शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

Pm Modi vs Rahul Gandhi: "पंतप्रधान मोदींनी केलं तर चालतं अन् राहुल गांधींना..."; काँग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge यांनी घेतला BJPचा समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 22:09 IST

केंद्रातील सरकार खोटं बोलणारं असल्याचाही केला आरोप

Pm Modi vs Rahul Gandhi, Mallikarjun Kharge: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी (२८ डिसेंबर २०२२) पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमुळे केंद्र सरकारची खूप अडचण असल्याचे खरगे म्हणाले. "भारत जोडो यात्रा म्हणजे भाजपाने देशात निर्माण केलेल्या द्वेषाच्या वातावरणाविरुद्ध लढण्याचा प्रयत्न आहे. पण सरकार आता त्यांना घाबरले आहे. म्हणूनच राहुल गांधींना नोटीस पाठवण्यात आली होती की, कोविड-19 मुळे असे कार्यक्रम होऊ देऊ नका. पण असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींनी तसं केलं तर चालतं, आणि राहुल गांधींच्या भारत जोडोला मात्र विरोध," अशा शब्दांत मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले.

लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यावा!

"भाजपाकडे खूप मोठे वॉशिंग मशीन आहे, जे मोठे डागही साफ करू शकते. लोकांना या मशीनमध्ये टाकल्यावर ते स्वच्छ बाहेर येतात. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यायचा आहे. हे केंद्रातील खोटे बोलणारे सरकार आहे. देशाच्या मूळ भावना आणि तत्त्वांवर सातत्याने आघात होत आहेत. देशभरात द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे, महागाई आणि बेरोजगारीने जनता हैराण झाली आहे, मात्र सरकार या प्रश्नांकडे अजिबात लक्ष देत नाही. या प्रश्नांकडे आणि समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारत जोडो यात्रेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे", असे आवाहन खर्गे यांनी केले.

त्याचवेळी, काँग्रेस पक्षाने स्थापना दिनानिमित्त त्यांच्या अधिकृत हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये काँग्रेसच्या संघर्षांचा इतिहास आणि दशकांनंतरही ती कशी मजबूत आहे, हे सांगितले आहे. काँग्रेसची विचारधारा कालही देशासाठी खूप महत्त्वाची होती आणि आजही महत्त्वाची आहे. काल याच विचारसरणीच्या बळावर आम्ही इंग्रजांना हुसकावून लावत आमच्या हक्काची लढाई जिंकली, आजही याच विचारसरणीच्या बळावर देशातून अन्याय, द्वेष संपवू, अशा आशयाचा संदेश यातून देण्यात आला आहे.

दरम्यान, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना १३७ वर्षांपूर्वी २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबई शहरात झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी पक्ष २८ डिसेंबर रोजी आपला स्थापना दिवस साजरा करत आहे.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा