शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

"भाजपचा २०२४ला बिहारमधून सफाया होईल"; नितीश कुमारांचे रोखठोक प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 14:19 IST

पंतप्रधान मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणावरून साधला निशाणा

Narendra Modi Vs Nitish Kumar Tejashwi Yadav, Bihar Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधकांच्या अविश्वास ठरावावरील चर्चेला उत्तर दिले. सुमारे 133 मिनिटांच्या उत्तरात पंतप्रधान मोदींनी विरोधी आघाडी I.N.D.I.A. वर निशाणा साधला आणि त्याला 'अहंकारी युती' म्हटले. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नितीश कुमार म्हणाले की, मोदी सरकार विरोधकांच्या आघाडीवर नाराज आहेत. तर तेजस्वी म्हणाले की, पीएम मोदी विरोधी आघाडीला घाबरतात, म्हणूनच ते आमच्या आघाडीला अहंकारी म्हणत आहेत.

पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत नितीश कुमार म्हणाले. "संसदेत कार्यवाही सुरूच असते पण, ते बाहेर फिरत राहतात. मोदी सरकार आमच्या विरोधी आघाडी 'इंडिया'वर नाराज आहे. पण 'इंडिया' आघाडी देश आणि राज्याच्या हितासाठी स्थापन करण्यात आली आहे. हे लोक (भाजपा सरकार) काम करत नाहीत, फक्त बोलत राहतात. बिहारमध्ये पंतप्रधानांना त्यांची घोषणा पूर्ण करता आली नाही. त्यांनी बिहारला विशेष दर्जा दिला नाही. तो दिला असता तर आणखी विकास झाला असता. ते म्हणाले, 2005 आणि 2010 च्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला जास्त जागा मिळाल्या होत्या, पण 2020 मध्ये त्यांनी एजंट (चिराग पासवान) मैदानात उतरवून आमचा पराभव केला. 2024 च्या निवडणुकीत बिहारमधून भाजपचा सफाया होईल," असा इशारा त्यांनी दिला.

तेजस्वी यादवही म्हणाले...

तेजस्वी यादव यांनीही पीएम मोदींवर निशाणा साधला. "विरोधक एकत्र येत आहेत. मोदीजींना याची भीती वाटते, म्हणूनच ते विरोधी आघाडीला अहंकारी म्हणत आहेत. काल पीएम मोदी चौकार आणि षटकारांबद्दल बोलत होते, पण त्यांचा केवळ भ्रम आहे. योग्य वेळ आली की त्यांना प्रत्यय येईल," अशा शब्दांत तेजस्वी यादव यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीTejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहार