शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
4
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
5
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
6
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
7
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
8
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
9
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
10
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
11
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
12
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
13
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
14
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
15
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
16
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
17
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
18
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग आता ऐच्छिक स्वरूपाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 03:41 IST

योजनेत केला बदल; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

एस. के. गुप्ता 

नवी दिल्ली : पीक विमा योजनेतील दुरुस्तीला केंद्रीय मंत्रीमंडळाने बुधवारी मंजूरी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेतील सहभाग आता अनिवार्य न राहाता तो ऐच्छिक स्वरुपाचा असेल. कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.ते म्हणाले की, पिकाचा विमा उतरवायचा की नाही याचा निर्णय घेणे शेतकºयांवर सोपविले आहे. आपत्कालीन स्थितीचा मुकाबला करण्यासाठी लोक जसा जीवनसुरक्षा विमा काढतात, त्याच पद्धतीने शेतकºयांनी पिकाचा विमा काढायला हवा.

तोमर म्हणाले की, पीक विम्याच्या हप्त्यापोटी शेतकºयांनी काही दिवसांत १३ हजार कोटी रुपये भरले आहेत. पिकाच्या नुकसानीची भरपाई विमा कंपन्यांनी शेतकºयांना ६० हजार कोटी रुपये दिले आहेत. पीक विमा बंधनकारक असताना शेतकरी त्यात सहभागी व्हायचे, मात्र अनेक शेतकरी विम्याचे हप्ते वेळेवर भरत नसत. त्यामुळे अशा शेतकºयांना भरपाई मिळत नसे. जी राज्ये ३१ मार्चपर्यंत खरीप पीक विम्याचे व ३१ सप्टेंबरपर्यंत रब्बी पिकाच्या विम्याचे हप्ते भरतील, त्यांना त्याचे संपूर्ण लाभ मिळतील.१० हजार कृषी उत्पादक संस्थादेशात २०२३ पर्यंत १० हजार कृषी उत्पादक संस्था (एफपीओ) स्थापण्यात येणार आहे. त्यासाठी नाबार्ड एक हजार कोटी व एनसीडीसी ५०० कोटी रुपयांचा निधी देईल. या निधीतून या संस्थांद्वारे शेतकºयांना आर्थिक मदत केली जाईल. या संस्थांसाठी केंद्राने ६८६६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या संस्थांद्वारे दीड लाख रोजगार मिळेल. प्रत्येक जिल्'ाच्या ब्लॉकमध्ये दोन कृषी उत्पादक संस्था असतील. पिकांची मोजणी करून त्याला योग्य भाव मिळवून देण्याबरोबरच शेतकºयांच्या आर्थिक उन्नतीसाठीदेखील त्या काम करतील.दुग्धोत्पादनासाठी ४४५८ कोटी रुपयेनरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, दुग्धोत्पादन विकासासाठी ४४५८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. दुसरी श्वेतक्रांती व्हावी यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असून त्या दिशेने हे एक पाऊल टाकले आहे. त्यामुळे ५० हजार गावांतील ९५ लाख शेतकºयांना फायदा होईल. दुग्धोत्पादन क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जात असताना देशातील या क्षेत्राचा विकास कसा होईल, या प्रश्नावर केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, केंद्र सरकार शेतकºयांचे हिताचे निर्णय घेत आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार