शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

‘त्या’ अधिकारी, व्यायसायिकांवर जनतेचा भारी राग! ५ पैकी ४ भारतीयांचे मत, इप्साेस यूकेचा सर्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 06:12 IST

India News: निसर्गासह पर्यावरणाचे नुकसान करणारे भारतीय सरकारी अधिकारी तसेच मोठ्या व्यवसायांशी संबंधित लोकांची कृत्ये ही गंभीर गुन्हा असल्याचे घोषित करावे, असे ५ पैकी ४ भारतीयांना वाटते. एका नव्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे.

 नवी दिल्ली  - निसर्गासह पर्यावरणाचे नुकसान करणारे भारतीय सरकारी अधिकारी तसेच मोठ्या व्यवसायांशी संबंधित लोकांची कृत्ये ही गंभीर गुन्हा असल्याचे घोषित करावे, असे ५ पैकी ४ भारतीयांना वाटते. एका नव्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे. ‘इप्सोस यूके’ने घेतलेल्या आणि ‘अर्थ ४ ऑल’ तसेच ‘ग्लोबल कॉमन अलायन्स’द्वारा कार्यान्वित या सर्व्हेनुसार हवामान बदल आणि पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे ५ पैकी ३ (६१ टक्के) भारतीयांना वाटते. निसर्गाच्या सध्या असलेल्या अवस्थेबद्दल यांतील ९० लोक चिंतित असून, या सर्वेक्षणात सहभागी ७३ टक्के लोकांना  हवामान बदलामुळे निसर्गामध्ये होणाऱ्या आकस्मिक बदलांची चिंता वाटते.

यानुसार, पृथ्वीवरील वर्षावन आणि हिमनद्यांसारख्या नैसर्गिक प्रणालींमध्ये झालेले हे बदल निसर्गाच्या संतुलनाला घातक ठरू शकतात. हे बदल पूर्वस्थितीत आणणे अत्यंत कठीण होऊ शकते, असे या लोकांना वाटते. ५७ टक्के लोकांनुसार, हवामान बदलाच्या या समस्येवर तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या जीवनशैलीत फार मोठे बदल न करता उपाय शक्य आहे. तर, ५४ टक्के लोकांच्या मते पर्यावरणासंबंधी धोक्यांबाबत केले जाणारे दावे अतिशयोक्तीपूर्ण आहेत.

असे झाले सर्वेक्षणया सर्वेक्षणात जी-२०च्या १८ देशांतील नागरिकांचा समावेश करण्यात आला होता. या देशांत अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मॅक्सिको, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, ब्रिटन तसेच अमेरिका या देशांचा समावेश आहे. याशिवाय, जी-२० बाहेरचे ऑस्ट्रिया, डेन्मार्क, केनिया आणि स्वीडन या देशांतील नागरिकांची मतेही या सर्व्हेत जाणून घेण्यात आली. 

तापमानाने यंदामोडला विक्रमसन २०२४मध्ये जगभर उष्मा प्रचंड वाढल्याने हे वर्ष विक्रमी तापमान असलेले वर्ष ठरू शकते; कारण, या वर्षी तापमानाचे हे विक्रम मोडले ते गेल्या वर्षीच नोंदले गेले आहेत.युरोपीय हवामानशास्त्रविषयक संस्था ‘कॉपरनिकस’ने ही माहिती दिली आहे. अभ्यासकांनुसार, यंदा मानवी चुका आणि अल-निनोच्या प्रभावामुळे तापमान उच्च पातळीवर होते.विशेषत: जून महिन्यात जगाच्या बहुतांश भागांत त्या-त्या भागातील हवामानानुसार विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणIndiaभारत