शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

...म्हणून पंतप्रधानांची मानसिक स्थिती ढासळली, काँग्रेस नेत्याची वादग्रस्त टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 12:16 IST

राजीव गांधी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर काँग्रेस नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरण्यात येत आहे. यातच पंतप्रधान मोदींवर काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी वादग्रस्त टीका करुन नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

रायपूर - राजीव गांधी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर काँग्रेस नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरण्यात येत आहे. यातच पंतप्रधान मोदींवर काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी वादग्रस्त टीका करुन नव्या वादाला तोंड फोडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानसिक संतुलन बिघडलं असून त्यांना उपचाराची गरज आहे असं विधान भूपेश बघेल यांनी करत नरेंद्र मोदी यांचे विधान असंवेदनशील आहे. त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, राष्ट्राच्या निर्माणासाठी राजीव गांधी यांनी मोलाचा वाटा उचलला होता. देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी राजीव गांधी यांनी बलिदान दिलं. त्यांच्या मृत्यूनंतर देशाचा सर्वोच्च सन्मान असलेला भारतरत्न पुरस्कार त्यांना देण्यात आला. पंतप्रधानपदावर असणाऱ्या व्यक्तीने अशारितीने भारतरत्न असलेल्या व्यक्तीचा अपमान करणे हे शोभणार नाही. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानसिक संतुलन बिघडलं असल्याचं दिसून येतं. त्यांना उपचाराची गरज आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसातून फक्त 3-4 तास झोपतात. झोप पूर्ण होत नाही म्हणून त्यांची मानसिक स्थिती खराब झाली आहे. ज्याची मानसिक स्थिती खराब आहे त्या व्यक्तीने देशाच्या सर्वोच्च स्थानावर असणं हे देशासाठी धोकादायक आहे असंही भूपेश बघेल यांनी सांगितलं. तसेच मोदींचे देशाबद्दल प्रेम फक्त धोका आहे. त्यांना फक्त सत्ता आणि खुर्ची याची एवढं प्रिय आहे. सत्ता काबीज करण्यासाठी मोदी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. नरेंद्र मोदी यांच्या विधानावरुन ते निवडणुकीत पराभूत होणार आहेत हे सिद्ध होत आहे असा टोला भूपेश बघेल यांनी लगावला. त्याचसोबत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा 150 पेक्षा अधिक जागा जिंकू शकणार नाही. तर युपीए 300 पेक्षा अधिक जागांवर विजयी होईल असा दावा भूपेश बघेल यांनी केला आहे.  

राजीव गांधी यांच्यावर टीका करताना पंतप्रधान नरेंद मोदी म्हणाले होते की, 'तुमच्या (राहुल गांधींच्या) वडिलांना त्यांच्या राज दरबारातील लोकांनी मोठा गाजावाजा करत मिस्टर क्लीन म्हटलं होतं. मात्र हळूहळू भ्रष्टाचारी नंबर वनच्या रुपात त्यांचं आयुष्य संपलं. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुकीला क्षमा करतो. मात्र फसवणूक करणाऱ्याला कधीही माफ करत नाही,' अशा शब्दांमध्ये मोदींनी राजीव गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली होती.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस