शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

धमक्यांमुळे विमाने जमिनीवर! ८५ विमानांना बॉम्बच्या धमक्या; कंपन्यांचे ६०० कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 14:15 IST

प्रवासी विमानांना धमक्या देण्याचे सत्र थांबत नसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: प्रवासी विमानांना धमक्या देण्याचे सत्र थांबत नसल्याचे विमान कंपन्या व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले असतानाच गुरुवारी आणखी ८५ विमानांना बॉम्बची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली. एअर इंडिया, इंडिगो व विस्तारा कंपनीच्या प्रत्येकी २० विमानांना, तर आकासा कंपनीच्या २५ विमानांना धमक्या मिळाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. गेल्या दहा दिवसांपासून विमानांना धमक्या मिळण्याचे सत्र सुरू असल्याने २५५ हून अधिक विमानांच्या उड्डाणावर विपरीत परिणाम झाला आहे. सततच्या धमक्यांमुळे विमान वाहतूक क्षेत्राचे ६०० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

आमच्या काही विमानांना सुरक्षेसंदर्भात इशारा मिळाल्याचा दावा आकासाने केला आहे. त्यामुळे विमान कंपनीच्या प्रतिसाद विभागाचे कर्मचारी स्थानिक प्राधिकरणांसह सुरक्षा आणि सुरक्षा शिष्टाचाराचे पालन करत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

विमाने हाय अलर्टवर

गोव्यातील विमानतळावर उतरणाऱ्या चार विमानांना बॉम्बची धमकी मिळाली. यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून गुरुवारी गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ, डाबोलिम व मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन्ही विमानतळांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले. धमकी मिळाल्याबरोबर दोन्ही विमानतळावर बॉम्ब धमकी मूल्यांकन समिती (बीटीएससी) स्थापन करण्यात आली. यापूर्वी मंगळवारी ५० पेक्षा अधिक विमानांना धमकी मिळाली होती. एअर इंडिया व इंडिगो कंपनीच्या प्रत्येकी १३, तर आकासा विमान कंपनीच्या १२ विमानांना धमकी मिळाली होती.

सरकार कठोर नियम लागू करणार

विमानांना वारंवार मिळणाऱ्या बॉम्बच्या धमक्यांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकार कठोर नियम लागू करण्याचा विचार करत आहे. धमक्या देऊन वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या उपद्रवी लोकांना ‘नो-फ्लाय’ यादीत टाकता येईल का, या अनुषंगानेदेखील विचार सुरू आहे. उपद्रवी लोकांची ओळख पटवून त्यांना विमानात प्रवेश करण्यावर निर्बंध घालणे हा ‘नो-फ्लाय’ यादीचा उद्देश असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे.

धमक्यांमुळे केंद्र सरकार ‘ॲक्शन मोड’वर

  • विमानांना मिळणाऱ्या बॉम्बच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बुधवारी एक्स, मेटा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स व विमान कंपन्यांसोबत व्हर्च्युअल बैठक घेतली. 
  • बॉम्बच्या धमकीसंदर्भातील धोकादायक अफवा पसरू नये, यासाठी काय उपाययोजना केल्या यासंदर्भात मंत्रालयाने त्यांना विचारणा केली.
  • तुम्ही गुन्ह्याला प्रोत्साहन देत होता, हे परिस्थितीवरून स्पष्ट होत असल्याचे नमूद करत मंत्रालयाने एक्स, मेटा या सोशल मीडियांची चांगलीच कानउघाडणी केली.

१४ ऑक्टोबरपासून रोज धमक्या

  • या महिन्यात १४ ऑक्टोबरपासून विमान कंपन्यांना बॉम्बची धमकी मिळण्याची मालिका सुरू झाली.
  • त्यानंतर सातत्याने इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा व आकासा विमान कंपन्यांच्या फ्लाइट्सना बॉम्बच्या धमक्या येत आहेत.
  • १४ ऑक्टोबरपासून २३ ऑक्टोबरपर्यंत लागोपाठ विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या मिळत आहेत.

काय केल्या उपाययोजना?

सतत धमक्या मिळत असल्याने केंद्र सरकारने १६ ऑक्टोबर रोजी एअर मार्शलची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. याच दिवशी गृह मंत्रालयाने खोट्या धमक्यांसंदर्भात हवाई वाहतूक मंत्रालयाकडे अहवाल मागितला.१९ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकार व विमान कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बैठक घेत बॉम्बच्या धमक्यांवर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली.

टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळPoliceपोलिसBombsस्फोटके