शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

Coronavirus: “महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या देशासाठीही गंभीर बाब”; PM मोदींनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 14:09 IST

Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा कहर अद्याप कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र आणि राज्य सरकार अनेक उपाययोजना आखत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी देशभरातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र आणि केरळ राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करत, ती देशासाठीही गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. (pm modi expresses concern about increase corona patient in maharashtra and kerala)

पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रासह केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.  यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार उपस्थित होते. देशातील ८० टक्के कोरोनाबाधित हे याच सहा राज्यांमतील आहेत. तसेच ८४ टक्के मृत्यूही याच राज्यांमध्ये झाले आहेत. हे चिंताजनक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

जगण्याचा अधिकार सर्वांत महत्त्वाचा; कावड यात्रेवरुन सुप्रीम कोर्टाने योगी सरकारला फटकारले

तिसरी लाट सुरुवातीपासूनच रोखायला हवी

टेस्ट, ट्रॅक, ट्रिट आणि आता लस या माध्यमातून आपल्याला पुढे जायचे आहे. ग्रामीण भागावर जास्त लक्ष केंद्रीत करायला हवे. मायक्रो कन्टेनमेंट झोनवर अधिक लक्ष द्यायला हवे. तसेच कोरोनाचा संसर्ग जास्त असलेल्या भागांमध्ये चाचण्या जास्तीत जास्त वाढवायला हव्यात आणि लसीचा वापर कोरोनाशी लढण्याचे एक अस्त्र म्हणून हवा, असे नमूद करत, ज्या राज्यांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे, त्यांनी जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. कोरोनाची तिसरी लाट सुरुवातीपासूनच रोखायला हवी. रुग्णवाढ होते, तसे हा विषाणू आपली रुपे बदलत आहे. अधिक धोकादायक होत आहे, असे सांगत पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली आहे. 

दरम्यान, तज्ज्ञांच्या मतानुसार, ज्या राज्यांमधून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे, तेथील परिस्थिती प्रथम नियंत्रणात येईल. मात्र, महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढतच आहे. ही आपल्या सर्वांसाठी आणि देशासाठीही गंभीर चिंतेची बाब आहे, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर काळजी व्यक्त केली.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसUddhav Thackerayउद्धव ठाकरेprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रCentral Governmentकेंद्र सरकार