शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

Coronavirus: “महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या देशासाठीही गंभीर बाब”; PM मोदींनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 14:09 IST

Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा कहर अद्याप कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र आणि राज्य सरकार अनेक उपाययोजना आखत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी देशभरातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र आणि केरळ राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करत, ती देशासाठीही गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. (pm modi expresses concern about increase corona patient in maharashtra and kerala)

पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रासह केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.  यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार उपस्थित होते. देशातील ८० टक्के कोरोनाबाधित हे याच सहा राज्यांमतील आहेत. तसेच ८४ टक्के मृत्यूही याच राज्यांमध्ये झाले आहेत. हे चिंताजनक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

जगण्याचा अधिकार सर्वांत महत्त्वाचा; कावड यात्रेवरुन सुप्रीम कोर्टाने योगी सरकारला फटकारले

तिसरी लाट सुरुवातीपासूनच रोखायला हवी

टेस्ट, ट्रॅक, ट्रिट आणि आता लस या माध्यमातून आपल्याला पुढे जायचे आहे. ग्रामीण भागावर जास्त लक्ष केंद्रीत करायला हवे. मायक्रो कन्टेनमेंट झोनवर अधिक लक्ष द्यायला हवे. तसेच कोरोनाचा संसर्ग जास्त असलेल्या भागांमध्ये चाचण्या जास्तीत जास्त वाढवायला हव्यात आणि लसीचा वापर कोरोनाशी लढण्याचे एक अस्त्र म्हणून हवा, असे नमूद करत, ज्या राज्यांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे, त्यांनी जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. कोरोनाची तिसरी लाट सुरुवातीपासूनच रोखायला हवी. रुग्णवाढ होते, तसे हा विषाणू आपली रुपे बदलत आहे. अधिक धोकादायक होत आहे, असे सांगत पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली आहे. 

दरम्यान, तज्ज्ञांच्या मतानुसार, ज्या राज्यांमधून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे, तेथील परिस्थिती प्रथम नियंत्रणात येईल. मात्र, महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढतच आहे. ही आपल्या सर्वांसाठी आणि देशासाठीही गंभीर चिंतेची बाब आहे, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर काळजी व्यक्त केली.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसUddhav Thackerayउद्धव ठाकरेprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रCentral Governmentकेंद्र सरकार