शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

सदोष वाहनांसाठी द्यावा लागणार 1 कोटीपर्यंत दंड, एप्रिलपासून लागू होणार नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 07:19 IST

केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने ‘केंद्रीय मोटार वाहन कायद्यां’तर्गत वाहनांबाबत तपासणी आणि परत बोलावणे यासंबंधीचे नवे नियम अधिसूचित केले आहेत. वाहन उत्पादक आणि आयातदार यांनी सदोष वाहने स्वत: परत बोलावली नाहीत, तर दंडाची तरतूद या नियमांत करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : येत्या एप्रिलपासून सदोष वाहनांबाबत नवे नियम लागू होत असून, सरकारच्या बंधनकारक आदेशान्वये सदोष वाहने परत बोलवावी लागल्यास उत्पादक कंपन्या व आयातदार यांना किमान १० लाखांपासून १ कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो.  (Penalties of up to Rs 1 crore will be levied for faulty vehicles, new rules will come into effect from April)

केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने ‘केंद्रीय मोटार वाहन कायद्यां’तर्गत वाहनांबाबत तपासणी आणि परत बोलावणे यासंबंधीचे नवे नियम अधिसूचित केले आहेत. वाहन उत्पादक आणि आयातदार यांनी सदोष वाहने स्वत: परत बोलावली नाहीत, तर दंडाची तरतूद या नियमांत करण्यात आली आहे. नव्या नियमातील भरमसाट दंडाच्या तरतुदीवरून टीका होत आहे. तथापि, मंत्रालयाने त्याचे जोरदार समर्थन केले आहे. दंडाची रक्कम ही दोष दूर करण्याच्या खर्चाव्यतिरिक्त असेल. २०१२ मध्ये वाहन उद्योगातील संघटना सियामने दंडाला विरोध केला होता. 

वाहने स्वत: परत बोलावण्यासाठी संहिता तयार करण्याची मागणी संघटनेने केली होती. तथापि, सरकारला हे मान्य झाले नाही. सदोष वाहनांची विक्री केल्यास कंपनीला जरब बसेल अशा दंडाची तरतूद असायला हवी, असे सरकारचे म्हणणे होते.नवे नियम सात वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या वाहनांना लागू होतील. कुठल्याही सुट्या भागात, घटकात अथवा सॉफ्टवेअरमध्ये रस्ते आणि पर्यावरण सुरक्षेस जोखमीत टाकणारी कुठल्याही प्रकारची त्रुटी असलेले वाहन ‘सदोष वाहन’ म्हणून गणले जाईल.

..तर कंपन्यांना दंड लावणारसहा लाख दुचाकी अथवा एक लाख चारचाकी वाहने परत बोलावणे अनिवार्य ठरल्यास कंपनीला १ कोटी रुपयांचा दंड होऊ शकेल. नऊपेक्षा जास्त प्रवासी क्षमतेची वाहने, तसेच सर्व अवजड प्रकारची वाहने यांच्या बाबतीत नियमात असे म्हटले आहे की, या श्रेणीतील ५० हजारपेक्षा जास्त वाहने सरकारच्या आदेशानुसार परत बोलावली गेली असतील, तर कंपन्यांना १ कोटी रुपयांचा दंड लावला जाऊ शकतो. 

टॅग्स :carकारCentral Governmentकेंद्र सरकारNitin Gadkariनितीन गडकरी