शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

PM Modi in Rajyasabha : ...तर गोवा स्वातंत्र्यानंतर १५ वर्षे पारतंत्र्यात राहिला नसता, पंतप्रधान मोदींचा नेहरूंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 13:45 IST

PM Narendra Modi in Rajya Sabha : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर बोलताना  गोव्यातील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधला.

नवी दिल्ली - गोव्यामध्ये पुढील आठवड्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. केवळ ४० आमदारसंख्या असलेल्या या छोट्याशा राज्यात विजय मिळवण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांसह अनेक छोटे मोठे पक्ष आणि आघाड्यांनी कंबर कसली आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर बोलताना  गोव्यातील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधला.

मोदी गोव्याचा उल्लेख करत काँग्रेसला घेतले. ते म्हणाले की, सरदार पटेल यांच्याकडून प्रेरणा घेऊन गोव्यासाठी रणनीती आखली गेली असती तर भारताच्या स्वातंत्र्यानंतर १५ वर्षे गोवा गुलामीच्या बेड्यांमध्ये अडकून पडला नसता. गोव्याच्या स्वातंत्र्यापेक्षा पंडित जवाहरलाल नेहरू यांना आपल्या प्रतिमेची चिंता होती. त्यामुळे जेव्हा गोव्यात सत्याग्रहींवर गोळीबार होत होता, तेव्हाही नेहरू गोव्यात लष्कर पाठवणार नाही, असे सांगत होते. गोव्यावर काँग्रेसने हा अन्याय केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

दरम्यान, काँग्रेस नसती तर काय झालं असतं, असा सवाल करतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, देशात जे काही झालं तर काँग्रेसने केलं, काँग्रेस नसती तर काय झालं असतं, असं इथे वारंवार बोललं गेलं. पण खरंच काँग्रेस विसर्जित झाली असती तर खूप काही घडलं नसतं. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस नसती तर देशाची लोकशाही घराणेशाहीपासून मुक्त राहीली असता. काँग्रेस नसती तर देशात आणीबाणी लागली नसती. काँग्रेस नसती तर शीखांचा नरसंहार झाला नसता. काँग्रेस नसती तर काश्मिरी पंडितांचे पलायन झाले नसते. काँग्रेस नसती तर भ्रष्टाचार नसता. काँग्रेस नसती तर जातीवाद नसता. काँग्रेस नसती तर अधिक विकास झाला असता, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूGoa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२