शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"2014 पूर्वी देशात घोटाळ्याचा काळ होता...", लोकसभेतून PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 17:12 IST

"या देशाने दीर्घकाळ तुष्टीकरणाचे राजकारण पाहिले आणि आमच्या 10 वर्षांच्या ट्रॅक रेकॉर्डही पाहिला आहे.

Parliament Session 2024 : संसदेच्या विशेष अधिवेशनात पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी आज(दि.2) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलेत. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. "2014 चे दिवस आठवले तर देशातील जनतेचा सरकारवरील विश्वास उडाला होता. देश पार निराशेच्या गर्तेत बुडाला होता. देशाचे काहीही होऊ शकत नाही, हेच शब्द 2014 पूर्वी कानावर पडायचे. दररोज वृत्तपत्रांमध्ये फक्त घोटाळ्यांच्या बातम्या यायच्या. घोटाळ्यांची जणून स्पर्धाच सुरू होती," अशी घणाघाती टीका पतप्रधानांनी केली.

'विकसित भारताचा संकल्प पूर्ण कररणार'पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, "देशातील जनतेने आमची धोरणे पाहिली, आमचा हेतू पाहिला. त्यामुळेच आमच्या प्रामाणिकपणावर जनतेचा विश्वास वाढला. यंदाच्या लोकसभा  निवडणुकीत विकसित भारताचा संकल्प घेऊन आम्ही गेले होतो. हाच संकल्प पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आम्हाला जनतेने सेवा करण्याची संधी दिली. जेव्हा देशाचा विकास होतो, करोडो लोकांची स्वप्ने पूर्ण होतात, तेव्हा येणाऱ्या पिढ्यांसाठी एक मजबूत पाया तयार होतो. विकसित भारताचा थेट फायदा आपल्या देशातील नागरिकांच्या सन्मान आणि जीवनमानाच्या सुधारणेतून होतो. जगाच्या विकासाच्या प्रवासात भारताचाही वाटा समान असेल, हे आमचे स्वप्न आहे. मी देशवासियांना आश्वासन देतो की, विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण समर्पण आणि प्रामाणिकपणाने सर्वतोपरी प्रयत्न करू."

'नेशन फर्स्ट, हेच आमचे ध्येय...'"या देशाने दीर्घकाळ तुष्टीकरणाचे राजकारण पाहिले आणि प्रशासनाचे तुष्टीकरण मॉडेलही पाहिले आहे. जनतेने आमच्या 10 वर्षांच्या सरकारचा ट्रॅक रेकॉर्डही पाहिला आहे. लोकसेवा हीच ईश्वर सेवा, हा मंत्र बनवून आम्ही काम केले. देशातील जनता भ्रष्टाचाराने त्रस्त होती. आम्ही भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्स धोरण राबवलेत. आज जगात भारताचा गौरव होतोय. जगात देशाची विश्वासार्हता वाढली आहे. भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे. गेल्या 10 वर्षात आमचे सरकार सबका साथ, सबका विकास या मंत्राचे पालन करून सर्वांचे कल्याण करण्याचा प्रयत्न करत आहे. नेशन फर्स्ट, हे आमचे ध्येय आहे," असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

'J&K मध्ये संविधान लागू करू शकले नाही'ते पुढे म्हणाले, "देशातील प्रत्येक नागरिकाला माहित आहे की, भारत आता आपल्या सुरक्षेसाठी काहीही करू शकतो. कलम 370 चा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, इथे संविधान डोक्यावर घेऊन नाचणारे लोक जम्मू-काश्मीरमध्ये ते लागू करण्याचे धाडस दाखवू शकत नाहीत. आज तिथे 370 ची भिंत पडली अन् दगडफेक थांबली. तेथील लोक भारतीय राज्यघटनेवर पूर्ण विश्वास ठेवून पुढे येत आहेत. 2014 पूर्वी देशात वारंवार दहशतवादी हल्ले होत असत. देशाच्या कानाकोपऱ्याला दहशतवादाने पोकरले होते. पूर्वी कुठेही दहशतवादी हल्ले व्हायचे. आज भारत त्यांच्या घरात घुसून मारतो. देश आपल्या सुरक्षेसाठी काहीही करू शकतो हे आज देशातील प्रत्येक नागरिकाला माहीत आहे."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेस