शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

"जे फाळणीच्या भयावहतेने..."; PM मोदींनी भारत-पाकिस्तान फाळणीतील पीडितांना अर्पण केली श्रद्धांजली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 11:22 IST

ब्रिटिश वसाहतवादी राजवटीने 1947 मध्ये आजच्याच दिवशी भारताची फाळणी केली होती. यानंतर पाकिस्तानच्या रुपाने नव्या देशाचा जन्म झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (14 ऑगस्ट) भारताच्या फाळणीदरम्यान अमानुष दुःख्ख आणि वेदना सोसणाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मोदी म्हणाले, आजचा दिवस अशा लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे, ज्यांनी फाळणीचे चटके सोसून पुन्हा आपल्या जीवनाला नव्याने प्रारंभ केला. ब्रिटिश वसाहतवादी राजवटीने 1947 मध्ये आजच्याच दिवशी भारताची फाळणी केली होती. यानंतर पाकिस्तानच्या रुपाने नव्या देशाचा जन्म झाला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "फाळणीच्या स्मृती दिनानिमित्त, आपण त्या लोकांचे स्मरण करत आहोत, जे फाळणीच्या भयावहतेने प्रभावित झाले आणि प्रचंड त्रास सहन केला. त्यांच्या धैर्याला श्रद्धांजली वाहण्याचा हा दिवस आहे, ज्यांनी मानवाची सावरण्याची शक्ती दर्शवली. फाळणीमुळे प्रभावित झालेल्या अनेकांनी आपल्या जीवनाची नव्याने सुरूवात केली आणि मोठे यशही मिळवले. आज आम्ही आपल्या देशातील एकता आणि बंधुतेचे सदैव रक्षण करण्याच्या वचनबद्धतेचाही पुनरुच्चार करतो.

अमित शाह यांनीही अर्पण केली श्रद्धांजली -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही फाळणीच्या स्मृती दिनानिमित्त फाळणीच्या झळा सोसलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, "आज फाळणीच्या स्मृती दिनानिमित्त, त्या सर्वांना श्रद्धांजली, ज्यांनी इतिहासातील सर्वात क्रूर प्रकरणादरम्यान अमानुष यातनांचा सामना केला, जीव गमावला, आणि बेघर झाले. आपला इतिहास स्मरणात ठेवून आणि त्यातून काही बोध घेऊनच एक राष्ट्र आपले मजबूत भविष्य निर्माण करू शकते आणि एका शक्तिशाली देशाच्या रूपात समोर येऊ शकतो."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPakistanपाकिस्तानIndiaभारत