शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

हातगाड्यावर विमान अन्..! 'त्या 'कार्टूनचा उल्लेख करत पीएम मोदींची काँग्रेसवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 19:05 IST

'तत्कालीन काँग्रेस सरकार 21 व्या शतकाच्या गप्पा करायचे, पण 20 व्या शतकाच्या गरजाही पूर्ण करू शकले नाही.'

PM Narendra Modi in Parliament : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला मंगळवारी (4 फेब्रुवारी 2025) उत्तर दिले. यावेळी त्यांनी सभागृहात राजीव गांधींचे नाव न घेता, त्यांच्या सरकारचा उल्लेख करताना काँग्रेसची खिल्ली उडवली. ते म्हणाले की, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेस 21 व्या शतकाच्या गप्पा करायचे, पण 20 व्या शतकाच्या गरजाही पूर्ण करू शकले नाही. 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'एक पंतप्रधान वारंवार 21वे शतक-21वे शतक म्हणायचे. ही त्यांची सवयच बनली होती. व्यंगचित्रकार आरके लक्ष्मण यांनी टाईम्स ऑफ इंडियामध्ये एक अप्रतिम व्यंगचित्र काढले होते. त्यात एक विमान आहे, एक पायलट आहे, विमानात काही प्रवासी बसलेत, पण ते विमान उडत नाहीये, तर हातगाड्यावरुन 21 व्या शतकाकडे नेले जात आहे. त्यावेळी हा विनोद वाटत होता, पण नंतर हा खरा ठरला. तत्कालीन पंतप्रधान जमिनीच्या वास्तवापासून किती डिस्कनेक्ट होते, हे त्या व्यंगचित्रातून दाखवले गेले. तेव्हा फक्त 21 व्या शतकाच्या गप्पा मारल्या जायच्या, पण 20 व्या शतकाच्या गरजाही पूर्ण करू शकले नाही', अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.

'गेल्या दहा वर्षांत मला सर्व काही तपशीलवार पाहण्याची संधी मिळाली, तेव्हा मला खूप वेदना होतात. आपला देश 40-50 वर्षे मागे आहे. हे काम 40-50 वर्षांपूर्वी व्हायला हवे होते, पण झाले नाही. त्यामुळेच 2014 साली मला देशातील जनतेने सेवेची संधी दिली. आमच्या सरकारने तरुणांवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले, त्यांच्या आकांक्षांवर भर दिला आणि त्यांच्यासाठी अधिकाधिक संधी निर्माण केल्या. आम्ही अनेक क्षेत्रे खुली केली, ज्यामुळे तरुण आपली क्षमता दाखवू शकले. अंतराळ क्षेत्र खुले केले, संरक्षण क्षेत्र खुले केले, नवनिर्मितीला चालना देण्यासाठी अनेक नवीन योजनांना आकार दिला,' असंही मोदी यावेळी म्हणाले. 

राजीव गांधींचा 'मिस्टर क्लीन' उल्लेखपीएम मोदी पुढे म्हणतात, टमिस्टर क्लीन म्हणून ओळखले जाणारे एक पंतप्रधान होते. त्यांनी सार्वजनिक मंचावर एक मुद्दा उपस्थित केला होता की, जेव्हा दिल्लीतून एक रुपया पाठवला की, जनतेपर्यंत फक्त 15 पैसे पोहोचतात. त्यावेळी पंचायत ते संसदेपर्यंत एकाच पक्षाची सत्ता होती. 85 पैसे कुठे जायचे, हे सर्वसामान्यांना सहज समजू शकत होते. देशाने आम्हाला संधी दिली, आम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. आमचे मॉडेल बचत आणि विकासाचे आहे. आम्ही जनधन, आधारद्वारे थेट हस्तांतरण सुरू केले. आमच्या कार्यकाळात आम्ही 40 लाख कोटी रुपये थेट जनतेच्या खात्यात जमा केले. पूर्वी वृत्तपत्रांतील मथळे घोटाळे आणि भ्रष्टाचाराशी संबंधित असायचे. गेल्या 10 वर्षात घोटाळे न झाल्यामुळे देशातील लाखो कोटी रुपये वाचले असून, ते जनतेच्या सेवेत वापरले जात आहेत. आम्ही उचललेल्या विविध पावलांमुळे लाखो आणि करोडो रुपयांची बचत झाली, तो पैसा आम्ही देशाच्या उभारणीसाठी वापरला, असा दावाही मोदींनी यावेळी केला.ट 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी