शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
4
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
5
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
6
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
7
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
8
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
9
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
10
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
11
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
12
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
13
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
14
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
15
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
16
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
17
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
18
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
19
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
Daily Top 2Weekly Top 5

"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रद्द झालेल्या काश्मीर दौऱ्यावरुन काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मोठा दावा केला आहे.

Mallikarjun Kharge on PM Narendra Modi Kashmir Visit: पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांना पाकिस्तानातून पाठिंबा मिळत असल्याने भारताने शेजारील देशाविरोधात कठोर पावले उचलली आहेत. दुसरीकडे, या दहशतवादी हल्ल्यावरुन आरोप प्रत्यारोप देखील सुरु झाले आहेत. अशातच  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये संभाव्य दहशतवादी हल्ल्याबद्दल गुप्तचर अहवाल देण्यात आला होता असा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी केला. या अहवालानंतरच पंतप्रधान मोदींचा काश्मीर दौरा रद्द करण्यात आला, असेही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

पहलगाम हल्ल्यावरुन विरोधकांनी सरकारला पूर्णपणे सहकार्य करत पाठिंबा जाहीर केला. दहशतवाद्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली. त्यानंतर आता मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.  दहशतवादी हल्ल्याच्या गुप्तचर अहवालाच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काश्मीर दौरा रद्द करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. दहशतवादी हल्ल्याचे गुप्तचर अहवाल असूनही केंद्राने पहलगाममध्ये अधिक सुरक्षा कर्मचारी का तैनात केले नाहीत? असा सवाल मल्लिकार्जुन खरगे यांनी रांची येथील एका कार्यक्रमात उपस्थित केला.

"पहलगाम हल्ला गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचे सरकारने ते मान्य केले आहे. जर त्यांना हे माहित होते तर त्यांनी काहीही का केले नाही? हल्ल्याच्या ३ दिवस आधी पंतप्रधान मोदींना गुप्तचर अहवाल पाठवण्यात आला होता आणि त्यामुळे त्यांनी काश्मीरला भेट देण्याचा त्यांचा कार्यक्रम रद्द केला होता, अशी माहिती मला मिळाली आहे, हे मी एका वर्तमानपत्रातही वाचले होते," असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

"गुप्तचर यंत्रणेने तुमच्या सुरक्षेसाठी सांगितले होते की तिथे जाणे योग्य नाही, तेव्हा तुम्ही सामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी तेथील सीमा दल आणि पोलिसांना हे का सांगितले नाही? दहशतवादी हल्ल्याचे गुप्तचर अहवाल असूनही केंद्राने पहलगाममध्ये अधिक सुरक्षा कर्मचारी का तैनात केले नाहीत? जेव्हा केंद्राने गुप्तचर यंत्रणेतील अपयश मान्य केले आहे, तेव्हा पहलगाम हल्ल्यातील लोकांच्या मृत्यूसाठी त्यांना जबाबदार धरले जाऊ नये का?," असही सवाल खरगेंनी केला. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेIndian Armyभारतीय जवान