शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

सदोष वाहनांसाठी द्यावा लागणार 1 कोटीपर्यंत दंड, एप्रिलपासून लागू होणार नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 07:19 IST

केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने ‘केंद्रीय मोटार वाहन कायद्यां’तर्गत वाहनांबाबत तपासणी आणि परत बोलावणे यासंबंधीचे नवे नियम अधिसूचित केले आहेत. वाहन उत्पादक आणि आयातदार यांनी सदोष वाहने स्वत: परत बोलावली नाहीत, तर दंडाची तरतूद या नियमांत करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : येत्या एप्रिलपासून सदोष वाहनांबाबत नवे नियम लागू होत असून, सरकारच्या बंधनकारक आदेशान्वये सदोष वाहने परत बोलवावी लागल्यास उत्पादक कंपन्या व आयातदार यांना किमान १० लाखांपासून १ कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो.  (Penalties of up to Rs 1 crore will be levied for faulty vehicles, new rules will come into effect from April)

केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने ‘केंद्रीय मोटार वाहन कायद्यां’तर्गत वाहनांबाबत तपासणी आणि परत बोलावणे यासंबंधीचे नवे नियम अधिसूचित केले आहेत. वाहन उत्पादक आणि आयातदार यांनी सदोष वाहने स्वत: परत बोलावली नाहीत, तर दंडाची तरतूद या नियमांत करण्यात आली आहे. नव्या नियमातील भरमसाट दंडाच्या तरतुदीवरून टीका होत आहे. तथापि, मंत्रालयाने त्याचे जोरदार समर्थन केले आहे. दंडाची रक्कम ही दोष दूर करण्याच्या खर्चाव्यतिरिक्त असेल. २०१२ मध्ये वाहन उद्योगातील संघटना सियामने दंडाला विरोध केला होता. 

वाहने स्वत: परत बोलावण्यासाठी संहिता तयार करण्याची मागणी संघटनेने केली होती. तथापि, सरकारला हे मान्य झाले नाही. सदोष वाहनांची विक्री केल्यास कंपनीला जरब बसेल अशा दंडाची तरतूद असायला हवी, असे सरकारचे म्हणणे होते.नवे नियम सात वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या वाहनांना लागू होतील. कुठल्याही सुट्या भागात, घटकात अथवा सॉफ्टवेअरमध्ये रस्ते आणि पर्यावरण सुरक्षेस जोखमीत टाकणारी कुठल्याही प्रकारची त्रुटी असलेले वाहन ‘सदोष वाहन’ म्हणून गणले जाईल.

..तर कंपन्यांना दंड लावणारसहा लाख दुचाकी अथवा एक लाख चारचाकी वाहने परत बोलावणे अनिवार्य ठरल्यास कंपनीला १ कोटी रुपयांचा दंड होऊ शकेल. नऊपेक्षा जास्त प्रवासी क्षमतेची वाहने, तसेच सर्व अवजड प्रकारची वाहने यांच्या बाबतीत नियमात असे म्हटले आहे की, या श्रेणीतील ५० हजारपेक्षा जास्त वाहने सरकारच्या आदेशानुसार परत बोलावली गेली असतील, तर कंपन्यांना १ कोटी रुपयांचा दंड लावला जाऊ शकतो. 

टॅग्स :carकारCentral Governmentकेंद्र सरकारNitin Gadkariनितीन गडकरी