शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

आरक्षणासाठी कोणताही त्याग करण्यास तयार - नितीश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 12:12 IST

निवडणुका जवळ आल्या की सर्वच राजकीय नेत्यांना सर्वसामान्यांच्या अधिकारांची, हक्कांची पूर्तता करण्याची आठवण होते. मुलभूत सोयीसुविधा, स्मारकं, राम मंदिर, विविध समाजाचे आरक्षण यांसहीत अनेक मुद्दे चर्चेत येतात.

पाटणा - निवडणुका जवळ आल्या की सर्वच राजकीय नेत्यांना सर्वसामान्यांच्या अधिकारांची, हक्कांची पूर्तता करण्याची आठवण होते. मुलभूत सोयीसुविधा, स्मारकं, राम मंदिर, विविध समाजाचे आरक्षण यांसहीत अनेक मुद्दे चर्चेत येतात. याच पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनीही आरक्षणासंदर्भात मोठे विधान केले आहे. 'अनुसूचित जाती जमाती (एससी/एसटी)चे आरक्षण करण्याची ताकद कोणामध्येही नाहीय', असे विधान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे. जदयूनं आयोजित केलेल्या मगध प्रमंडलीय दलित-महादलित कार्यकर्ता संमेलनात संबोधित करताना नितीश कुमार यांनी हे विधान केले आहे.

पुढे ते म्हणाले की, न्याय आणि विकासाप्रती आमची वचनबद्धता आहे. न्यायासोबत विकास म्हणजे समाजातील प्रत्येक क्षेत्राचा विकास. देशातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण रद्द करण्याची ताकद कोणातही नाहीय. शिवाय, आरक्षणासाठी आम्ही कोणताही त्याग करण्यास तयार आहोत.

नितीश कुमार यांनी असेही म्हटले की, काही जण काम न करता आणि तत्त्वांप्रती निष्ठा न राखता राजकारणात प्रवेश करतात आणि अधिकार मिळाल्यानंतर त्यांचा दुरुपयोग करतात. काही जण समाजात भ्रम पसरवण्याचा आणि अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आरक्षण मिळालेच नाही तर मागासलेला समाज मुख्य प्रवाहात कसा येईल. जोपर्यंत मागासलेल्यांचा विकास होत नाही. तोपर्यंत समाज, राज्य तसंच देशाचा विकास होऊ शकत नाही.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारSC STअनुसूचित जाती जमाती