शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'साहेब! माझे घर कोणीतरी चोरले आहे, समजत नाही आता काय करू ?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 14:32 IST

बिलासपूरमधील एका 60 वर्षीय महिलेने आपले घर चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

बिलासपूर : तुम्ही अनेकदा चोरी झाल्याच्या घटना ऐकल्या असतील. यामध्ये घरातील सोने, रुपये किंवा घरगुती वस्तू चोरीला गेल्याच्या घटना असतील. मात्र, या ठिकाणी घरच चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

बिलासपूरमधील एका 60 वर्षीय महिलेने आपले घर चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरांचे वाटप करण्यात आले. या योजनेसाठी महिलेने काही पैसे सुद्धा भरले होते. मात्र, अद्याप तिला घर भेटले नाही. त्यामुळे सध्या या महिलेला कच्च्या घरात राहावे लागत आहे.    

या महिलेने घरासाठी 80 हजार रुपयांचा हप्ता सुद्धा भरला आहे. मात्र, तिला अद्याप घर भेटले नाही. यासंबंधीच्या अधिकाऱ्यांशी आमचे बोलणे झाले. परंतू त्यांनी यावर चर्चा करण्याचे टाळले. त्यामुळे आता याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलो आहोत, असे या गावच्या सरपंचानी सांगितले. तर, तक्रारदार महिला म्हणाली की, सरकारी अधिकाऱ्यांनी माझे घर चोरी केले आहे. वाटप करण्यात आलेल्या घरांसाठी मी पैसे सुद्धा भरले आहेत. मात्र, मला अद्याप घर मिळाले नाही. 

गावचे सरपंच म्हणाले, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 2018-19 मध्ये गावातील लोकांना 72 घरे वाटत करण्यात आली होती. यामधील 71 घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, एका घराचा अद्याप पत्ता नाही. हे गायब असलेले घर त्या महिलेचे आहे. याप्रकरणी आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेतली असून तपास सुरु केला आहे.     

टॅग्स :HomeघरChhattisgarhछत्तीसगडPoliceपोलिस