शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

पतीच्या मृत्यूनंतर आर्थिक संकट; अवघ्या २० रुपयांत सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 14:42 IST

वंदना यांचा हा प्रवास सोपा नव्हता. पतीच्या निधनानंतर वंदना यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला,

रायपूरच्या कैलाशपुरी भागातील रहिवासी वंदना ठक्कर यांनी १५ वर्षांपूर्वी त्यांच्या दोन्ही मुली राधा आणि भक्ती यांच्या नावावर फक्त २० रुपयांत राधाभक्ती गृह उद्योग सुरू केला. आज त्या ३० हून अधिक प्रकारचे घरगुती अन्नपदार्थ तयार करत आहेत. तसेच १० महिलांना रोजगार देखील देत आहे. त्यांनी बनवलेला चिवडा, लाडू आणि इतर उत्पादनं छत्तीसगडसह देशातील अनेक राज्यांमध्ये आणि अगदी परदेशातही आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. 

वंदना यांचा हा प्रवास सोपा नव्हता. पतीच्या निधनानंतर वंदना यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, परंतु त्यांच्या कौशल्याने आणि दृढनिश्चयाने त्यांनी आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीवर मात केली. सासरच्या कुटुंबाकडून आणि माहेरच्या घरातून मिळालेल्या पाठिंब्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला. 

रायपूर तसेच दुर्ग, भिलाई आणि इतर शहरांच्या बाजारपेठांमध्ये वंदना यांनी आपल्य़ा खाद्यपदार्थाने स्वतःचं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. वंदनाच्या उत्पादनांचं वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे शुद्ध आणि घरी बनवलेले असतात. त्यांच्या खाद्यपदार्थांना केवळ दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूसारख्या देशातील मोठ्या शहरांमध्येच मागणी नाही, तर परदेशातील लोकांनाही ते खूप आवडतात. 

वंदना यांनी तयार केलेले अन्नपदार्थ २ महिने खराब होत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या ग्राहकांचा विश्वास टिकून राहतो. कठोर परिश्रम आणि समर्पण प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी दृढनिश्चय आणि आत्मविश्वासाने प्रत्येक अडचणीवर मात करता येतं हेच यातून सिद्ध होतं.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी