शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

धमक्यांमुळे विमाने जमिनीवर! ८५ विमानांना बॉम्बच्या धमक्या; कंपन्यांचे ६०० कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 14:15 IST

प्रवासी विमानांना धमक्या देण्याचे सत्र थांबत नसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: प्रवासी विमानांना धमक्या देण्याचे सत्र थांबत नसल्याचे विमान कंपन्या व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले असतानाच गुरुवारी आणखी ८५ विमानांना बॉम्बची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली. एअर इंडिया, इंडिगो व विस्तारा कंपनीच्या प्रत्येकी २० विमानांना, तर आकासा कंपनीच्या २५ विमानांना धमक्या मिळाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. गेल्या दहा दिवसांपासून विमानांना धमक्या मिळण्याचे सत्र सुरू असल्याने २५५ हून अधिक विमानांच्या उड्डाणावर विपरीत परिणाम झाला आहे. सततच्या धमक्यांमुळे विमान वाहतूक क्षेत्राचे ६०० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

आमच्या काही विमानांना सुरक्षेसंदर्भात इशारा मिळाल्याचा दावा आकासाने केला आहे. त्यामुळे विमान कंपनीच्या प्रतिसाद विभागाचे कर्मचारी स्थानिक प्राधिकरणांसह सुरक्षा आणि सुरक्षा शिष्टाचाराचे पालन करत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

विमाने हाय अलर्टवर

गोव्यातील विमानतळावर उतरणाऱ्या चार विमानांना बॉम्बची धमकी मिळाली. यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून गुरुवारी गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ, डाबोलिम व मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन्ही विमानतळांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले. धमकी मिळाल्याबरोबर दोन्ही विमानतळावर बॉम्ब धमकी मूल्यांकन समिती (बीटीएससी) स्थापन करण्यात आली. यापूर्वी मंगळवारी ५० पेक्षा अधिक विमानांना धमकी मिळाली होती. एअर इंडिया व इंडिगो कंपनीच्या प्रत्येकी १३, तर आकासा विमान कंपनीच्या १२ विमानांना धमकी मिळाली होती.

सरकार कठोर नियम लागू करणार

विमानांना वारंवार मिळणाऱ्या बॉम्बच्या धमक्यांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकार कठोर नियम लागू करण्याचा विचार करत आहे. धमक्या देऊन वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या उपद्रवी लोकांना ‘नो-फ्लाय’ यादीत टाकता येईल का, या अनुषंगानेदेखील विचार सुरू आहे. उपद्रवी लोकांची ओळख पटवून त्यांना विमानात प्रवेश करण्यावर निर्बंध घालणे हा ‘नो-फ्लाय’ यादीचा उद्देश असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे.

धमक्यांमुळे केंद्र सरकार ‘ॲक्शन मोड’वर

  • विमानांना मिळणाऱ्या बॉम्बच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बुधवारी एक्स, मेटा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स व विमान कंपन्यांसोबत व्हर्च्युअल बैठक घेतली. 
  • बॉम्बच्या धमकीसंदर्भातील धोकादायक अफवा पसरू नये, यासाठी काय उपाययोजना केल्या यासंदर्भात मंत्रालयाने त्यांना विचारणा केली.
  • तुम्ही गुन्ह्याला प्रोत्साहन देत होता, हे परिस्थितीवरून स्पष्ट होत असल्याचे नमूद करत मंत्रालयाने एक्स, मेटा या सोशल मीडियांची चांगलीच कानउघाडणी केली.

१४ ऑक्टोबरपासून रोज धमक्या

  • या महिन्यात १४ ऑक्टोबरपासून विमान कंपन्यांना बॉम्बची धमकी मिळण्याची मालिका सुरू झाली.
  • त्यानंतर सातत्याने इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा व आकासा विमान कंपन्यांच्या फ्लाइट्सना बॉम्बच्या धमक्या येत आहेत.
  • १४ ऑक्टोबरपासून २३ ऑक्टोबरपर्यंत लागोपाठ विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या मिळत आहेत.

काय केल्या उपाययोजना?

सतत धमक्या मिळत असल्याने केंद्र सरकारने १६ ऑक्टोबर रोजी एअर मार्शलची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. याच दिवशी गृह मंत्रालयाने खोट्या धमक्यांसंदर्भात हवाई वाहतूक मंत्रालयाकडे अहवाल मागितला.१९ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकार व विमान कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बैठक घेत बॉम्बच्या धमक्यांवर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली.

टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळPoliceपोलिसBombsस्फोटके