शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना पेन्शन देणार, भाजपाचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 14:16 IST

देशातील 60 वर्षावरील शेतकऱ्यांना आणि छोट्या व्यापाऱ्यांना पेन्शन सुरु करणार असल्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे.

नवी दिल्ली : आमागी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपाने आपल्या जाहीरनाम्याचे नाव ‘संकल्पपत्र’ असे ठेवले आहे. नवी दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयात 'संकल्पपत्र' प्रसिद्ध करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते.

भाजपाने सन 2022 पर्यंत आपल्या संकल्प पत्रातील 75 संकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये शेती, संरक्षण, व्यापार अशा विविध मुद्द्यावर भाजपाने 'संकल्पपत्र' तयार केले आहे. यात देशातील 60 वर्षावरील शेतकऱ्यांना आणि छोट्या व्यापाऱ्यांना पेन्शन सुरु करणार असल्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे. तसेच, किसान सन्मान निधीचा फायदा मिळणार असून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत. 

भाजपाच्या 'संकल्पपत्रा'तील महत्वाचे मुद्दे ...

- 1 लाखापर्यंतच्या कृषी कर्जावर 5 वर्षांपर्यंत कोणतेही व्याज नाही- सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार.- राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार - दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी- छोट्या व्यापाऱ्यांना पेंशन मिळणार- प्रत्येक घरात वीज, शौचालय पोहोचवण्यातं लक्ष्य- सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळाणार- तिहेरी तलाक विरोधात कठोर कायदा आणणार-सिटीजनशिप विधेयक लागू करणार- सर्व शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा फायदा मिळणार- समान नागरी कायदा लागू करणार.- देशातील छोट्या शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करणार- सन २०२२ पर्यंत देशभरातील सर्वच रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करणार- कलम ३५ अ रद्द करण्यासाठी सरकार कटिबद्ध - 5 किमी अंतरात बँकिंग सुविधा करणार- सरकारी प्रक्रिया, कामकाज संपूर्ण डिजिटल करण्यावर जोर- कलम 35-अ हटवण्यासाठी प्रयत्न करणार- 75 नवी वैद्यकीय महाविद्यालये निर्माण करणार- कुपोषणाचा स्तर घटवणार- आरोग्य सेवा घराच्या दाराशी पोहोचावी अशी व्यवस्था करणार- सर्व घरांत शौचालय असेल यावर काम करणार- सर्वांना घर मिळावे यासाठी संकल्पबद्ध- सर्वांना घरगुती गॅस उपलब्ध करून देणार- राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार- नल सें जल यावर काम करणार- दुष्काळ, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलशक्ती मंत्रालय बनवणार

टॅग्स :FarmerशेतकरीBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक