शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

Pm Modi vs Rahul Gandhi: "पंतप्रधान मोदींनी केलं तर चालतं अन् राहुल गांधींना..."; काँग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge यांनी घेतला BJPचा समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 22:09 IST

केंद्रातील सरकार खोटं बोलणारं असल्याचाही केला आरोप

Pm Modi vs Rahul Gandhi, Mallikarjun Kharge: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी (२८ डिसेंबर २०२२) पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमुळे केंद्र सरकारची खूप अडचण असल्याचे खरगे म्हणाले. "भारत जोडो यात्रा म्हणजे भाजपाने देशात निर्माण केलेल्या द्वेषाच्या वातावरणाविरुद्ध लढण्याचा प्रयत्न आहे. पण सरकार आता त्यांना घाबरले आहे. म्हणूनच राहुल गांधींना नोटीस पाठवण्यात आली होती की, कोविड-19 मुळे असे कार्यक्रम होऊ देऊ नका. पण असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींनी तसं केलं तर चालतं, आणि राहुल गांधींच्या भारत जोडोला मात्र विरोध," अशा शब्दांत मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले.

लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यावा!

"भाजपाकडे खूप मोठे वॉशिंग मशीन आहे, जे मोठे डागही साफ करू शकते. लोकांना या मशीनमध्ये टाकल्यावर ते स्वच्छ बाहेर येतात. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यायचा आहे. हे केंद्रातील खोटे बोलणारे सरकार आहे. देशाच्या मूळ भावना आणि तत्त्वांवर सातत्याने आघात होत आहेत. देशभरात द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे, महागाई आणि बेरोजगारीने जनता हैराण झाली आहे, मात्र सरकार या प्रश्नांकडे अजिबात लक्ष देत नाही. या प्रश्नांकडे आणि समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारत जोडो यात्रेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे", असे आवाहन खर्गे यांनी केले.

त्याचवेळी, काँग्रेस पक्षाने स्थापना दिनानिमित्त त्यांच्या अधिकृत हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये काँग्रेसच्या संघर्षांचा इतिहास आणि दशकांनंतरही ती कशी मजबूत आहे, हे सांगितले आहे. काँग्रेसची विचारधारा कालही देशासाठी खूप महत्त्वाची होती आणि आजही महत्त्वाची आहे. काल याच विचारसरणीच्या बळावर आम्ही इंग्रजांना हुसकावून लावत आमच्या हक्काची लढाई जिंकली, आजही याच विचारसरणीच्या बळावर देशातून अन्याय, द्वेष संपवू, अशा आशयाचा संदेश यातून देण्यात आला आहे.

दरम्यान, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना १३७ वर्षांपूर्वी २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबई शहरात झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी पक्ष २८ डिसेंबर रोजी आपला स्थापना दिवस साजरा करत आहे.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा