शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

भ्रष्टाचाराचे आरोप असूनही लालुंच्या मुलाला पक्षाचा भक्कम पाठिंबा

By admin | Updated: July 10, 2017 17:39 IST

राष्ट्रीय जनता दलाने लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादवच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 10 - येत्या काही दिवसात बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते. राष्ट्रीय जनता दलाने लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादवच्या  पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. तेजस्वी यादव यांना राजीनामा देण्याची गरज नसल्याचे पक्षाने म्हटले आहे. तेजस्वी एक चांगले नेते आहेत असे राजदकडून सांगण्यात आले. तेजस्वी यादव बिहारचे उपमुख्यमंत्री असून, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. 
 
या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री नितीश कुमार मौन बाळगून आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. मंगळवारी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत तेजस्वी यांच्याकडून राजीनामा घेण्याचा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे राजकीय विश्लेषकांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. 
 
सीबीआयने मागच्याच आठवडयात हॉटेलच्या गैरव्यवहार प्रकरणात तेजस्वी, लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेल्वेच्या दोन हॉटेल्सच्या देखभालीचे कंत्राट देण्याच्या मोबदल्यात पाटणा येथील मोक्याचा भूखंड पदरात पाडून घेतल्याचा या तिघांवर आरोप आहे. 2006 मध्ये लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना हा व्यवहार झाला होता. 
 
आणखी वाचा 
 
पक्षप्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री अब्दुल बारी सिद्दीकी यांनी भाजपावर सरकार अस्थिर करण्याचा आरोप केला. आम्हाला तोडण्याचा प्रयत्न होत आहे पण असे घडणार नाही. आम्ही पुन्हा उसळी घेऊन उभे राहू असे त्यांनी सांगितले. 
 
लालू प्रसाद यादव आणि मुख्यमंत्री नितीश कुमार हे एकवेळचे परस्परांचे कट्टर राजकीय विरोधक होते. पण 2014 लोकसभा निवडणुकीपासून भाजपाचा चौफेर उधळलेला विजयाचा वारु रोखण्यासाठी नितीश-लालू एकत्र आले. बिहारच्या जनतेनेही विधानसभा निवडणुकीत या आघाडीला साथ दिली आणि 2015 साली बिहारमध्ये राजद-जदयूचे सरकार स्थापन झाले. 
 
मागच्याच आठवडयात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात सीबीआयने शुक्रवारी भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. सीबीआयने लालू आणि अन्य आरोपींशी संबंधित असणा-या बारा ठिकाणांवर छापे मारीची कारवाई केली. लालू रेल्वेमंत्री असताना त्यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करुन भारतीय रेल्वे कॅटरींग अँड टुरिजम कॉर्पोरेशन म्हणजे आयआरसीटीसीच्या माध्यमातून खासगी हॉटेल कंपन्यांना बेकायदा लाभ पोहोचवल्याचा आरोप आहे. लालू काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात 2004 ते 2009 दरम्यान  देशाचे रेल्वेमंत्री होते.