शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 07:31 IST

शुक्रवारी रात्री कच्छ भागात ड्रोनहल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता. तो भारतीय लष्कराने हाणून पाडला.

भुजः भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या कच्छमधील प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचा व गरज नसताना घराबाहेर न पडण्याचा सल्ला शनिवारी जारी केला. शुक्रवारी रात्री कच्छ भागात ड्रोनहल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता. तो भारतीय लष्कराने हाणून पाडला. त्यानंतर कच्छसह अन्य २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट करण्यात आले. प्रशासनाने हा सल्ला जारी केला.

पाकिस्तानने ड्रोनहल्ल्यांचा मारा केल्यामुळे राजस्थानच्या सीमावर्ती भागात नागरिकांनी २ रात्री जागून काढल्या. भारतीय लष्कराने पाकचे बहुतांश ड्रोन हवेतच निकामी केल्यामुळे लोकांचा लष्करावरील विश्वास द्विगुणित झाला. पश्चिम राजस्थानमध्ये शुक्रवारी रात्री संपूर्ण ब्लॅकआउट करण्यात आले.

भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर गरज पडल्यास युद्धासाठी कर्तव्यावर परत जाण्यासाठी सज्ज असल्याचा दावा हवाई दलातील माजी पायलट व तेलंगाणाचे मंत्री एन. उत्तम कुमार रेड्डी यांनी केला. हैदराबाद येथील गांधी भवनात माध्यमांशी संवाद साधताना स्वतःची लष्करी पार्श्वभूमीही त्यांनी स्पष्ट केली.

दिल्ली विमानतळ, वाहतूक सुरळीत

दिल्ली विमानतळावरील वाहतूक सुरुळीत आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हवाई क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीमुळे काही उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र, सायंकाळी दोन्ही देशांमध्ये शस्रसंधी झाल्यामुळे संपूर्ण हवाई वाहतूक पूर्ववत होण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही देशातील संघर्ष वाढल्यामुळे देशभरातील विमानतळावर कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात केला होता. राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामकाज पाहणाऱ्या दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (डायल) संस्थेने एक्स या सोशल माध्यमाद्वारे दिली. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनRajasthanराजस्थानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक