शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

परिस्थिती गंभीर! 'कोरोनाचा साईड इफेक्ट आहे व्हायरल फिव्हर'; बिहारमध्ये 25 चिमुकल्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 15:15 IST

Viral Fever in Bihar : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं म्हटलं जात असताना या आजारामुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमावला आहे. याच दरम्यान आणखी काही आजाराचा कहर पाहायला मिळत आहे. व्हायरल फिव्हर हा कोरोनाचा साईड इफेक्ट असल्याची माहिती आता समोर आली आहे. बिहारमध्ये 25 चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. अचानक व्हायरल फिव्हरच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मुझफ्फरपूर, चंपारण, गोपाळगंज, सीवान आणि मधुबनीसह अनेक राज्यात व्हायरल फिव्हरने थैमान घातले आहे. गेल्या एक महिन्यात जवळपास 25 मुलांनी आपला जीव गमावला आहे. तर अनेकांवर सध्या उपचार सुरू आहेत. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं म्हटलं जात असताना या आजारामुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटणाच्या सर्वात मोठ्या रुग्णालयातील सर्व बेड्स फुल झाले आहेत. आरोग्य विभागाने अलर्ट देखील जारी केला आहे. आरोग्य विभागाने आपल्या काही टीम तयार केल्या असून त्या सर्व जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य मंत्र्यांनी देखील या सर्व परिस्थितीवर आपलं लक्ष असल्याचं म्हटलं आहे. तसेच सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं देखील म्हटलं आहे. मुलांवर योग्य उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास

पाटणामध्ये व्हायरल  फिव्हरचा कहर पाहायला मिळत आहे. सरकारी रुग्णालयात तर एकही बेड शिल्लक नाही. डॉक्टरांनी व्हायरल फिव्हर हा कोरोनाचे साईड इफेक्ट असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास जाणवत आहे. रोज अनेक मुलांना उपचारासाठी रुग्मालयात आणण्यात येत आहेत. मात्र रुग्णांसाठी जागाच शिल्लक नसल्याने अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही रुग्णालयात शिशू वॉर्ड तयार करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक बेडसमोर ऑक्सिजन प्लांट लावण्यात आला आहे. जेणेकरून मुलांना हरज भासल्यास लगेच ऑक्सिजन देता येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

भयावह! रहस्यमयी आजाराचा कहर, भीतीने लोकांनी सोडलं राहतं घर; 50 जणांचा मृत्यू

कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता आणखी एका रहस्यमयी आजाराची दहशत पाहायला मिळत आहे. तापाच्या धसक्याने लोकांनी घरदार सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या अनेक शहरातील शेकडो लोकांना ताप आला आहे. याठिकाणी रहस्यमयी आजाराचा कहर पाहायला मिळत आहे. फिरोजाबादमध्ये रहस्यमयी आजाराने आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. मथुरामध्ये गेल्या 15 दिवसांत 11 मुलांचा मृत्यू झाला आहे. चिमुकल्यांसह मोठ्यांचा देखील मृत्यू होत आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फरहच्या एका गावात महामारीमुळे लोकांनी आपलं घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या राहत्या घराला टाळं लावून ते दुसऱ्या ठिकाणी नातेवाईकांकडे राहायला गेले आहेत. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने गावातील पिण्याच्या पाण्याची देखील चाचणी केली आहे. याचा अधिक तपास करण्यात येत आहे. 

टॅग्स :BiharबिहारIndiaभारतhospitalहॉस्पिटल