शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Coronavirus: “महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या देशासाठीही गंभीर बाब”; PM मोदींनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 14:09 IST

Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा कहर अद्याप कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र आणि राज्य सरकार अनेक उपाययोजना आखत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी देशभरातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र आणि केरळ राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करत, ती देशासाठीही गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. (pm modi expresses concern about increase corona patient in maharashtra and kerala)

पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रासह केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.  यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार उपस्थित होते. देशातील ८० टक्के कोरोनाबाधित हे याच सहा राज्यांमतील आहेत. तसेच ८४ टक्के मृत्यूही याच राज्यांमध्ये झाले आहेत. हे चिंताजनक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

जगण्याचा अधिकार सर्वांत महत्त्वाचा; कावड यात्रेवरुन सुप्रीम कोर्टाने योगी सरकारला फटकारले

तिसरी लाट सुरुवातीपासूनच रोखायला हवी

टेस्ट, ट्रॅक, ट्रिट आणि आता लस या माध्यमातून आपल्याला पुढे जायचे आहे. ग्रामीण भागावर जास्त लक्ष केंद्रीत करायला हवे. मायक्रो कन्टेनमेंट झोनवर अधिक लक्ष द्यायला हवे. तसेच कोरोनाचा संसर्ग जास्त असलेल्या भागांमध्ये चाचण्या जास्तीत जास्त वाढवायला हव्यात आणि लसीचा वापर कोरोनाशी लढण्याचे एक अस्त्र म्हणून हवा, असे नमूद करत, ज्या राज्यांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे, त्यांनी जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. कोरोनाची तिसरी लाट सुरुवातीपासूनच रोखायला हवी. रुग्णवाढ होते, तसे हा विषाणू आपली रुपे बदलत आहे. अधिक धोकादायक होत आहे, असे सांगत पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली आहे. 

दरम्यान, तज्ज्ञांच्या मतानुसार, ज्या राज्यांमधून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे, तेथील परिस्थिती प्रथम नियंत्रणात येईल. मात्र, महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढतच आहे. ही आपल्या सर्वांसाठी आणि देशासाठीही गंभीर चिंतेची बाब आहे, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर काळजी व्यक्त केली.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसUddhav Thackerayउद्धव ठाकरेprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रCentral Governmentकेंद्र सरकार