शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

एसएफआयओची कामगिरीही खिन्न करणारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 07:23 IST

गेल्या ३ वर्षांतील आर्थिक घोटाळे : गुंतल्या कंपन्या ५७६, चौकशी पूर्ण फक्त २९ प्रकरणांत

हरीश गुप्तानवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालय (ईडी) १५ वर्षांत फक्त १४ जणांनाच दोषी सिद्ध करू शकले. अशीच क्षीण कामगिरी कंपन्यांतील फसवणुकीचा तपास करणारी दुसरी महत्त्वाची तपास संस्था सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसचीही (एसएफआयओ) आहे. एसएफआयओ कंपनी कामकाज मंत्रालयांतर्गत काम करते. एसएफआयओची कामगिरी खिन्न करणारी आहे. एसएफआयओ कामकाजात स्वतंत्र आहे. अटक करण्याचे आणि झडत्या घेण्याचेही अधिकार तिला आहेत. कंपन्या आणि महामंडळांनी केलेल्या गंभीर लबाड्यांना हाताळण्यासाठी सरकारने एसएफआयओची स्थापना केली आहे.

‘लोकमत’ने मिळविलेल्या माहितीनुसार एसएफआयओने २०१७-२०१८ वर्षात १३२ कंपन्यांची चौकशी केली; परंतु प्रत्यक्षात पाचच प्रकरणांत तपास पूर्ण होऊ शकला. त्याच्या पुढ्च्या वर्षीची कामगिरीही फारशी चांगली नव्हती कारण यंत्रणेने ८३ कंपन्यांची चौकशी सुरू केली. प्रत्यक्षात फक्त १२ प्रकरणांतच ती पूर्णत्वास गेली. २०१९-२०२० वर्षात ३६१ कंपन्यांची चौकशी केली गेली. प्रत्यक्षात फक्त १२ प्रकरणांना पूर्णत्व लाभले.

लोकसभेत भाजपचे दुष्यंत सिंह यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कंपनी कामकाज मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होते की, एसएफआयओकडून ९२ प्रकरणांची चौकशी सुरू आहे. या ९२ प्रकरणांत न्यायालयांनी ज्या सहा प्रकरणांना स्थगिती दिली त्यांचा समावेश नाही. तथापि, ज्या कंपन्यांनी पैशांबाबत मोठी लबाडी केली त्या पहिल्या ५० कंपन्यांचा तपशील द्यावा या मागणीला उत्तर त्यांनी दिले नाही. ठाकूर यांनी या प्रकरणांचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्या कंपन्यांनी किती रकमेची लबाडी केली हे समजेल, असे सांगून रकमेचा उल्लेख केला नाही.

...आणि पितळ उघडे पडले आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना अनुराग ठाकूर म्हणाले की, ११८२ तक्रारी दाखल झाल्या असून, ४६२ तक्रारींचा निपटारा झाला आहे आणि ३२६ प्रकरणांत दोषसिद्धीही झाली आहे. परंतु गेल्या तीन वर्षांचा एसएफआयओच्या कामगिरीचा तपशील मिळविण्यात आल्यावर पितळ उघडे पडले. 

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा