शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थिती गंभीर! 'कोरोनाचा साईड इफेक्ट आहे व्हायरल फिव्हर'; बिहारमध्ये 25 चिमुकल्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 15:15 IST

Viral Fever in Bihar : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं म्हटलं जात असताना या आजारामुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमावला आहे. याच दरम्यान आणखी काही आजाराचा कहर पाहायला मिळत आहे. व्हायरल फिव्हर हा कोरोनाचा साईड इफेक्ट असल्याची माहिती आता समोर आली आहे. बिहारमध्ये 25 चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. अचानक व्हायरल फिव्हरच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मुझफ्फरपूर, चंपारण, गोपाळगंज, सीवान आणि मधुबनीसह अनेक राज्यात व्हायरल फिव्हरने थैमान घातले आहे. गेल्या एक महिन्यात जवळपास 25 मुलांनी आपला जीव गमावला आहे. तर अनेकांवर सध्या उपचार सुरू आहेत. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं म्हटलं जात असताना या आजारामुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटणाच्या सर्वात मोठ्या रुग्णालयातील सर्व बेड्स फुल झाले आहेत. आरोग्य विभागाने अलर्ट देखील जारी केला आहे. आरोग्य विभागाने आपल्या काही टीम तयार केल्या असून त्या सर्व जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य मंत्र्यांनी देखील या सर्व परिस्थितीवर आपलं लक्ष असल्याचं म्हटलं आहे. तसेच सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं देखील म्हटलं आहे. मुलांवर योग्य उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास

पाटणामध्ये व्हायरल  फिव्हरचा कहर पाहायला मिळत आहे. सरकारी रुग्णालयात तर एकही बेड शिल्लक नाही. डॉक्टरांनी व्हायरल फिव्हर हा कोरोनाचे साईड इफेक्ट असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास जाणवत आहे. रोज अनेक मुलांना उपचारासाठी रुग्मालयात आणण्यात येत आहेत. मात्र रुग्णांसाठी जागाच शिल्लक नसल्याने अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही रुग्णालयात शिशू वॉर्ड तयार करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक बेडसमोर ऑक्सिजन प्लांट लावण्यात आला आहे. जेणेकरून मुलांना हरज भासल्यास लगेच ऑक्सिजन देता येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

भयावह! रहस्यमयी आजाराचा कहर, भीतीने लोकांनी सोडलं राहतं घर; 50 जणांचा मृत्यू

कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता आणखी एका रहस्यमयी आजाराची दहशत पाहायला मिळत आहे. तापाच्या धसक्याने लोकांनी घरदार सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या अनेक शहरातील शेकडो लोकांना ताप आला आहे. याठिकाणी रहस्यमयी आजाराचा कहर पाहायला मिळत आहे. फिरोजाबादमध्ये रहस्यमयी आजाराने आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. मथुरामध्ये गेल्या 15 दिवसांत 11 मुलांचा मृत्यू झाला आहे. चिमुकल्यांसह मोठ्यांचा देखील मृत्यू होत आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फरहच्या एका गावात महामारीमुळे लोकांनी आपलं घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या राहत्या घराला टाळं लावून ते दुसऱ्या ठिकाणी नातेवाईकांकडे राहायला गेले आहेत. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने गावातील पिण्याच्या पाण्याची देखील चाचणी केली आहे. याचा अधिक तपास करण्यात येत आहे. 

टॅग्स :BiharबिहारIndiaभारतhospitalहॉस्पिटल