शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रद्द झालेल्या काश्मीर दौऱ्यावरुन काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मोठा दावा केला आहे.

Mallikarjun Kharge on PM Narendra Modi Kashmir Visit: पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांना पाकिस्तानातून पाठिंबा मिळत असल्याने भारताने शेजारील देशाविरोधात कठोर पावले उचलली आहेत. दुसरीकडे, या दहशतवादी हल्ल्यावरुन आरोप प्रत्यारोप देखील सुरु झाले आहेत. अशातच  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये संभाव्य दहशतवादी हल्ल्याबद्दल गुप्तचर अहवाल देण्यात आला होता असा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी केला. या अहवालानंतरच पंतप्रधान मोदींचा काश्मीर दौरा रद्द करण्यात आला, असेही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

पहलगाम हल्ल्यावरुन विरोधकांनी सरकारला पूर्णपणे सहकार्य करत पाठिंबा जाहीर केला. दहशतवाद्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली. त्यानंतर आता मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.  दहशतवादी हल्ल्याच्या गुप्तचर अहवालाच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काश्मीर दौरा रद्द करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. दहशतवादी हल्ल्याचे गुप्तचर अहवाल असूनही केंद्राने पहलगाममध्ये अधिक सुरक्षा कर्मचारी का तैनात केले नाहीत? असा सवाल मल्लिकार्जुन खरगे यांनी रांची येथील एका कार्यक्रमात उपस्थित केला.

"पहलगाम हल्ला गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचे सरकारने ते मान्य केले आहे. जर त्यांना हे माहित होते तर त्यांनी काहीही का केले नाही? हल्ल्याच्या ३ दिवस आधी पंतप्रधान मोदींना गुप्तचर अहवाल पाठवण्यात आला होता आणि त्यामुळे त्यांनी काश्मीरला भेट देण्याचा त्यांचा कार्यक्रम रद्द केला होता, अशी माहिती मला मिळाली आहे, हे मी एका वर्तमानपत्रातही वाचले होते," असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

"गुप्तचर यंत्रणेने तुमच्या सुरक्षेसाठी सांगितले होते की तिथे जाणे योग्य नाही, तेव्हा तुम्ही सामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी तेथील सीमा दल आणि पोलिसांना हे का सांगितले नाही? दहशतवादी हल्ल्याचे गुप्तचर अहवाल असूनही केंद्राने पहलगाममध्ये अधिक सुरक्षा कर्मचारी का तैनात केले नाहीत? जेव्हा केंद्राने गुप्तचर यंत्रणेतील अपयश मान्य केले आहे, तेव्हा पहलगाम हल्ल्यातील लोकांच्या मृत्यूसाठी त्यांना जबाबदार धरले जाऊ नये का?," असही सवाल खरगेंनी केला. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेIndian Armyभारतीय जवान