शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

पंधरा लाख न दिल्यानं पंतप्रधान मोदी, शहांविरोधात फसवणुकीची तक्रार; खटला चालणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 16:15 IST

रांचीतल्या जिल्हा न्यायालयात सुनावणीला सुरुवात

रांची: पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांनी फसवणूक केल्याचा आरोप करत एका व्यक्तीनं न्यायालयात धाव घेतली आहे. रांचीतल्या जिल्हा न्यायालयात या प्रकरणात सुनावणीला सुरुवात झाली आहे. उच्च न्यायालयातले वकील एच. के. सिंह यांनी मोदी आणि शहांविरोधात तक्रार दाखल केली आहे. सत्तेत आल्यावर प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख जमा करण्याचं आश्वासन देऊन दोघांनी देशवासीयांची फसवणूक केल्याचा सिंह यांचा आरोप आहे. मोदी, शहांच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ४१५, ४२० अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. कालपासून जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. मोदी, शहांनी देशाची फसवणूक केल्याचा आरोप करताना वकील एच. के. सिंह यांनी अमित शहांच्या सुधारित नागरिकत्व कायद्यावरील (सीएए) विधानांचा दाखला दिला. '२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात देशवासीयांना सीएए लागू करण्याचं वचन दिलं होतं. त्यामुळेच आम्ही निवडून आल्यावर सीएए लागू केल्याचं शहा सांगतात. शहा सीएएचं आश्वासन पूर्ण करू शकतात. मग जाहीरनाम्यातल्या १५ लाखांचं वचन का पूर्ण करू शकत नाहीत?,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ मार्चला होणार आहे. आश्वासनांची पूर्तता न करणं म्हणजे देशवासीयांची फसवणूक असल्याचं सिंह म्हणाले. 'मोदी, शहांसोबतच भाजपाच्या इतर नेत्यांनीदेखील देशवासीयांना अनेक आश्वासनं दिली. मात्र त्यांची पूर्तता झाली नाही. भाजपा सीएएचं आश्वासन पूर्ण करू शकते. मग १५ लाखांचं वचन का पूर्ण करू शकत नाही? हा भाजपाचा दुटप्पीपणा नाही का?,' असे प्रश्न सिंह यांनी विचारले. सिंह यांनी दाखल केलेली तक्रार म्हणजे पब्लिसिटी स्टंट असल्याचं प्रत्युत्तर भाजपाचे प्रवक्ते प्रतुल शाहदेव यांनी दिलं. सहा वर्षांनंतर दाखल करण्यात आलेली तक्रार केवळ प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याचं शाहदेव म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपा