शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याची काँग्रेसची तयारी नव्हती; राज्यसभेतून मोदींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 15:11 IST

PM Modi Rajya Sabha Speech: राज्यसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. 

मंगळवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर आज राज्यसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेसला फटकारताना मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, बंगालमधून त्यांच्यासमोर आव्हान आले आहे की, काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीत ४० जागा देखील जिंकू शकणार नाही. मी त्यांच्यासाठी ४० जागा याव्यात अशी प्रार्थना करतो, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला. आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही पंतप्रधानांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. 

मोदी म्हणाले की, मला वाटते की जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर ST SC ला आरक्षण मिळाले असते की नाही याबाबत मला शंका वाटते. भाजपाच्या सहकार्यामुळे बाबासाहेबांना भारतरत्न देण्यात आला. बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचे राजकारण संपवायला काँग्रेसवाले निघाले होते. तेव्हा निवडणुकांमध्ये ते काय बोलले हे सगळ्यांना माहिती आहे, सर्वकाही उघड आहे. बाबासाहेबांना भारतरत्न द्यायची काँग्रेसची तयारी नव्हती. भाजपाच्या समर्थनाने सरकार बनल्यानंतर त्यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. काँग्रेसने सीताराम केसरीचे काय केले ते देशाने पाहिले. देशात पहिल्यांदाच एका पक्षाने आदिवासी समाजाच्या महिलेला राष्ट्रपती केले. काँग्रेसचा निषेध वैचारिक नव्हता, त्यांचा निषेध आदिवासी महिलेच्या विरोधात होता.

राज्यसभेतून मोदींचा घणाघाततसेच जुन्या सभागृहात देशाच्या पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही. या आवाजाला देशातील जनतेने बळ दिले आहे. काँग्रेसने सत्तेसाठी लोकशाहीचा गळा दाबला. काँग्रेसने लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारांना बरखास्त केले. काँग्रेसने देशाच्या संविधानाला बंदीस्त केले, काँग्रेसने वृत्तपत्रांवर टाळे लावले, काँग्रेसने तेव्हा देशाला तोडले आणि आता उत्तर-दक्षिण तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. हे काँग्रेस आम्हाला लोकशाही शिकवत आहे, असेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले. 

काँग्रेसने ओबीसीला आरक्षण दिले नाही, त्यांनी सामान्य वर्गातील कुटुंबाना आरक्षण दिले नाही. बाबासाहेब आंबेडकर नसते, तर दलितांना आरक्षण मिळाले नसते. याच काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न न देता आपल्या कुटुंबातील सदस्यांना देत राहिले. भाजपाच्या मदतीने सरकार सत्तेत आल्यानंतर बाबासाहेबांना भारतरत्न दिला गेला. त्यांनी रस्त्या-रस्त्यांना आपल्या कुटुंबाची नावे दिली. या काँग्रेस नेत्यांची गॅरंटी राहिली नाही, पक्षाची गॅरंटी राहिली नाही आणि हे मोदीच्या गॅरंटीबद्दल बोलत आहेत. त्यांच्या कार्यकाळात देश नाराज झाला. देशाला इतका राग का आला, हे आमच्यामुळे झाले नाही, तर त्यांच्या स्वतःच्या कर्माची फळे त्यांना मिळाली आहेत. आम्ही देशाला अडचणीतून बाहेर आणले, म्हणूनच देश आम्हाला आशीर्वाद देत आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा