शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

'जामिनावर बाहेर असलेले माय-लेक नोटाबंदी का केली ते विचारताहेत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 20:26 IST

पंतप्रधान मोदींची राहुल आणि सोनिया गांधींवर सडकून टीका

मंदसौर: कोट्यवधी रुपयांची हेराफेरी करुन जामिवावर फिरणारे माय-लेक नोटाबंदी का केली असा आम्हाला विचारतात, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधींना लक्ष्य केलं. तुमचे गैरव्यवहार लोकांसमोर आणण्यासाठीच आम्हाला नोटाबंदी करावी लागली, अशी टीका पंतप्रधानांनी केली. ते मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये बोलत होते. काँग्रेस पक्ष म्हणजे खोटं बोलणाऱ्यांची फौज असल्याची टीका मोदींनी केली. 'खोटं बोलणाऱ्यांची फौज सध्या इतकं खोटं बोलतेय की त्यातही ते संभ्रमात पडतात, असा टोला त्यांनी लगावला. 'दिल्लीतल्या एसी खोलीत बसणाऱ्या लोकांना निवडणुकीचा अंदाज नाही. मध्य प्रदेशातभाजपाचं सरकार आणण्याचा निश्चय जनतेनं केला आहे. माझ्या समोर असलेली गर्दी हेच सांगते,' असं मोदींनी म्हटलं. सरदार वल्लभभाई पटेल खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं नेते होते. जर ते देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते, तर शेतकरी उद्ध्वस्त झाला नसता, असं पंतप्रधान म्हणाले. आम्ही सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांना सांगितलं. 'आज देशात खताची समस्या कमी झाली. हे काम भाजपा सरकारनं केलं. काँग्रेसच्या 55 वर्षांच्या सत्ताकाळात जितकं सिंचन झालं, त्यापेक्षा पाचपट सिंचनाचं काम गेल्या 15 वर्षांमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारनं केलं. काँग्रेसनं शेतकऱ्यांना कर्जबाजारी केलं. मात्र आम्ही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम केलं,' असा दावादेखील त्यांनी केला.  

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Madhya Pradeshमध्य प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस