटनेला आणि संविधान सभेच्या सर्व सदस्यांना आदरपूर्वक अभिवादन करतो. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या सणाचे स्मरण करत असताना आज मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची वर्षपूर्तीही आपण विसरू शकत नाही. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. भारताच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या प्रत्येक दहशतवादी संघटनेला चोख प्रत्युत्तर दिले जाईल या देशाच्या संकल्पाचाही मी पुनरुच्चार करतो," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं.

२६ नोव्हेंबर २००८ साली पाकिस्तानातील १० लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश केला आणि ताजमहाल पॅलेस हॉटेल, ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल, सीएसटी रेल्वे स्टेशन आणि नरिमन हाऊससह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले. भारतीय भूमीवरील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात १६६ जणांना प्राण गमवावे लागले आणि ३०० हून अधिक जण जखमी झाले होते.

"आपल्या राज्यघटनेच्या निर्मात्यांना माहित होते की भारताच्या आकांक्षा, भारताची स्वप्ने काळाबरोबर नवीन उंची गाठतील. त्यांना माहित होते की स्वतंत्र भारताच्या आणि भारतातील नागरिकांच्या गरजा बदलतील, आव्हाने बदलतील. त्यामुळे त्यांनी आपली राज्यघटना केवळ कायद्याचे पुस्तक न ठेवता त्याला एक जिवंत, अखंड वाहणारा प्रवाह बनवला. आपले संविधान हे आपल्या वर्तमान आणि भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. आज प्रत्येक देशवासीयाचे एकमेव उद्दिष्ट विकसित भारत घडवणे हे आहे. भारतीयांना जलद न्याय मिळावा यासाठी नवीन न्यायिक संहिता लागू करण्यात आली आहे. शिक्षा आधारित प्रणाली आता न्याय आधारित प्रणालीमध्ये बदलली आहे," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

"गेल्या १० वर्षात पिढ्यानपिढ्या बेघर झालेल्या ४ कोटी भारतीयांना कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत. गेल्या १० वर्षात १० कोटींहून अधिक महिलांना मोफत गॅस कनेक्शन मिळाले आहेत, ज्या घरोघरी गॅस पोहोचण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहत होत्या," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. 

टॅग्स :MumbaiमुंबईNarendra Modiनरेंद्र मोदी26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला