शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

पेगाससच्या माध्यमातून हेरगिरी करून पाडण्यात आलं काँग्रेसचं सरकार?; नव्या माहितीनं एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 17:48 IST

काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडण्यासाठी पेगाससच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात आल्याचा संशय

नवी दिल्ली: पेगासस स्पायवेयरमुळे संसदेत एकच गोंधळ पाहायला मिळाला आहे. केंद्रीय मंत्री, न्यायाधीश यांच्यासह पत्रकारांवर त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असल्याचा आणि हेरगिरी होत असल्याचा आरोप आहे. यावरून विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. तर सरकारनं याबद्दलच्या वृत्तावर आणि ते प्रकाशित झाल्याच्या टायमिंगवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. संसदेचं कामकाज चालू न देण्यासाठीच अधिवेशनाच्या एक दिवस आधी पेगाससचा विषय चर्चेत आणला गेला, असा संशय केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केला आहे.

आता पेगासस प्रकरणात आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. २०१९ मध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जनता दलाचं (सेक्युलर) सरकार होतं. या सरकारशी संबंधित काही फोन नंबर संभाव्य लक्ष्य होते. जुलै २०१९ मध्ये काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळलं आणि भाजपनं सत्ता स्थापन केली. या संपूर्ण घटनाक्रमाचा कथित हेरगिरीशी संबंध असल्याचं 'द वायर'नं वृत्तात म्हटलं आहे.

२०१९ मध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसचं सरकार होतं. एच. डी. कुमारस्वामी मुख्यमंत्री, तर जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री होते. त्याआधी काँग्रेसचे सिद्धारामय्या राज्याचे मुख्यमंत्री होते. विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसनं जेडीएससोबत सत्ता स्थापन केली. विशेष म्हणजे काँग्रेसला ८०, तर जेडीएसला ३७ जागा मिळाल्या होत्या. मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं जेडीएसला मुख्यमंत्रिपद दिलं. 

काँग्रेस-जेडीएसचं सरकार काही महिने चाललं. २०१९ मध्ये ते कोसळलं. या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर, माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या सचिवांच्या फोन क्रमांकांची निवड संभाव्य लक्ष्य म्हणून करण्यात आली होती. क्रमांकांच्या रेकॉर्ड्सचा आढावा घेत असताना हे क्रमांक दिसून आल्याचं 'द वायर'नं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा