शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
3
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
4
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
5
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
6
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
7
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
8
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
9
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
10
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
11
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
12
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
13
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
14
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
15
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
16
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
17
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
18
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
19
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
20
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 17:16 IST

Rajasthan News: काही दिवसांपूर्वी केदारनाथ येथे झालेल्या एका भीषण हेलिकॉप्टर अपघातात काही भाविकांसह पायलट लेफ्टनंट कर्नल राजवीर सिंह चौहान यांचाही मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेला १३ दिवस उलटत नाहीत तोच पुत्रवियोगाने दुखी झालेल्या आईनेही आज जयपूर येथे प्राण सोडले.

काही दिवसांपूर्वी केदारनाथ येथे झालेल्या एका भीषण हेलिकॉप्टर अपघातात काही भाविकांसह पायलट लेफ्टनंट कर्नल राजवीर सिंह चौहान यांचाही मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेला १३ दिवस उलटत नाहीत तोच पुत्रवियोगाने दुखी झालेल्या आईनेही आज जयपूर येथे प्राण सोडले.

राजवीर सिंह यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या आईला जबर मानसिक धक्का बसला होता. त्यांना आपल्या मुलाचा वियोग सहन होत नव्हता. दरम्यान, आज अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांना जबर धक्का बसला होता. तसेच त्यांची प्रकृती गंभीर होती, असे डॉक्टरांनी सांगितले.

राजवीर सिंह यांना अखेरचा निरोप देतानाच त्यांच्या आईची प्रकृती खालावली होती. मुलाच्या मृतदेहाकडे पाहून त्या सारख्या बेशुद्ध पडत होत्या. दरम्यान, आज त्यांचं निधन झाल्याने आधीच राजवीर सिंह यांच्या अकाली जाण्याने शोकसागरात बुडालेल्या कुटुंबावर आणखी एक दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

राजवीर सिंह हे लष्करामध्ये सेवेत होते. निवृत्तीनंतर त्यांनी आर्यन एव्हीएशन कंपनीमध्ये पायलट म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. राजवीर सिंह यांची पत्नीही भारतीय लष्करात सेवेत असून, चार महिन्यांपूर्वीच त्यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला होता.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानIndian Armyभारतीय जवानKedarnathकेदारनाथAccidentअपघात