शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

तुम्ही माझ्यावर स्ट्राईक करा, मी दहशतवाद्यांवर स्ट्राईक करतो - मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 11:54 IST

एकीकडे विरोधी पक्ष मोदी हटावचे नारे देत असताना लोकांच्या बळावर मी लोकहिताचे निर्णयावर ठाम आहे. ते मोदीवर स्ट्राईक करण्याचा मानस ठेवतात तर मोदी दहशतवादावर स्ट्राईक करण्याचे मनसुबे आखतो असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाला लगावला.

गांधीनगर - एकीकडे विरोधी पक्ष मोदी हटावचे नारे देत असताना लोकांच्या बळावर मी लोकहिताच्या निर्णयावर ठाम आहे. ते मोदीवर स्ट्राईक करण्याचा मानस ठेवतात तर मोदी दहशतवादावर स्ट्राईक करण्याचे मनसुबे आखतो असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाला लगावला. गुजरातच्या गांधीनगर येथे असंघटीत कामगारांसाठी पेन्शन योजनेचा शुभारंभ करताना नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाला लक्ष्य केले.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गुजरातच्या गांधीनगर येथून प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा शुभारंभ केला. श्रमिक आणि मजूर अशा असंघटीत कामगारांसाठी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. या योजनेतंर्गत 60 वर्षावरील असंघटीत कामगारांना 3 हजार रूपये मासिक निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेचा जवळपास देशातील 10 करोड श्रमिक कामगारांना लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा शुभारंभ करत पंतप्रधान नरेंद मोदी यांनी 11 लाख 51 हजार लाभार्थ्यांना 13 करोड 58 लाख 31 हजार रक्कम थेट पेन्शन खात्यात जमा केली. 

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली, ते म्हणाले की, ज्यांच्यासाठी गरीब फक्त फोटो काढण्यासाठीचा खेळ आहे, ज्यांना गरिबांच्या दुखा:शी काही देणंघेणं नाही त्यांची मानसिक अवस्था गरीब आहे. आमच्यासाठी गरीबी ही मोठे आव्हान आहे. कोणीही कितीही गरीब असो वा अशिक्षित असो या योजनेचा लाभ त्याला सहजरित्या होऊ शकतो. ज्या श्रमिक कामगारांचे वय 18 ते 40 या वयोगटात आहे. त्यांचे मासिक मानधन 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे अशाही कामगारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. गेली 55 वर्षे गरिबांच्या नावे मते मिळवणाऱ्यांनी देशावर राज्य केले मात्र अशा असंघटीत कामगारांसाठी कोणत्याही योजना लागू करण्याची त्यांची इच्छा नव्हती असा टोला मोदी यांनी काँग्रेसला लगावला.  

या योजनेचा लाभ घेण्यासाठी श्रमिक कामगारांनी जवळच्या नागरी सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. डिजिटल इंडियामुळे काही मिनिटांतच या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येईल, 2014 पूर्वी देशभरात 80 हजार सुविधा केंद्र होते मात्र आमचं सरकार आल्यापासून देशभरात 3 लाखांहून अधिक केंद्र उभारली गेली. आता हीच केंद्र श्रमिक कामगारांना उपयोगी पडणार आहेत. असा दावा पंतप्रधानांनी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीGujaratगुजरात