शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

‘त्या’ अधिकारी, व्यायसायिकांवर जनतेचा भारी राग! ५ पैकी ४ भारतीयांचे मत, इप्साेस यूकेचा सर्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 06:12 IST

India News: निसर्गासह पर्यावरणाचे नुकसान करणारे भारतीय सरकारी अधिकारी तसेच मोठ्या व्यवसायांशी संबंधित लोकांची कृत्ये ही गंभीर गुन्हा असल्याचे घोषित करावे, असे ५ पैकी ४ भारतीयांना वाटते. एका नव्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे.

 नवी दिल्ली  - निसर्गासह पर्यावरणाचे नुकसान करणारे भारतीय सरकारी अधिकारी तसेच मोठ्या व्यवसायांशी संबंधित लोकांची कृत्ये ही गंभीर गुन्हा असल्याचे घोषित करावे, असे ५ पैकी ४ भारतीयांना वाटते. एका नव्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे. ‘इप्सोस यूके’ने घेतलेल्या आणि ‘अर्थ ४ ऑल’ तसेच ‘ग्लोबल कॉमन अलायन्स’द्वारा कार्यान्वित या सर्व्हेनुसार हवामान बदल आणि पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे ५ पैकी ३ (६१ टक्के) भारतीयांना वाटते. निसर्गाच्या सध्या असलेल्या अवस्थेबद्दल यांतील ९० लोक चिंतित असून, या सर्वेक्षणात सहभागी ७३ टक्के लोकांना  हवामान बदलामुळे निसर्गामध्ये होणाऱ्या आकस्मिक बदलांची चिंता वाटते.

यानुसार, पृथ्वीवरील वर्षावन आणि हिमनद्यांसारख्या नैसर्गिक प्रणालींमध्ये झालेले हे बदल निसर्गाच्या संतुलनाला घातक ठरू शकतात. हे बदल पूर्वस्थितीत आणणे अत्यंत कठीण होऊ शकते, असे या लोकांना वाटते. ५७ टक्के लोकांनुसार, हवामान बदलाच्या या समस्येवर तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या जीवनशैलीत फार मोठे बदल न करता उपाय शक्य आहे. तर, ५४ टक्के लोकांच्या मते पर्यावरणासंबंधी धोक्यांबाबत केले जाणारे दावे अतिशयोक्तीपूर्ण आहेत.

असे झाले सर्वेक्षणया सर्वेक्षणात जी-२०च्या १८ देशांतील नागरिकांचा समावेश करण्यात आला होता. या देशांत अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मॅक्सिको, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, ब्रिटन तसेच अमेरिका या देशांचा समावेश आहे. याशिवाय, जी-२० बाहेरचे ऑस्ट्रिया, डेन्मार्क, केनिया आणि स्वीडन या देशांतील नागरिकांची मतेही या सर्व्हेत जाणून घेण्यात आली. 

तापमानाने यंदामोडला विक्रमसन २०२४मध्ये जगभर उष्मा प्रचंड वाढल्याने हे वर्ष विक्रमी तापमान असलेले वर्ष ठरू शकते; कारण, या वर्षी तापमानाचे हे विक्रम मोडले ते गेल्या वर्षीच नोंदले गेले आहेत.युरोपीय हवामानशास्त्रविषयक संस्था ‘कॉपरनिकस’ने ही माहिती दिली आहे. अभ्यासकांनुसार, यंदा मानवी चुका आणि अल-निनोच्या प्रभावामुळे तापमान उच्च पातळीवर होते.विशेषत: जून महिन्यात जगाच्या बहुतांश भागांत त्या-त्या भागातील हवामानानुसार विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणIndiaभारत