शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

‘त्या’ अधिकारी, व्यायसायिकांवर जनतेचा भारी राग! ५ पैकी ४ भारतीयांचे मत, इप्साेस यूकेचा सर्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 06:12 IST

India News: निसर्गासह पर्यावरणाचे नुकसान करणारे भारतीय सरकारी अधिकारी तसेच मोठ्या व्यवसायांशी संबंधित लोकांची कृत्ये ही गंभीर गुन्हा असल्याचे घोषित करावे, असे ५ पैकी ४ भारतीयांना वाटते. एका नव्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे.

 नवी दिल्ली  - निसर्गासह पर्यावरणाचे नुकसान करणारे भारतीय सरकारी अधिकारी तसेच मोठ्या व्यवसायांशी संबंधित लोकांची कृत्ये ही गंभीर गुन्हा असल्याचे घोषित करावे, असे ५ पैकी ४ भारतीयांना वाटते. एका नव्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे. ‘इप्सोस यूके’ने घेतलेल्या आणि ‘अर्थ ४ ऑल’ तसेच ‘ग्लोबल कॉमन अलायन्स’द्वारा कार्यान्वित या सर्व्हेनुसार हवामान बदल आणि पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे ५ पैकी ३ (६१ टक्के) भारतीयांना वाटते. निसर्गाच्या सध्या असलेल्या अवस्थेबद्दल यांतील ९० लोक चिंतित असून, या सर्वेक्षणात सहभागी ७३ टक्के लोकांना  हवामान बदलामुळे निसर्गामध्ये होणाऱ्या आकस्मिक बदलांची चिंता वाटते.

यानुसार, पृथ्वीवरील वर्षावन आणि हिमनद्यांसारख्या नैसर्गिक प्रणालींमध्ये झालेले हे बदल निसर्गाच्या संतुलनाला घातक ठरू शकतात. हे बदल पूर्वस्थितीत आणणे अत्यंत कठीण होऊ शकते, असे या लोकांना वाटते. ५७ टक्के लोकांनुसार, हवामान बदलाच्या या समस्येवर तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या जीवनशैलीत फार मोठे बदल न करता उपाय शक्य आहे. तर, ५४ टक्के लोकांच्या मते पर्यावरणासंबंधी धोक्यांबाबत केले जाणारे दावे अतिशयोक्तीपूर्ण आहेत.

असे झाले सर्वेक्षणया सर्वेक्षणात जी-२०च्या १८ देशांतील नागरिकांचा समावेश करण्यात आला होता. या देशांत अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मॅक्सिको, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, ब्रिटन तसेच अमेरिका या देशांचा समावेश आहे. याशिवाय, जी-२० बाहेरचे ऑस्ट्रिया, डेन्मार्क, केनिया आणि स्वीडन या देशांतील नागरिकांची मतेही या सर्व्हेत जाणून घेण्यात आली. 

तापमानाने यंदामोडला विक्रमसन २०२४मध्ये जगभर उष्मा प्रचंड वाढल्याने हे वर्ष विक्रमी तापमान असलेले वर्ष ठरू शकते; कारण, या वर्षी तापमानाचे हे विक्रम मोडले ते गेल्या वर्षीच नोंदले गेले आहेत.युरोपीय हवामानशास्त्रविषयक संस्था ‘कॉपरनिकस’ने ही माहिती दिली आहे. अभ्यासकांनुसार, यंदा मानवी चुका आणि अल-निनोच्या प्रभावामुळे तापमान उच्च पातळीवर होते.विशेषत: जून महिन्यात जगाच्या बहुतांश भागांत त्या-त्या भागातील हवामानानुसार विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणIndiaभारत