शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

Pm Modi vs Rahul Gandhi: "पंतप्रधान मोदींनी केलं तर चालतं अन् राहुल गांधींना..."; काँग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge यांनी घेतला BJPचा समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 22:09 IST

केंद्रातील सरकार खोटं बोलणारं असल्याचाही केला आरोप

Pm Modi vs Rahul Gandhi, Mallikarjun Kharge: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी (२८ डिसेंबर २०२२) पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमुळे केंद्र सरकारची खूप अडचण असल्याचे खरगे म्हणाले. "भारत जोडो यात्रा म्हणजे भाजपाने देशात निर्माण केलेल्या द्वेषाच्या वातावरणाविरुद्ध लढण्याचा प्रयत्न आहे. पण सरकार आता त्यांना घाबरले आहे. म्हणूनच राहुल गांधींना नोटीस पाठवण्यात आली होती की, कोविड-19 मुळे असे कार्यक्रम होऊ देऊ नका. पण असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींनी तसं केलं तर चालतं, आणि राहुल गांधींच्या भारत जोडोला मात्र विरोध," अशा शब्दांत मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले.

लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यावा!

"भाजपाकडे खूप मोठे वॉशिंग मशीन आहे, जे मोठे डागही साफ करू शकते. लोकांना या मशीनमध्ये टाकल्यावर ते स्वच्छ बाहेर येतात. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यायचा आहे. हे केंद्रातील खोटे बोलणारे सरकार आहे. देशाच्या मूळ भावना आणि तत्त्वांवर सातत्याने आघात होत आहेत. देशभरात द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे, महागाई आणि बेरोजगारीने जनता हैराण झाली आहे, मात्र सरकार या प्रश्नांकडे अजिबात लक्ष देत नाही. या प्रश्नांकडे आणि समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारत जोडो यात्रेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे", असे आवाहन खर्गे यांनी केले.

त्याचवेळी, काँग्रेस पक्षाने स्थापना दिनानिमित्त त्यांच्या अधिकृत हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये काँग्रेसच्या संघर्षांचा इतिहास आणि दशकांनंतरही ती कशी मजबूत आहे, हे सांगितले आहे. काँग्रेसची विचारधारा कालही देशासाठी खूप महत्त्वाची होती आणि आजही महत्त्वाची आहे. काल याच विचारसरणीच्या बळावर आम्ही इंग्रजांना हुसकावून लावत आमच्या हक्काची लढाई जिंकली, आजही याच विचारसरणीच्या बळावर देशातून अन्याय, द्वेष संपवू, अशा आशयाचा संदेश यातून देण्यात आला आहे.

दरम्यान, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना १३७ वर्षांपूर्वी २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबई शहरात झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी पक्ष २८ डिसेंबर रोजी आपला स्थापना दिवस साजरा करत आहे.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा