शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
3
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
4
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
5
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
6
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
7
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
8
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
9
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
10
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
11
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
12
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
13
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
14
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
15
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
16
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
17
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
18
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
19
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
20
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
Daily Top 2Weekly Top 5

Ghaziabad News: कोरोनानं माणूस नव्हे, नातीही संपली; ना खांदा द्यायला कुणी, अस्थिही कुणी घेईनात!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 12:13 IST

जेव्हा ते जिवंत होते तेव्हा खांद्याला खांदा लावून जगत होते. मुलांना बोट धरुन चालायला शिकवलं, खांद्यावर बसवून खेळवलं, आपल्या जवळच्यांचा विश्वास तुटू नये म्हणून जे हवं ते सारं केलं. पण कोरोना महामारीनं हे सारं संपुष्टात आणलं.

जेव्हा ते जिवंत होते तेव्हा खांद्याला खांदा लावून जगत होते. मुलांना बोट धरुन चालायला शिकवलं, खांद्यावर बसवून खेळवलं, आपल्या जवळच्यांचा विश्वास तुटू नये म्हणून जे हवं ते सारं केलं. पण कोरोना महामारीनं हे सारं संपुष्टात आणलं. कोरोनामुळे केवळ माणसाचा श्वास नव्हे, तर नातीही संपुष्टात आली. 

ज्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून चालले एकत्र जगले त्यांना कोरोनानंतर कुणी खांदा देईनात. स्मशानातही माणसं जाण्यास घाबरू लागली. काही कुटुंब आपल्या घरातील सदस्यासाठी स्मशानापर्यंत पोहोचले पण त्यांच्या अस्थि घेण्यासाठी परत आलेच नाहीत. 

ब्रजघाट गंगेच्या प्रवासात ४८ मृतदेह सापडले ही संपूर्ण कहाणी आहे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे गंगेच्या प्रवाहात आढळलेल्या ४८ मृतदेहांची. त्यांनी गेल्या दीड महिन्यात कोरोना महामारीमुळे आपला जीव गमावला. यातील ३० जणांचं तर कुटुंबातील कोणताही सदस्य अंत्यसंस्कारासाठी परत आलाच नाही. बेवारस म्हणून त्यांची नोंद करुन अंत्यसंस्कार करावे लागले. यातील १८ जण असे होते की ज्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता.

त्यांच्या कुटुंबातील सदस्य अंत्य संस्कारासाठी आले पण त्यांच्या अस्थि घेण्यासाठी ते परत आलेच नाहीत. त्यामुळे प्रशासनानंच त्यांच्या अस्थि गंगेत विसर्जित केल्या. मोक्ष घाटचे संचालक आचार्य मनीष पंडित यांनी सांगितलं की त्यांनी एकूण ४८ मृतदेहांच्या अस्थि गंगेत विसर्जित केल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत १५ एप्रिलनंतर रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यानंतर जिल्ह्यातील बहुतेक सराकीर आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता भासू लागली. ऑक्सिजनचा तुटवडा आणि उपचारांच्या अभावामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलं. 

एकवेळ तर अशी होती की रुग्ण रुग्णालयाबाहेर बेड रिकामी होईल यासाठी वाट पाहत उभा राहायचा आणि त्यातच त्याचा उपचारांअभावी मृत्यू होत होता. २१ एप्रिलपासून ते १० मेपर्यंत हिंडन मोक्ष स्थळावर परिस्थिती खूप बिकट होती. अंत्यसंस्कारासाठी रांग लागत होती. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ८ तास थांबावं लागत होतं. 

एका दिवसात एका स्मशान भूमीत तब्बल ७० ते ८० जणांवर अंत्य संस्कार केले जात होते. त्यामुळे स्थानिक नगरपालिकेनं अंत्य संस्काराची प्रक्रिया देखील स्वत:च्या हातात घेतली. मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी मृतदेहांचं विविध स्मशानभूमीमध्ये वर्गीकरण केलं जाऊ लागलं. 

सरकारी आकडे जरी मृतांची संख्या ४५० च्या जवळ असल्याचं सांगण्यात येत असलं तरी प्रत्यक्षात हा आकडा हजारापर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रशासन आणि आरोग्य विभागातील माहितीनुसार मोठ्या संख्येनं दिल्ली आणि जवळच्या जिल्ह्यांमधील कोरोना संक्रमित व्यक्तींवरील अंत्यसंस्कार हिंडन नदीच्या घाटावरच करण्यात आले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश