शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21व्या शतकातील आंबेडकर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 09:06 IST

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मंगळवारी (8 जानेवारी) 'आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना 10 टक्के आरक्षण देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21 व्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, अशा शब्दांत मोदींची स्तुती केली आहे.

ठळक मुद्देउत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी 'आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना 10 टक्के आरक्षण देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21 व्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत' असे म्हटले आहे.ऐतिहासिक निर्णयामुळे मोदींचे आभार मानत 'सबका साथ, सबका विकास' या आपल्या ब्रीदवाक्याला जागले आहेत, असेही रावत यांनी म्हटलं आहे. आर्थिक स्थितीवर आधारित आरक्षणाची मागणी सवर्णांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. या सर्व वर्गाला यामुळे फायदाच होणार आहे असा दावाही त्यांनी केला

देहरादून - उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी 'आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना 10 टक्के आरक्षण देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21 व्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत' असे म्हटले आहे. मंगळवारी (8 जानेवारी) रावत यांनी मोदींची स्तुती केली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे मोदींचे आभार मानत 'सबका साथ, सबका विकास' या आपल्या ब्रीदवाक्याला ते जागले आहेत, असेही रावत यांनी म्हटलं आहे. 

'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21व्या शतकातील आंबेडकर आहेत. मोदी गरीब कुटुंबातील आहेत. त्यामुळे ते गरीबांचे दुःख जाणतात. याच जाणीवेतून त्यांनी 10 टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला' असे रावत म्हणाले. तसेच आर्थिक स्थितीवर आधारित आरक्षणाची मागणी सवर्णांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. या सर्व वर्गाला यामुळे फायदाच होणार आहे असा दावाही त्यांनी केला. 

लोकसभेत मंगळवारी (8 जानेवारी) सवर्ण आरक्षण विधेयक मंजूर झालं आहे. या विधेयकाच्या बाजूने 323 सदस्यांनी मतदान केलं. तर या विधेयकाच्या विरोधात अवघ्या 3 जणांनी मतदान केलं. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी घेतला. यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी याबद्दलचं विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं. यावर संध्याकाळी पाच वाजल्यापासून सभागृहात चर्चा सुरू होती. रात्री 10 वाजता यावर मतदान घेण्यात आलं. त्यात हे विधेयक बहुमताने मंजूर झाले. 

गरीब सवर्णांना आरक्षण देण्यासाठी सरकारनं लोकसभेत मांडलेल्या विधेयकावर जवळपास पाच तास चर्चा झाली. या विधेयकाला जवळपास सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला. कोणत्याही पक्षानं या विधेयकाला थेट विरोध केला नाही. मात्र अनेक खासदारांनी या आरक्षणाबद्दलच्या सरकारच्या हेतूंवर शंका घेतली. हे विधेयक तांत्रिक निकषांवर टिकमार नाही, असा अंदाज अनेक खासदारांनी व्यक्त केला. तर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींनी हे विधेयक घटनाविरोधी असल्याचं म्हटलं. लोकसभेत हे विधेयक मंजूर होऊ शकेल. त्यामुळे ही काही होळी, दिवाळी साजरी करायची आहे ती करून घ्या. मात्र हे विधेयक न्यायालयात टिकणार नाही, असे ओवैसींनी म्हटले आहे. 

विरोधकांनी नोंदवलेल्या आक्षेपाला सरकारकडून अर्थमंत्री अरुण जेटलींनी उत्तर दिलं. घटनेनं आरक्षणाची मर्यादा 50 टक्के इतकी ठेवली आहे. मात्र ती सामाजिकदृष्ट्या असलेल्या मागास असलेल्या जातींसाठी आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांसाठी ही मर्यादा नाही. सामाजिक आणि आर्थिक भेदभाव संपवण्यासाठी हे विधेयक आणण्यात आल्याचं जेटली म्हणाले. आज प्रत्येक नागरिकाला समान संधी देण्याची आवश्यकता आहे. आर्थिक आधारावरील आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक असू शकतं. कारण ते जातीवर आधारित नाही, असंही ते पुढे म्हणाले.  

टॅग्स :Trivendra Singh Rawatत्रिवेंद्र सिंह रावतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा