शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
3
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
4
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
5
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
6
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
7
Gold Silver Price 10 September: मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार
8
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
9
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
10
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
11
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
12
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
13
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
14
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
15
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
16
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
17
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
18
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
20
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?

Ghaziabad News: कोरोनानं माणूस नव्हे, नातीही संपली; ना खांदा द्यायला कुणी, अस्थिही कुणी घेईनात!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 12:13 IST

जेव्हा ते जिवंत होते तेव्हा खांद्याला खांदा लावून जगत होते. मुलांना बोट धरुन चालायला शिकवलं, खांद्यावर बसवून खेळवलं, आपल्या जवळच्यांचा विश्वास तुटू नये म्हणून जे हवं ते सारं केलं. पण कोरोना महामारीनं हे सारं संपुष्टात आणलं.

जेव्हा ते जिवंत होते तेव्हा खांद्याला खांदा लावून जगत होते. मुलांना बोट धरुन चालायला शिकवलं, खांद्यावर बसवून खेळवलं, आपल्या जवळच्यांचा विश्वास तुटू नये म्हणून जे हवं ते सारं केलं. पण कोरोना महामारीनं हे सारं संपुष्टात आणलं. कोरोनामुळे केवळ माणसाचा श्वास नव्हे, तर नातीही संपुष्टात आली. 

ज्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून चालले एकत्र जगले त्यांना कोरोनानंतर कुणी खांदा देईनात. स्मशानातही माणसं जाण्यास घाबरू लागली. काही कुटुंब आपल्या घरातील सदस्यासाठी स्मशानापर्यंत पोहोचले पण त्यांच्या अस्थि घेण्यासाठी परत आलेच नाहीत. 

ब्रजघाट गंगेच्या प्रवासात ४८ मृतदेह सापडले ही संपूर्ण कहाणी आहे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे गंगेच्या प्रवाहात आढळलेल्या ४८ मृतदेहांची. त्यांनी गेल्या दीड महिन्यात कोरोना महामारीमुळे आपला जीव गमावला. यातील ३० जणांचं तर कुटुंबातील कोणताही सदस्य अंत्यसंस्कारासाठी परत आलाच नाही. बेवारस म्हणून त्यांची नोंद करुन अंत्यसंस्कार करावे लागले. यातील १८ जण असे होते की ज्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता.

त्यांच्या कुटुंबातील सदस्य अंत्य संस्कारासाठी आले पण त्यांच्या अस्थि घेण्यासाठी ते परत आलेच नाहीत. त्यामुळे प्रशासनानंच त्यांच्या अस्थि गंगेत विसर्जित केल्या. मोक्ष घाटचे संचालक आचार्य मनीष पंडित यांनी सांगितलं की त्यांनी एकूण ४८ मृतदेहांच्या अस्थि गंगेत विसर्जित केल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत १५ एप्रिलनंतर रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यानंतर जिल्ह्यातील बहुतेक सराकीर आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता भासू लागली. ऑक्सिजनचा तुटवडा आणि उपचारांच्या अभावामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलं. 

एकवेळ तर अशी होती की रुग्ण रुग्णालयाबाहेर बेड रिकामी होईल यासाठी वाट पाहत उभा राहायचा आणि त्यातच त्याचा उपचारांअभावी मृत्यू होत होता. २१ एप्रिलपासून ते १० मेपर्यंत हिंडन मोक्ष स्थळावर परिस्थिती खूप बिकट होती. अंत्यसंस्कारासाठी रांग लागत होती. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ८ तास थांबावं लागत होतं. 

एका दिवसात एका स्मशान भूमीत तब्बल ७० ते ८० जणांवर अंत्य संस्कार केले जात होते. त्यामुळे स्थानिक नगरपालिकेनं अंत्य संस्काराची प्रक्रिया देखील स्वत:च्या हातात घेतली. मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी मृतदेहांचं विविध स्मशानभूमीमध्ये वर्गीकरण केलं जाऊ लागलं. 

सरकारी आकडे जरी मृतांची संख्या ४५० च्या जवळ असल्याचं सांगण्यात येत असलं तरी प्रत्यक्षात हा आकडा हजारापर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रशासन आणि आरोग्य विभागातील माहितीनुसार मोठ्या संख्येनं दिल्ली आणि जवळच्या जिल्ह्यांमधील कोरोना संक्रमित व्यक्तींवरील अंत्यसंस्कार हिंडन नदीच्या घाटावरच करण्यात आले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश