शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"सगळी जबाबदारी नेहरूचीं आहे का? तुम्ही काय केले सांगा"; पहिल्याच भाषणात प्रियंका गांधींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 15:22 IST

लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

MP Priyanka Gandhi: केरळमधील वायनाड येथील काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. उत्तर प्रदेशातील हाथरस, उन्नाव आणि संभलसारख्या घटनांचा उल्लेख करत प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. सध्याच्या सरकारने संविधान कमकुवत करण्याचे काम केल्याचे प्रियांका गांधी म्हणाल्या. प्रियांका गांधी यांच्या भाषणाची जोरदार चर्चा सुरु झाली असून त्यांची तुलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भाषणाशी करण्यात येत आहे. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख करत विरोधकांना टोला लगावला.

लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान पहिल्यांदाच खासदार प्रियांका गांधी यांनी भाषण केलं. 'आपल्या देशाला धर्माची जुनी परंपरा आहे, हजारो वर्ष जुनी, ही परंपरा संवाद आणि चर्चेची आहे. तत्त्वज्ञान ग्रंथ, वेद आणि उपनिषदांमध्ये एक गौरवशाली परंपरा आहे. वेगवेगळ्या धर्मांमध्ये, इस्लाम, जैन आणि शीख धर्मात वादविवाद आणि चर्चेची संस्कृती आहे. या परंपरेतून आपला स्वातंत्र्यलढा उभा राहिला. सत्य आणि अहिंसेवर आधारित हा जगातील एक अनोखा लढा होता. आपला स्वातंत्र्यलढा लोकशाहीवादी होता, ज्यात प्रत्येक वर्ग, जाती, धर्माच्या लोकांनी भाग घेतला आणि स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्या स्वातंत्र्यलढ्यातून एक आवाज उठला, तो आवाज आपल्या देशाचे संविधान आहे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

"ही केवळ कागदपत्रे नाहीत. या संविधानाच्या निर्मितीमध्ये अनेक नेते वर्षानुवर्षे मग्न राहिले. या संविधानाने प्रत्येक नागरिकाला सरकार बनवण्याचा आणि बदलण्याचा अधिकार दिला आहे. संविधानाच्या धारणेने प्रत्येक नागरिकाला देशाच्या उभारणीत आपलाही वाटा असल्याचा विश्वास दिला. उन्नावमध्ये मी बलात्कार पीडितेच्या घरी गेले. तिला जाळून मारण्यात आले. पीडितेने एकटीने लढा दिला. आपल्या संविधानाने ही लढण्याची क्षमता आणि हे धैर्य त्या पीडित आणि करोडो महिलांना दिले. मी हातरसला गेले तिथे अरुण वाल्मिकी हा पोलीस ठाण्यात सफाई कामगार म्हणून काम करायचा, चोरीच्या आरोपावरून त्याला मारहाण झाली आणि त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की आम्हाला न्याय हवा आहे आणि आमच्या राज्यघटनेने त्यांना हा अधिकार दिला आहे," असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.

"आपले संविधान हे एक संरक्षक कवच आहे, जे देशवासीयांना सुरक्षित ठेवते. न्याय, एकता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही ढाल आहे. सत्ताधारी पक्षातील मित्रांनी गेल्या १० वर्षांत हे संरक्षण कवच तोडण्याचा प्रयत्न केला. राज्यघटनेत सामाजिक आणि आर्थिक न्यायाचे वचन आहे, ते मोडण्याचे काम सुरू झाले आहे. हे सरकार लॅटरल एन्ट्रीच्या माध्यमातून राज्यघटना कमकुवत करण्याचे काम करत आहे. लोकसभेचे निकाल असे आले नसते तर राज्यघटना बदलण्याचे काम सुरू झाले असते," असंही प्रियांका गांधींनी म्हटलं.

"आज आमचे मित्र भूतकाळाबद्दल अधिक बोलतात. भूतकाळात काय घडले? नेहरूजींनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला. देशाला सांगा तुम्ही काय करत आहात? तुमची जबाबदारी काय? संपूर्ण जबाबदारी जवाहरलाल नेहरूंची आहे का? हे सरकार आर्थिक न्यायाचे संरक्षण कवच तोडत आहे. बड्या उद्योगपतींसाठीही कृषीविषयक कायदे केले जात आहेत. देशातील शेतकरी वायनाडपासून ललितपूरपर्यंत रडत आहेत. या देशातील शेतकऱ्यांचा देवावर विश्वास आहे. हिमाचलमध्ये सफरचंद पिकवणारे छोटे शेतकरी रडत आहेत कारण एका व्यक्तीसाठी सर्व काही बदलत आहे," अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली.

टॅग्स :lok sabhaलोकसभाPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाParliamentसंसद