शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

पुलवामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; निमलष्करी दलाला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 16:43 IST

निमलष्करी दलाला आता हवाई मार्गानं ये-जा करता येणार

नवी दिल्ली: पुलवामासारख्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मोदी सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. श्रीनगरहून येण्या-जाण्यासाठी निमलष्करी दलाचे जवान आता हवाई मार्गाचा वापर करु शकतात. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली, जम्मू-श्रीनगर आणि श्रीनगर-जम्मू या दरम्यान निमलष्करी दलाचे जवान हवाई मार्गानं प्रवास करु शकतात. केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलाच्या जवानांसाठीही हा आदेश लागू असेल.गृह मंत्रालयाच्या आदेशाचा फायदा निमलष्करी दलाच्या 7 लाख 80 हजार जनानांना होईल. यामध्ये कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, एएसआईपासून सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. निमलष्करी दलाच्या जवानांना हवाई मार्गानं प्रवास करता येत नव्हता. पुलवामात ज्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला, त्यात सीआरपीएफचे तब्बल अडीच हजार जवान होते. इतके जवान एकाचवेळी का प्रवास करत होते, असा प्रश्न या हल्ल्यानंतर उपस्थित झाला. या जवानांना हवाई मार्गानं श्रीनगरला पाठवण्यात आलं असतं, तर हल्ला टाळता आला असता, अशी चर्चादेखील त्यावेळी झाली. त्यामुळे आता सरकारनं निमलष्करी दलाच्या जवानांना हवाई मार्गानं प्रवास करण्याचे अधिकार दिले आहेत. आठवड्याभरापूर्वी पुलवामात सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. स्फोटकांनी भरलेल्या गाडीनं ताफ्यातील एका बसला जोरदार धडक दिल्यानं मोठी दुर्घटना घडली. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. अडीच हजार जवानांचा ताफा श्रीनगरला जात होता. इतक्या मोठ्या संख्येनं जवान रस्त्यानं प्रवास करणार असल्यानं सुरक्षेचा मुद्दा होता. त्यामुळे त्यांना हवाई मार्गानं नेण्याची परवानगी मागण्यात आली होती. मात्र गृह मंत्रालयानं ती दिली नाही, असं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. मात्र हे वृत्त निराधार असल्याचं स्पष्टीकरण गृह मंत्रालयानं दिलं होतं. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद