शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
2
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
3
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
4
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
5
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
6
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
7
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
8
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
9
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
10
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
11
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
12
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
13
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
15
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
16
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
17
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
18
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
19
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
20
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?

पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 15:25 IST

या जनहित याचिकेत अशी मागणी करण्यात आली होती की, ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी या लोकांना निर्घृणपणे मारले त्या ठिकाणाचे नाव 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' असे ठेवावे. 

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात मंगळवारी दाखल झालेली एक जनहित याचिका फेटाळण्यात आली. ही याचिका जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या एका भीषण घटनेशी संबंधित होती. याचिकेत अशी मागणी करण्यात आली होती की, ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी धर्म विचारून २६ पर्यटकांची निर्घृण हत्या केली, त्या ठिकाणाला 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' असे नाव द्यावे. तसेच, या हल्ल्यात बळी पडलेल्या व्यक्तींना शहीदाचा दर्जा मिळावा, अशीही विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.

मुख्य न्यायाधीश शील नागू आणि न्यायमूर्ती सुमित गोयल यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळत स्पष्टपणे सांगितले की, अशा प्रकारचे निर्णय – म्हणजे एखाद्या ठिकाणाचे नाव बदलणे किंवा मृत व्यक्तींना शहीद घोषित करणे – हे पूर्णपणे सरकारच्या कार्यक्षेत्रात येते. न्यायालय यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही.

याचिका फेटाळतान काय म्हटलं?

खंडपीठाने नमूद केले, “स्मारक उभारणे, जागा जाहीर करणे किंवा तिचे नामकरण करणे हे सरकारचे काम आहे. याशिवाय, एखाद्या व्यक्तीस शहीद घोषित करणे देखील प्रशासनाचा निर्णय असतो. न्यायालय धोरण ठरवू शकत नाही, हे काम संसद किंवा संबंधित विधिमंडळाचे आहे.”

तथापि, न्यायालयाने याचिकाकर्त्याला सल्ला दिला की तो या संदर्भात सरकारकडे अधिकृत निवेदन देऊ शकतो. सरकार त्याचा विचार कायदेशीर चौकटीत करून निर्णय घेऊ शकते. न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राबाहेर असलेल्या या विषयात न्यायालयाने स्वतःला दूर ठेवले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला